Skip to main content

भोग आणि ईश्वर १२८

भोग आणि ईश्वर  १२८
 
कालपर्यंत आपण मनावरील धनभार ऋणभार यावर विस्तृतपणे चर्चा केली. मुद्दा बहुतेकांना समजला असेल आणि त्यावर कृती करायला सुरुवात केली असेल. काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मुळात आपण धनभारीत असणं हे आपल्या हिताचं आहे. जगाला काहीही देणंघेणं नाही, हे ध्यानात धरावं. इथे थोडा स्वार्थ मनात आणायचा. कारण प्रकृती उत्तम वा सर्वसामान्य असेल तर आलेले भोग, दुःख काळज्या चिंता यांना दूर सारून, सुदृढ मन देहाला त्याप्रमाणे,  तयार करेल वा देह त्याप्रमाणे कार्यरत होईल. पण अश्या काळात,  यामागचं बल, प्रेरणा, ऊर्जा हे मनाकडून मिळतं, हे लक्षात असुद्या.  

आता मनाला मार्गदर्शन कोण करतं, तर विचार आणि विचार सुदृढ सशक्त सकारात्मक असतील तरच, ते मनाला आणि शरीराला, अश्या काळात विशेषतः, गरजेचे असतात. कारण  या वा अश्या काळात निराशा, विषण्णता इत्यादी मनावर अतिरिक्त बल निर्माण करतात आणि त्यायोगे देहाला सुस्त वा प्रभावहीन वा बलहीन करतात. म्हणून असं वाटायला लागलं की मनाला त्या बलापासून दूर नेणं जरुरी असतं. जे कार्य एखादं नाम, स्तोत्र, मंत्र यांनी केलं जातं. कारण अश्या नामाच्या वा मंत्र किंवा स्तोत्राच्या मागे त्याची प्रेरकशक्ती काम करत असते. 

त्यामुळे हा निर्माण झालेला वा होत असलेला अतिरिक्त दाब दूर होतोच, पण मनाला उत्साही वाटतं. माणूस हा विचार बुद्धी यांनी चालणारा प्राणी असल्यामुळे, विचारातील मरगळ वा अनुत्साह वा निराशा ही एखाद्या चांगल्या व सकारात्मक विचाराने घालवावी. परंतु आपण आधीच्या भागात पाहिल्या प्रमाणे नकारात्मक विचाराच्या बलाला नियंत्रित करून त्यांना दूर करून, त्याजागी सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित करायला, बल जास्त प्रमाणात लागतं. ते बल एखाद्या, नामात, स्तोत्र वा मंत्रात पुरेपूर असतं. त्यावेळी ते एखाद्या औषधाप्रमाणे किंवा जीवनसत्व अर्थात व्हिटॅमिन्सप्रमाणे कार्य करतं. 

प्रत्येक विचारामागे एखादी दृढ शक्ती जर कार्यरत असेल तर, त्या शक्तीच्या प्रेरणेने किंवा बलाने विचारांच्या लहरी आपलं कार्य करण्यास सिद्ध होतात. पण त्यामागचा संकल्प दृढ असावा. उदाहरणार्थ मला परीक्षेत चांगले गुण मिळावेत, ही झाली फक्त एक अपेक्षा. पण यामागे इच्छाशक्तीची प्रेरणा कार्यरत झाली की, विद्यार्थी कार्यरत होतो, नेटाने अभ्यास करतो आणि परीक्षेत आपल्याकडून पूर्ण क्षमतेने लिहिलं वा बोललं जाईल याची तयारी करतो. म्हणजेच फक्त अपेक्षा वा विचार उपयोगाचा नाही. त्याला पुढे नेणारं वा ढकलणारं बल तितकंच गरजेचं आहे.

तसं बल त्यामागे लावलं वा लागलं की, इंजिनाप्रमाणे ते बल वा ती शक्ती कार्याला प्रवृत्त करते आणि माणूस झपाटून काम करतो, त्या इच्छेमागच्या शक्तीने. याच ठिकाणी मनातील विचार सकस व सकारात्मक ठेवायची गरज असते. त्यासाठी सुद्धा ही इच्छाशक्ती कामाला येते. आपण आठवून बघा एखादं काम वा टार्गेट किंवा परीक्षा आपण कधीकाळी झपाटून दिली असेल, त्यावेळची आपली ऊर्जा,उर्मी, प्रेरणा आणि ते झपाटलेपण हे नक्कीच अतुलनीय असतं. कारण त्यामागे इच्छा नावाची प्रेरणा व दृढ संकल्पाची शक्ती काम करत असते. 

पण काळाच्या ओघात, अनुभवाची दाटी झाल्यामुळे वा वयाचा व अतिव्यापाचा परिणाम असेल, कधीकधी निराशा घर करते आणि तेच आपण वेगळे वाटायला लागतो. अशावेळी खाली खाली जात असलेल्या मनःस्थितीला खालूनच म्हणजे मनातूनच बल मिळणं गरजेचं असतं. हे अतिरिक्त बल अनेकदा आपल्या मानसिकतेतून मिळू शकतं किंवा काही चांगल्या सवयीतून वा विचारातूनच मिळतं. म्हणून नेहमी आनंदी, प्रसन्न राहणं जरुरी आहे. नामात तुम्हाला प्रसन्न व आनंदी ठेवण्याची शक्ती निश्चितच आहे. 

म्हणूनच नाममय रहा सकारात्मक रहा आणि चांगले व सकस विचार मनाला देत रहा. वाईट, नकारात्मक विचार हे अंधारासम असतात, ते झटकून देता आले पाहिजेत. यावरच उद्या विचार करूया. 

उद्या पुन्हा चर्चा करूया. तोपर्यंत नामात रहा, गुरूआज्ञा धरून रहा आणि सतत धनभारीत राहायचा प्रयत्न करा.

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
-------------
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...