Skip to main content

भोग आणि ईश्वर १३६

भोग आणि ईश्वर  १३६
 
कालचाच विषय पुढे नेऊया.  आता त्या वरिष्ठांचा दृष्टिकोन कसा असतो याचा विचार करूया. खरा वरिष्ठ हा आपल्या कोणत्याही कनिष्ठाला प्रगत होताना आणि वरवर चढत जाताना पाहून, आनंद आणि समाधान या दोन्ही भावनांचा लाभ घेतो. कारण असा कनिष्ठ प्रगत होत जाणं, हे एकप्रकारे  त्याच्या श्रमाचं, चिंतनाचं चीज झालं, हा आनंद खूप मोठा असतो त्या वरिष्ठांसाठी. आता जो कनिष्ठ फार प्रगती न करता, पण आहे त्या स्थानी स्थिर आणि समाधानी राहून कार्यरत राहिला, तरी वरिष्ठांच्या दृष्टीने ती आनंददायी गोष्ट असते. 

म्हणजेच कनिष्ठांमध्ये कोण प्रगती करेल व कोण फार पुढे  जाऊ शकणार नाही, याचं उत्तम गणित वरिष्ठांना येत असतं. म्हणूनच ते जास्त त्या कनिष्ठांना संभाळून घेतात, ज्यांना जास्त गती आणि मती नाही. म्हणून त्यांना संकट काळात वा त्रासदायक काळात असे वरिष्ठ, त्या कनिष्ठाला कमी हानी वा कमी क्षती पोचेल याची दक्षता घेतात.आता याच पार्श्वभूमी वर कनिष्ठांची काय मानसिकता असते तेही बघूया.

जो कनिष्ठ आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि कर्मगतीने पुढे पुढे वा वरवर चढत जाऊन यशाची शिखरं गाठतो, तो जर उच्च मानसिकतेचा असेल तर तो या यशात आपल्या कर्माबरोबरच, आपल्या वरिष्ठांचा सहभाग आहे, हे जाणून कृतज्ञ राहतो, त्यांच्यापुढे नेहमी लीन असतो. याउलट जर तो मायेच्या फेऱ्यात अडकून, आपल्या यशाने मत्त होईल तर, त्याचा जो परिणाम असेल, तो कधीनाकधी, त्याला पुन्हा मूळ पदावर आणून सोडेल, किंवा त्याची यथोचित शिक्षा त्याला प्राप्त होईल. कारण शेवटी हा माज वा यश डोक्यात जाण्याची प्रक्रिया हे देखील एक कर्मच आहे आणि कर्म आपलं फल दिल्याशिवाय रहात नाही, हे निर्विवाद सत्य आहे.

याउलट जो कनिष्ठ आपली मती न जाणता, आपल्या गतीला इतर कोणाला जबाबदार धरून स्वतःलाच त्रास करून घेत असेल, त्याला मार्गभ्रष्ट व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण त्यातल्या त्यात चाललेल्या, आपल्या सुरळीत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आपली झेप आणि आपलं सद्य स्थान, याचा त्रयस्थ नजरेतून विचार न करता व जो प्राप्त गोष्टीत समाधान न मानता, असमाधानी राहील, त्याला सर्वत्र नकार, निराशा आणि अपयश दिसेल आणि मग यांच्या फेऱ्यात सापडून स्वकर्माने मार्गभ्रष्ट होणं, हेच नशिबी येईल. 

आता हे सर्व, आपलं जीवन,त्यातून आपण अपेक्षित असलेलं यश वा सुख वा आनंद आणि प्रत्यक्षातील आपला जीवन प्रवास आणि प्राप्ती यांच्याशी जोडलं तर, आपल्या लक्षात येईल की, आपण ज्याची अपेक्षा करतो, जे श्रम व कर्म करतो आणि त्या तुलनेत आपण जे प्राप्त करतो, त्यात आपलं पूर्वकर्म व त्याचं शिल्लक फल अर्थात संचित, त्या संचिता नुसार आपलं प्रारब्ध, त्याचा आपल्या विचारांवर होणारा परिणाम, त्यायोगे आपण करणारी वर्तमान कर्म, त्या वर्तमान कर्मातील चूक व बरोबर याचा, पुढे समोर येणारा परिणाम, या सर्वांची सांगड कशी आणि कधी घालणार आपण. 

की त्याच त्याच चुका, पुन्हा पुन्हा करत, परत परत कर्मगतीच्या फेऱ्यात अडकून, जन्मोजन्मी जखडून घ्यायचं, हे आपणच ठरवणार आहोत. पण त्या मार्गभ्रष्ट झालेल्या दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांप्रमाणे, आपण चुकीचा विचार करणार , की कर्म करून परिणाम सद्गुरूरूप ईश्वर यांच्या हाती सोपवून, ते सर्व सांभाळून घ्यायला खऱ्या अर्थाने समर्थ आहेत, हे मान्य करून, नीत कर्मात आणि फलत्यागाची भावना दृढ होण्यासाठी साधनेत राहणार, हे आपणच ठरवायचं आहे. कारण त्या वरिष्ठां प्रमाणे आपले सद्गुरू आणि ईश्वर आपल्या चुका संभाळून घ्यायला समर्थ आहेत. आपण फक्त मार्गभ्रष्ट होता कामा नये. सद्गुरू आणि ईश्वर आपल्याला आपल्या दोषांसकट पुढे घेऊन जातील, ही खूणगाठ बांधून चालत रहा, कर्मरत रहा, नामात रहा आणि स्वतःला मार्गभ्रष्ट होऊ देऊ नका. 

आज इथेच थांबू उद्या पुन्हा एक विषय घेऊन पुढे जाऊ. 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...