Skip to main content

भोग आणि ईश्वर १३४

भोग आणि ईश्वर  १३४
 
अजून खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की अजूनही सृष्टीतील काही गोष्टी आपण जाणण्यापालिकडे आहेत. तरीही विधात्याने त्या निर्माण केल्या आहेत आणि त्या अस्तित्वात आहेतच. जसं अनेक सूर्यमाला, त्या अनेक सूर्यमालेत असलेल्या अनेक जीवसृष्टी, त्या अनेक जीवसृष्टीत असलेले असंख्य सूक्ष्म वा महाकाय जीव हे सर्व अजून आपण पाहिलंसुद्धा नाही. किंबहुना अश्या सूर्यमाला आहेत वा असतील हासुद्धा आपला अंदाज आहे. 

समस्त ब्रह्मांडाची रचना करताना सृष्टीकर्त्याने काय काय योजून ठेवलं आहे ते तोच जाणे. पण जर असेलच तर त्याची आपल्याला आता जाणीव होणं आणि त्यादृष्टीने मानवाने वैज्ञानिक प्रयत्न करणं आणि प्रगतीच्या जोरावर ते सर्व ज्ञात करून घेणं हे देखील त्याच्याच खेळाचं सूत्र नसेल ना. कारण मायापती तोच आहे आणि माया त्याच्या अधीन आहे, हे तर शास्त्राने सांगितलं आहे. किंवा पुन्हा एकदा काहीशे वर्ष अर्थात शतकं फिरून, मायेआधीन राहून विज्ञानाचा चष्मा घालून पुन्हा त्याच उत्तराला पोचणार का आपण.

त्यानुसारच देवकण हा नुकताच लागलेला शोध किंवा काढलं गेलेलं अनुमान हे त्याचाच एक भाग आहे का. कारण विधात्याच्या योजनेतच मधु आणि कैटभ हे कधी जय विजय कधी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, कधी रावण व कुंभकर्ण आणि कधी शिशुपाल जरासंध बनून या सृष्टीत विनाश व पुनर्निर्मितीचा खेळ करतात. म्हणजे यातील प्रगतीस कारण विज्ञान हे विधात्याच्या आणि विनाशक विज्ञान हा मधु व कैटभ यांच्या खेळाचाच एक भाग नसेल कशावरून.

व्यापक आणि वैश्विक ज्याला युनिव्हर्सल दृष्टीने पाहिलं तर आजचा करोनाचा खेळ हा याच द्वंद्वाचा भाग तर नसेल ना. या दोन्ही सुष्ट व दुष्ट शक्तींच्या खेळात नेहमी ते जीव भरडले जातात ज्यांचं प्रारब्ध त्यानुसार असेल. पण जे जीव विधात्यावर विश्वासून आपलं नीत विहित कर्म आणि साधना चालू ठेवतात आणि नित्य त्याला शरण असतात, त्यांचं योगक्षेम तो विधाता स्वतः वाहतो.  म्हणजे आपलं काम फक्त त्याला शरण राहायचं तेही नित्य. नित्य म्हणजे आयुष्यात प्रत्येक क्षणी, जागृत व सुप्त अवस्थेत. शरण का राहायचं तर, आपण संपूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला तर, आपण अणुमात्र आहोत. 

पण शरण राहिलो तर त्या प्रत्येक अणुयुक्त आत्म्याची चिंता त्यालाच आहे. तोच गुरुरूपात येऊन त्याची सक्षसुद्धा देतो आणि उद्धाराचा मार्गसुद्धा सांगतो. शरणागत रक्षण हे इतकं शुद्ध ब्रीद आहे त्याचं की, प्रत्यक्ष रावणालासुद्धा वचन देतो शरण ये सीतेला परत कर मी सर्व अपराध क्षमा करीन. जर रावण खरच शरण आला असता तर, तर नक्की श्रीरामांनी त्याला उदार अंतःकरणाने क्षमा केली असतीच आणि उद्धारही केला असताच. 

म्हणजेच जिथे तुम्ही मायेचा हात सोडून, त्याचा हात, शरणागत होऊन, धरून ठेवता, तिथे मायेच्या आधीन राहून तुमच्या हातून घडलेल्या रावणासमान पातकांना, विसरायची क्षमता त्या सर्वज्ञ परमेश्वराच्या हाती आणि हृदयात आहे. 
मग विचार करा आपण जाणतेपणी वा अजाणता केलेल्या चुका, प्रमाद, अपराध पोटात घालून आपले भोग पूर्ण दूर करण्याची शक्ती व ब्रीद त्या विधात्याच्या हृदयात आहेच. आपण पूर्ण शरण जाऊन, आपलं मन त्याच्या समोर उघड करून, शरणागत होऊन त्याला जर प्रार्थना केली तर ती त्याला पोचणार आणि आपलं काम होणारच. 
 
कसं ते उद्याच्या भागात पाहूया.
 -------------------------------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...