Skip to main content

भोग आणि ईश्वर १२७

भोग आणि ईश्वर  १२७
 
कालच्या विषयासंदर्भात अजून थोडं पुढे जाऊया.  मुळात धनभार आणि ऋणभार यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न सतत करण्याची आवश्यकता असावी की नसावी ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुळात हा समतोल राखण्याचं काम वा कसरत त्यांनाच करावी लागेल, ज्यांचं मन सतत दोलायमान असतं. म्हणजेच ज्यांच्या मनात कोणताही एक भार स्थिर वा कायम राहू शकत नाही किंवा ज्यांच्या मनावर नेहमी ऋणभार प्रभावी असतो. 

ऋणभार त्यांच्याच मनावर प्रभावी असतो, ज्यांचं मन नकारात्मक विचार जास्त करतं किंवा ज्यांना निराशा, चिंता, काळजी ही पटकन प्रभावित करते. अशी मानसिकता ही सहसा कमी लवचिक आणि अति लवचिक नकारात्मक मानसिकता असणाऱ्या व्यक्तींची असते. यासाठी पुन्हा एकदा गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा विचार करूया. गुरुत्वाकर्षण हे माणसाचं वजन जितकं जास्त, त्या प्रमाणात कार्य करतं. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे, सकारात्मक गोष्टी वा धनभार हा तुलनेने हलका असतो. 

परंतु ऋणभार हा मनात वा मनाला जडत्व आणतो. मागेच दिलेलं एक उदाहरण परत पाहू म्हणजे कळेल. एक कप दुधात एक थेंब तिखट टाका, पूर्ण दूध लाल आणि तिखट होईल. हा नकारात्मकतेचा प्रभाव झाला. आता तेच दूध जर गोड करायचं असेल तर, सर्वसामान्य पणे लागणाऱ्या एक वा दोन चमचे साखरेने काम भागणार नाही. तर त्याहून जास्त साखर लागेल दुधाला पुन्हा गोड करायला. म्हणजेच ऋणभार हा माणसाला वा मनाला किती पटकन आणि किती प्रमाणात नकारात्मक बनवतो हे लक्षात येईल. 

नकारात्मक स्वरूप विद्युतभारीत ऋण कणांना, आकर्षणाचं बळ जास्त असतं. त्यामुळे त्या तिखटाप्रमाणे पटकन मनाचं जास्तीतजास्त आकाश व्यापून टाकण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. याला गुरुत्वाकर्षणातील ऋण भारित आयन अर्थात कण बळ देतात. कदाचित हे बळ पृथ्वीपासूनच्या अंतरावर अवलंबून असेल. 

म्हणूनच बरेचसे ऋषीमुनी व तपस्वी हे उंच पर्वतावर वा हिमालयातील गुहांमध्ये जाऊन तप करत असावेत. कारण त्यामुळे गुरुत्वाकर्षणातील ऋणभराचा परिणाम , तपसाधनेतील वाढणाऱ्या शक्ती व बळ यावर नकारात्मक परिणाम करू शकत नसेल. याचसाठी कोणतीही साधना, जप, योगयाग, पूजाविधी इत्यादी करताना आसन घेण्याची पद्धत पडली असावी आणि त्यामागे इतकं गहन शास्त्र आहे. 

म्हणजेच आपल्या मानसिकतेतील ऋणभार कमी करून, धनभार वाढवायचा असल्यास, सतत सकारात्मक विचार, आचार आणि उच्चार करणं गरजेचं आहे. तरीही हे सतत करत राहण्यापेक्षा मानसिकता दृढ व धनभारीत असणं वा करणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. याच ठिकाणी, ज्यांची मानसिकता ऋणभारित असते किंवा ज्यांच्या मनावर  ऋणभाराचा प्रभाव व परिणाम सहज आणि लवकर होतो, त्यांनी कायम सकारात्मक विचार करत राहिला पाहिजे. 

म्हणूनच अश्या कमी संतुलत्व असलेल्या आणि लवकर ऋण भारित होऊ शकणाऱ्या लोकांसाठी एकतर आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे किंवा अश्या क्षणिक वाढणाऱ्या ऋण भाराचा प्रभाव तात्पुरता निकाली काढण्यासाठी, विद्युत परिभाषेत सर्किट ब्रेकर असणं वा बसवणं गरजेचं आहे. असा  सर्किट ब्रेकर त्याक्षणी वेगात वाढणारा, ऋणभार कमी करून, त्याला प्रभावहीन करू शकतो. 

असा प्रभावी सर्किट ब्रेकर म्हणजे एखादा सकारात्मक विचार,  जो क्षणात लक्षात येऊन, त्याचं चिंतन त्याक्षणी सुचून, तो अंमलात आणता आला पाहिजे आणि त्याने कार्य सकारात्मकरित्या, प्रभावाने पूर्ण करून ऋणभार त्वरित शून्य केला पाहिजे. पण एखादा विचार वा वाक्य वा सुभाषित वा श्लोक क्षणात आठवून, तो मनात म्हणता यायला हवा. परंतु जर तो सर्किट ब्रेकर, एखादं छोटंसं नाम असेल तर, ते क्षणात आठवून लगेच म्हणता येऊन, त्याच्या प्रभावाने मानसिकता क्षणात ऋणभाराकडून धनभाराकडे प्रभावित होऊ शकते. 

सर्वात महत्वाचं तत्व यात लक्षात घ्यायचं की, त्या क्षणात त्या ऋण बलाचा वाढणारा प्रभाव क्षणात ब्रेक म्हणजे क्षीण करता येणं गरजेचं आहे. कारण वाढणाऱ्या कोणत्याही बळाला क्षीण करून त्याला प्रभावहीन करणं, हे प्रथम तत्व असतं, कोणत्याही युद्धाचं. मग ती लढाई मानसिक असो वा शारीरिक. मला वाटतं, ज्यांची अशी नकारात्मक वा ऋणभारित मानसिकता आहे वा जे अश्या भाराने लवकर प्रभावित होतात, त्यांना नाम हे एक सर्किट ब्रेकर म्हणून नक्कीच वापरायला हरकत नाही. 

उद्या पुन्हा चर्चा करूया. तोपर्यंत नामात रहा, गुरूआज्ञा धरून रहा आणि सतत धनभारीत राहायचा प्रयत्न करा.
-------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 
गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १"
पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...