Skip to main content

भोग आणि ईश्वर १३५

भोग आणि ईश्वर  १३५
 
नित्य स्मरण त्याच गोष्टीचं करावं लागतं, जी आपल्या विस्मरणात जाते. किंवा जी मुद्दाम स्मरणात ठेवावी लागते. विषयाच्याबाबत ही गोष्ट लागूच पडत नाही. कारण ते आपल्या मनातील विचारांचा, देहाचा स्थायी भाव झाले आहेत. विषय ज्यामध्ये फक्त काम नाही तर, क्रोध, मोह, मद मत्सर इत्यादी सर्व आले. यांना आपण नित्य स्मरत असतो किंवा त्यांचं विस्मरण हीच कष्टाची गोष्ट आहे. त्यांना स्मरतच आपण जीवन जगतो.

म्हणून ज्याला स्मरतो त्याचं विस्मरण आणि ज्याला विसरलो त्याचं स्मरण अशी उलट शक्ती लावून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू केला तरच काही शक्य आहे. अन्यथा विषयाच्या आनंदात आणि सुखात आपण किती जन्म भोगण्यासाठी घालवले आणि अजून किती घालवू ते स्मरतही नाही आणि आपण मोजू शकत नाही. यातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा आणि अनुभवाने सिद्ध झालेला उपाय म्हणजे विश्वात्म्याचं स्मरण ते सुद्धा सतत, अन्यथा दुसरा उपाय नाही. 

सद्गुरू शरणी लागून त्यांच्या आज्ञेनुसार साधना करून, त्यांच्या कृपाप्रसादाने जन्मजन्मीच्या या भोगातून, दुःखातून पूर्ण मुक्ती मिळवणं शक्य आहे. पण तिथेही पूर्ण शरणागती आणि गुरूआज्ञापालन या दोन खांबांवर साधनेची इमारत उभी राहते. आज्ञापालन का हा एक प्रश्न सहज येऊ शकतो. याचाच जरा विचार करू. 

एखाद्या कार्यालयात वरिष्ठ आपल्या कनिष्ठांना काही काम देतात, त्याची रूपरेषा सांगतात, कामाची विभागणी व आखणी करतात आणि कनिष्ठांच्या क्षमतेनुसार त्या कामाचं वर्गीकरण करतात. आता कोणतं काम कोणत्या कनिष्ठाला द्यायचं याची विभागणी, वरिष्ठ आपल्या ज्ञाना नुसार आणि अनुभवानुसार करतात.  एखादा कनिष्ठ हा एखाद्या कामात फार गती नसलेला आणि संथ व कमी कुवतीचा असतो. 

त्याप्रमाणेच त्याला काम आणि वेळ दिला जातो. परंतु जसजशी तो कनिष्ठ प्रगती दाखवेल, त्याप्रमाणे  पुढील काम, वरिष्ठ त्याला देत जातात आणि त्याचाही व्यावहारिक विकास होत राहील, याची काळजी घेतात..जर त्याला कामात फार गती नसेल तर एकाच स्वरूपाच्या कामात तो थोडीफार गती मिळवेल आणि तरबेज होईल, या उद्देशाने त्याला कार्यरत ठेवून, त्याचा आब व काम दोन्ही राहील याची काळजी व चिंता खराखुरे वरिष्ठ घेतात.  यामध्ये ते कामाचा ताळमेळ, कंपनीचे नियम व कनिष्ठांची प्रगती हे सर्व साधतात. 

म्हणजे कंपनीचा मालक आणि कनिष्ठ यांमध्ये उपयुक्त माध्यम म्हणून वरिष्ठ काम करतात. याऊलट एखादा कनिष्ठ हा अनेक पातळ्यांवर झटकन प्रगती दाखवून, नवनवीन कामं शिकून, आपलं आणि कंपनीचं हित साधत स्वतःला पुढे नेतात आणि वरवर चढत जातात. या कनिष्ठांवर, वरिष्ठ अनेक जबाबदाऱ्या टाकत त्यांना पुढे नेतातच पण कंपनीचा विकास होईल हे देखील पाहतात. 

अश्या कनिष्ठाला प्रगत होताना आणि बढती घेत घेत वरवर जाताना पाहून खऱ्या वरिष्ठांना आनंद मिळतो. आता या दोन्ही प्रकारचे कनिष्ठ यांच्याकडे पाहण्याचा वरिष्ठांचा  दृष्टिकोन आणि ममत्व यावर उद्या चर्चा करूया.

 -------------------------------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...