Skip to main content

भोग आणि ईश्वर १३९

भोग आणि ईश्वर  १३९
 
स्तोत्र, मंत्र इत्यादी विषयी आपण दोन भागात विस्तृतपणे चर्चा केली. काही गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून समजल्या. म्हणजे आपल्या इच्छेमागे असलेली शक्ती वा बल जर आपल्या प्रारब्धानुसार कमी पडत असेल वा काही प्रमाणात क्षीण असेल तर, त्यासाठी आपण स्तोत्र, मंत्र इत्यादींचं सहाय्य जरूर घेतो आणि आपल्या इच्छेतून निर्माण होणाऱ्या लहरींना पाठबळ देऊ शकतो. 

आता या प्रत्येक स्तोत्र मंत्र वा विशिष्ट हेतुप्रीत्यर्थ केलेला जाप इत्यादी हे त्या त्या देवतेला जागृत करतं, ज्यायोगे त्या विशिष्ट देवतेपर्यंत आपल्या स्तोत्र मंत्र पठणाच्या लहरी पोचतात. मुळात ह्या देवता म्हणजे विशिष्ट लहरी निर्माण करणारी शक्तीस्थानं वा शक्तिकेंद्रं आहेत वा असतात. ज्यावेळी आपण काही विशिष्ट ध्येय वा उद्देश ठेवून, त्यांना साद घालतो, त्यावेळी आपल्या साधनेच्या लहरी, त्या शक्तिकेंद्रांना जागृत करून, त्यातून आपल्या कार्यपूर्तीसाठी आवश्यक अतिरिक्त बळ, ऊर्जा, चैतन्य आपल्यापर्यंत पोहोचवतात.

ज्यामुळे आपल्या कार्यासाठी आवश्यक लहरी उत्पन्न होऊन, आपल्या इच्छाशक्तीचं बल व ऊर्जा, यात वाढ होऊन, आपण त्या कार्यासाठी प्रेरित होतो. याशिवाय त्या कार्यासाठी लागणारं पुरेसं सकारात्मक वातावरण व मनःशक्ती, वेग, त्या कार्यासाठी आवश्यक व्यक्तींच्या मनात त्याप्रमाणे इच्छा वा प्रेरणा जागृत होऊन, आपल्या कार्यसिद्धीला हातभार लागतो. म्हणून ज्यावेळी आपली इच्छाशक्ती काहीशी क्षीण असते, त्यावेळी अश्या प्रकारच्या बाह्य लहरींच्या सहाय्याने आपण अतिरिक्त ऊर्जा व बल प्राप्त करून इच्छित हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक लहरी प्राप्त करून, आपल्या इच्छाशक्तीच्या अर्थात कर्माच्या बळावर कार्य करून घेऊ शकतो. 

आता आपल्या लक्षात अजून एक गोष्ट आली असेल. स्वतः सर्व ब्रह्मांडाचा निर्माता व एकमेव स्वामी असूनही इतक्या विविध रुपात वा स्वरूपात परमेश्वर का प्रकट झाला. अमुक कार्यासाठी अमुक एक देवता, ही विभागणी प्रभूंच्या विशिष्ट शक्तीचं प्रकटीकरण आहे. म्हणजेच देहधारी जीव, सूर, असुर व मानवी मनातील हेतुपुर्तीसाठी, त्या त्या विशिष्ट शक्तीची स्तुती, प्रार्थना व आवाहन करून, त्या शक्तीला जागृत करून, आपल्या इच्छेचं बल वाढवून,कार्यसिद्ध करून घेता यावी या हेतूने, त्या त्या कार्याच्या शक्तीची केंद्र, विधात्याने निर्माण करून जड जीवांचं सहाय्य केलं आहे. 

चांगल्या उद्देशाने, सदर शक्तिकेंद्रातील लहरींचा आपण सदुपयोग करून घेऊ शकतो.  सदहेतु असेल तर कर्मफला नुसार आपण चांगल्या परिणामांचे धनी होऊ शकतो आणि जर गैरहेतूने शक्तिकेंद्राचं आवाहन केलं तर, अंती कर्मफल त्यानुसारच मिळेल, हे ध्यानात ठेवून आवाहन करणे. आपण ज्यावेळी एखादं स्तोत्र वा मंत्र आदि जपणार वा त्याचं पठण करणार असू, त्यावेळी सर्वात प्रथम त्या इच्छेचा संकल्प मनात योजून, तसा संकल्प मनात प्रकटपणे बोलून, मगच पठणाला सुरवात करावी. 

