Skip to main content

भोग आणि ईश्वर १२५

भोग आणि ईश्वर  १२५
 
काल आपण पाहिलं की आकाशाप्रमाणे मनावर धन आणि ऋण भार तयार होऊन, त्यानुसार मनाचं कार्य चालतं. त्या त्या भाराच्या प्रभावानुसार, आपण आतल्या व बाहेरून येणाऱ्या विचारांना झेलतो, पेलतो आणि प्रतिक्रियारुप प्रकट होतो. म्हणजे मुळात काहीतरी भार हा मनावर कायम असतो. जन्मतः सुद्धा प्रत्येकजण काहिनाकाही भार घेऊनच आलेला असतो. हा कोणता भार म्हणजे धन की ऋण हे अर्थात,पुन्हा संचितानुसार ठरतं.

म्हणजे या जन्मातील आपली विचारसरणी मृत्यूच्या समया पर्यंत जी व जशी असेल, त्यानुसार पुढील जन्मी, जन्म घेताना भार  प्राप्त होते. अर्थातच पुढील जन्मीची, जन्मते वेळी असलेली वा प्राप्त होणारी मानसिकता आज वा या जन्मात आपणच ठरवणार आहोत. म्हणूनच श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी सांगतात की मृत्यूच्या समयी जी वासना वा विचार मनात असेल, त्यानुसार पुढील जन्म प्राप्त होईल, म्हणून सतत नाम घ्या तरच मृत्यूसमयी ते मनात व ओठांवर येईल.  शास्त्रवचन सुद्धा तेच सांगतं, अंते मती सा गती. म्हणजे मृत्यू समयाला जी मती अर्थात बुद्धी व विचार असेल त्यानुसार गती म्हणजे मृत्यूनंतरचा जन्म व जग मिळेल.

धनभार आणि ऋणभार यांचा समतोल राखणं किंवा धनभार वाढवून ऋणभार कमी करणं हेच गरजेचं आहे. ज्यावेळी एखाद्याचा बुद्धिभ्रम वा ब्रेनवॉश करतात, त्यावेळी याच तंत्राचा वापर केला जातो. आधी मनातील तुमचे सध्याचे विचार पूर्ण पुसले जातील याचे प्रयोग करून, ते यशस्वी झाले की त्यांना हवे असलेले विचार तिथे पेरले जातात. म्हणजेच त्यांच्या दृष्टीने धनभार अधिक असेल तर तो पूर्ण जाईल, अश्या प्रकारे छळ करून नन्तर त्यांना हवा असलेला ऋणभार तिथे भरला जातो. अतिरेकी तयार करण्याचं तंत्र असंच योजलं जातं. 

म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात येईल की, कोणताही भार हा कायमस्वरूपी असत नाही आणि नित्य घडणाऱ्या घटना, क्षणाक्षणाचे अनुभव इत्यादींमधून हा भार प्रभावित होतो आणि बदलत असतो. यात आपला मूळ भार कोणता आहे आणि त्यावर आतापर्यंत कोणत्या भाराचे संस्कार घडले आहेत, यावर आपलं आकलन, विचार, चिंतन व प्रतिक्रिया ठरत जाते.

उदाहरणार्थ एखादी धनभारीत व्यक्ती समोर आलेल्या वा येणाऱ्या कोणत्याही क्रियेच्या अनुभवाला सकारात्मक, तुलनेने विचारपूर्वक व पुरेश्या विवेकाने सामोरी जाऊन त्या प्रसंगाला, संवादाला वा व्यक्तीला प्रतिसाद देईल वा दुर्लक्षित करून, त्याचा विचार डोक्यातून काढून टाकले. पण ऋणभारित व्यक्ती त्यावर जलदगतीने, अविचाराने व अविवेकी वृत्तीने प्रतिसाद देऊन प्रतिक्रिया देईल. सदर प्रतिक्रिया आतताईपणाने व घाईने दिलेली असल्याकारणाने अर्थातच बहुतेक प्रसंगी चुकीची असू शकते. 

म्हणूनच मानसिक संतुलन राखण्यासाठी व मनातील हा धनभार वरचढ ठेवण्यासाठी, ऋणभारित व्यक्तींनी वा पटकन रिऍक्ट होणाऱ्या व्यक्तींनी, सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. यासाठीच सद्विचार, सदाचार, सकारात्मक वाचन व श्रवण याबरोबरच प्राणायाम,  ओंकार साधना यांचा चांगला उपयोग होतो. याशिवाय अश्या व्यक्तींनी खास लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, जिथे, त्याप्रसंगी वा स्थळी किंवा विशिष्ट व्यक्तीच्या बोलण्याने, आपण रिऍक्ट होतो, तेंव्हा त्या व्यक्ती पासून शक्य तितकं लांब राहून अर्थात संपर्क कमी करून बघावा.

हे शक्य नसेल तर,  त्याप्रसंगात आपण नुट्रल राहण्याचा अर्थात आपल्या मनावर स्वनियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी नाम जप वा तत्सम सकारात्मक मार्गाचा अवलंब करावा, जेणेकरून त्या संवादांपासून आपलं मन परावृत्त होईल आणि त्याक्षणी निर्माण होणारा अतिरिक्त ऋणभार हा नुट्रल अर्थात प्रभावहीन होईल. कायमस्वरूपी मात्र सकारात्मक विचार, ऊर्जा व शक्ती मनात निर्माण होतील, याचा अभ्यास व प्रयास करावा, ज्यायोगे कालांतराने मनावरील ऋणभाराचा असलेला प्रभाव कमी होईल आणि मन धनभारीत सकारात्मक प्रतिसाद व प्रतिक्रिया द्यायला समर्थ होईल. 

हाच विषय अजून पुढे नेऊया उद्याच्या भागात. नाम घेत रहा, धनभार वाढेल याचा प्रयास करा आणि गुरुचिंतनात रहा.

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
-------------
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...