Skip to main content

भोग आणि ईश्वर १४०

भोग आणि ईश्वर  १४०
 
कालच्या विषयासंदर्भात लहरी आणि त्यांचं शास्त्र या बाबत आपण जाणून घेतल. प्रत्येक इच्छेच्या शक्तीनुसार त्या त्या इच्छेचं कार्य चालतं.  त्या लहरींची शक्ती, आपल्याला,  इच्छित उद्देशापर्यंत घेऊन जाते. हे आपण पाहिलं आणि जाणून घेतलं. प्रत्येकजण जन्मतः काही पुण्यांचा आणि काही पापांचा भाग घेऊन जन्माला येतो. त्या संचिताचं वलय किंवा ऑरा त्या व्यक्तीसभोवती जन्मापासून असतो. किंबहुना गर्भात असल्यापासून हा ऑरा वा हे वलय जीवाच्या सोबत असतंच असतं.

कदाचित त्या प्रभावामुळेच डोहाळे हा अनुभव गर्भवतींना येतो आणि आपण तो पाहतो. हे वलय म्हणजे एकप्रकारे बल वा कवच यास्वरूपात असतं. ज्या गोष्टींचा प्रभाव अधिक, त्या नुसार त्या त्या प्रकारचं वलय त्या व्यक्ति भोवती असतं. हे वलय, आपले विचार, आचार, उच्चार, कर्म, साधना, तपताप, आयुष्यातील कष्ट काळज्या, चिंता इत्यादीमुळे परिवर्तित होत असतं. जसजसे विचार बदलत जातील अथवा असलेले दृढ होत जातील, तसतसं हे वलय गडद वा तरल अर्थात पातळ होत जातं.

या वलयाच्या आधारे आपल्या इच्छेचं बल हे कमी जास्त होत असतं आणि ऊर्जा शक्ती व कर्म करण्याची चेतना यावर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतो. आपण ज्याप्रमाणे विचार करू त्याप्रमाणे या वलयावर परिणाम होतो. हे वलय वा  ऑरा जर नकारात्मक असेल तर अशी व्यक्ती सहसा नकारात्मक विचार व कृती अधिक करते. नकारात्मक विचाराकडे असलेला कल या व्यक्तीला त्याच्या कृतीत व फलातसुद्धा जाणवतो. 

हे वलय कायमस्वरूपी एकाच स्थितीत वा एकाच प्रभावाचं राहील असं नाही. म्हणजे सकारात्मक माणसाच्या बाबत क्वचित हे वलय नकारात्मकसुद्धा होऊ शकतं. विचार जसे प्रभावित होत जातील किंवा  बदलत जातील त्याचा प्रभाव वलयातील ऊर्जा व शक्ती यावर होतो. म्हणून पूर्वीपासून आपण असं म्हणत आलो की निदान विचार तरी सकारात्मक करा.

या वलयाच्या प्रभावाने आपल्या भोवती जे चक्र तयार होतं वा असतं त्याला शक्तीचक्र वा बलचक्र म्हणतात. यावर आधारित परिणाम आपल्याला विचारातून जाणवतात. आता विचार करूया की या बलचक्राचा प्रभाव जर विचारांवर व विचारातून कृतीवर होत असेल तर हे चक्र नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं वळवायचं. अर्थात या वलयातील नकारात्मक ऊर्जा वा बल कमी अथवा शून्य कशी करायची. 

या चक्राचा परिणाम बाह्य शरीराप्रमाणे आतील मन या इंद्रियांवरसुद्धा होत असतो. पण मन हे मुळात माणसाच्या विचारातून प्रभावित होत असल्यामुळे, आपण काय विचार करावा किंवा येणाऱ्या नकारात्मक विचारांना कसा बांध घालायचा हे आपल्याच हातात आहे. म्हणजे ज्यावेळी नकारात्मक, वाईट वा ऋण ऊर्जा तयार करणारे विचार यायला लागतील आणि ते आपल्या विचारांचा ताबा घेतील, त्या मधल्या काळात आपल्याला त्या विचारांना थोपवून धरण्याची संधी असते. 

ही संधी आपल्या स्वभावातील गुणदोष यानुसार आपल्या ताब्यात वा आवाक्यात असते. जर व्यक्ती गुणवान असेल तर येणाऱ्या विकारी विचारांना आत्मबलाद्वारे रोखून, त्यांना सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित करता येतं. याउलट दोषयुक्त स्वभावधर्म असणाऱ्या व्यक्ती सदर नकारात्मक विचारात वाहावत जाऊन, त्याप्रमाणे कृती करते. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यासाठी इच्छा ही महत्वाची आहे.

आपल्या इच्छेनुसार आत्मबल आपल्याला अंतःप्रेरणा देतं. पण जर अंतर्गत ऊर्जा चेतना अपूर्ण असेल तर, आपण करत असलेल्या साधनेच्या ऊर्जेने तयार होणारे वलय वा प्रभा बाहेरून आत अर्थात मनात व विचारात येणाऱ्या नकारात्मक उर्जेला रोखून धरू शकते. म्हणून शुद्ध सात्विक, विचार, उत्तम साधना आपली आत्मशक्ती आणि बलचक्र वा शक्तीचक्र, यांना सकारात्मक व शुद्धस्वरूपात ठेवते. 

म्हणून सतत चांगले विचार, चांगला आचार आणि चांगलं कर्म करत राहा, बलचक्र वा शक्तीचक्र सकारात्मक राहील आणि संकटं, चिंता वा वाईट काळात मार्ग मिळत जातील आणि मन भरकटणार नाही. यासाठी नामात रहा, गुरुचरणी स्थिर रहा, शुद्ध विचार बाळगा. 

उद्या पुन्हा भेटूच. 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...