म्हणजे त्या संकल्पाच्या आधारे, आपले पठण अर्थातच आवाहन, त्या शक्तिकेंद्रापर्यंत पुरेश्या बलाने पोचेल. याशिवाय संकल्पाद्वारे आपणही, मनाने पूर्ण बांधील राहून, पुरेश्या गांभीर्याने पठण व चिंतन करू, ज्यामुळे इच्छित हेतू साठीचा आपला सहभाग संपूर्ण असेल. इंग्लिशमध्ये ज्याला १००% participation म्हणतात ते, होण्यासाठी या संकल्पाची गरज ही प्राथमिक आहे. 

आपण जर लक्षात घेतलं तर समजेल की, प्रत्येक स्तोत्र वा मंत्र यांचा, त्या त्या शक्तिकेंद्रासाठीचा कालावधी विशिष्ट असतो. याचं कारण त्या शक्तिकेंद्राला जागृत करून, त्यातून विशिष्ट लहरी उत्पन्न होण्यासाठी, तेवढा कालावधी वा तेवढा जाप आवश्यक असतो. म्हणून तितका कालावधी, पूर्ण इच्छेने, गंभीरपणे आणि शंभर टक्के सहभाग देऊन आपलं, त्या शक्तीसाठीचं आवाहन, करणं अत्यंत जरुरी आहे.  

या विषयासंदर्भात एक ध्यानात घ्या की, हे लहरीचं गणित आहे, हे शास्त्रीय आहे आणि आपण याचा अनुभव,लाभ घेऊन कार्यसिद्धी प्राप्त करू शकता. मात्र यात संकल्प, त्या संकल्पपूर्तीसाठी त्या विशिष्ट शक्तिकेंद्राचं साधन आणि तितका कालावधी आपली त्या संकल्पमागची दृढ इच्छाशक्ती धरून ठेवणं गरजेचं आहे.  अजून एक गोष्ट महत्वाची कार्यसिद्धी व त्यातील यश हे त्या साधनेचे नीतिनियम यांना धरून प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे नियमांबरोबरच नीती सांभाळणं गरजेचं आहे. 

हा विषय संपवताना अजून एक. काही कारणाने आपल्या आवाहनानुसार सदर शक्तिकेंद्रा कडून योग्य प्रतिसाद प्राप्त न झाल्यास, पुन्हा काही दिवस सोडून योग्य दिवशी वा त्या त्या स्तोत्र मंत्रांच्या नियमानुसार नेमून दिलेल्या दिवशी करू शकता. यशप्राप्ती ही प्रारब्ध, संचित या बरोबरच आपली दृढ  इच्छा शक्ती यावर अवलंबून आहे हे ध्यानात ठेवावे आणि दृढ इच्छाशक्तीला प्रारब्धावर मात करण्याची शक्ती वा पाठबळ सद्गुरू व ईश्वर देतात हेदेखील ध्यानात ठेवावं. आपला सहभाग हा शंभर टक्के हवा. 

शुभलाभ निश्चित होईल. यात एक जाताजाता कोणताही संकल्प मनात योजताना प्रारंभी श्रीगणेश या शक्तिकेंद्राला नमन आवश्यक आहे. कारण शास्त्रीय परिभाषेत त्या संकल्पाच्या मार्गातील विघ्नस्वरूप लहरी रोखण्याची व नष्ट करण्याची शक्ती श्रीगणेश या शक्तिकेंद्राकडे आहे. 

आज इथेच थांबू. उद्या पुन्हा सुरू करू, तोपर्यंत नामात रहा, साधनेत रहा, गुरूआज्ञेत रहा. शक्तीचक्र वा बलचक्र निर्माण करा. (शक्तीचक्र म्हणजे काय यावर पुढील भागात चर्चा करूया). 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...