Skip to main content

भोग आणि ईश्वर १४१

भोग आणि ईश्वर  १४१
 
लहरींबद्दल आपण इतका सखोल अभ्यास व विवेचन केल्यानंतर, आता सध्याच्या बिकट आणि विचित्र परिस्थिती वर थोडं बोलूया. विश्वात इतकी मोठी आणि विघातक लाट पसरलेली असताना, विधाता काय करतोय असा एक प्रश्न वा शंका साहजिक बऱ्याच जणांच्या मनात येत असेल. अशी शंका येणं गैर आहे की नाही यावर चर्चा न करता हा विषय पुढे नेऊया. मुळात अश्या वैश्विक उलथापालथ करणाऱ्या घटना, वावटळं वा वादळं ठराविक अंतराने येत असतात.

अश्या वादळात हिमपर्वत उखडले जातात तर समान्यांचं काय असा एक रास्त प्रश्न यातून उभा राहतो. विचार करा की, विश्वातील जवळजवळ सर्व देश आणि त्या देशां मधील सर्वच्या सर्व नागरिक, वेगवेगळ्या प्रकारे यातून भरडले जात आहेत. महामारी वा अन्य संकटं हे एक कारण असतं, पण मूळ तर्कसंगती ही सूर विरुद्ध असुर, सुष्ट विरुद्ध दुष्ट, सात्विक विरुद्ध महापापी अश्या शक्तींचा वैश्विक वा कदाचित ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा संघर्ष होत असण्याचा हा काळ असू शकेल, असं माझं वैयक्तिक मत आहे.

अश्या प्रकारच्या ब्रह्मांडीक संघर्ष घटना पुराणकाळात आपण देवासुर संग्राम म्हणून वाचल्या असतील. त्या वा तश्या घटना या कपोलकल्पित नव्हत्या हे लक्षात घेण्या सारखं आहे. युद्ध वा लढाया, राजकीय वा धार्मिक  संघर्ष ह्या तशा किरकोळ घटना ठराव्यात वा वाटाव्यात असा आताचा काळ आला आहे आणि यात चांगलं, अतिचांगलं सात्विक अतिसात्विक या सर्वांची वैश्विक कसोटी वा परीक्षा आहे. पुराणकाळात देवासुर संग्रामात कित्येकदा, देवांचं पारडं कमजोर होऊन असुरांचा विजय होत आहे, अशी परिस्थिती निर्माण होत असे. 

यात जे कमजोर आहेत, कोणत्याही कारणाने,ते संपून, ज्यांची इच्छाशक्ती, आत्मशक्ती दृढ आणि बलवान आहे, त्यांना  यातून तरून जायला योग्य वातावरण नक्की निर्माण होत असे. याकाळात, सजग राहून, आपल्या साधनेवर, इष्टदेवतेवर, इच्छित लक्ष्यावर सार्थ विश्वास, श्रद्धा ठेवून राहतील, त्यांना सुखरूपपणे यातून तावून सुलाखून बाहेर पडता येईल. आता,  सोन्याच्या कसोटीचा आगीतून जाण्याचा काळ आहे, असं माझं मत आहे. 

काहीजण म्हणतील की हे मानवनिर्मित संकट वा आपत्ती आहे. अर्थातच हे मानवी देहात व्याप्त असुर शक्तींनी निर्माण केलेलं आणि वैश्विक वा ब्रह्मांडातील सात्विक शक्तींना एकप्रकारे दिलेलं आव्हान आहे. काळ कलि युगाचा असल्यामुळे आणि कली स्वतः असुर शक्तींना तारणारा असल्यामुळे, ही आपत्ती वैश्विक रूप धारण करून, जगव्याप्त झाली. आता हे कलियुग असल्यामुळे प्रत्यक्ष देवावतार हा सध्यातरी अशक्य वाटतो.

मग यावर उपाय काय. यात एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की असुरशक्तीसुद्धा सूक्ष्म रुपात म्हणजेच चर्मचक्षुना न दिसणाऱ्या स्वरूपात आहे. अर्थातच निर्गुण व निराकार रुपात म्हणजे अप्रकट रुपात विश्व व्यापून आहे. म्हणजेच असुर वा अरी अर्थात शत्रू जर निर्गुण आणि निराकार आहे, तर अश्या शत्रूच्या दमनासाठी सूर वा देवशक्ती सूक्ष्म वा निर्गुण निराकार रूपातच म्हणजेच अप्रकट स्वरूपात संघर्ष करू शकते. 

पण निर्गुण निराकार रुपात प्रकट होणं अशक्य आहे. म्हणजेच हे युद्ध विषम होत आहे, असं माझं मत आहे. कारण असुर शक्ती तेजमय आणि अप्रकट असून परिणामकारक वाटते आहे आणि सुरशक्ती प्रत्यक्ष येऊन त्यांच्याशी संघर्ष करू शकत नाहीत. कारण शत्रू दिसतच नाही.  मग सात्विक शक्तींची तेजवृद्धी होऊन हा संघर्ष विषमतेवरून समान पातळीवर आणणं हे प्रथम कर्तव्य आहे. यात आरोग्य कर्मचारी आणि इतर सर्व प्रत्यक्ष जखमी नागरिकांची सेवा करण्यात व्यग्र आहेत. 

मग या सुप्त असुर शक्तींचा सामना करण्याची शक्ती, प्रेरणा व उपाय काय आणि यात आपण प्रत्येकजण काय करू शकतो, हे पुढील भागात बघूया. पण तोपर्यंत नामात रहा, कर्मरत रहा, साधना वाढवा आणि स्थिरचित्त रहा. 

उद्या पुन्हा भेटूच. 

 -------------------------------------------------------------

लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...