Skip to main content

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय.

विश्वास आणि श्रद्धा म्हणजे नक्की काय. 

© संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

विश्वास म्हणजे मनाला एखाद्या गोष्टीची वाटणारी.शाश्वती किंवा खात्री, जी मनाला पुढे जाण्यास गती देते. विश्वास हा सहसा दिसणाऱ्या वा अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीं बद्दल असतो.

पण श्रद्धा ही फक्त शुद्ध सात्विक आणि या जगतापार असलेल्या आणि तरीही जगताचा आधार असणाऱ्या, ईश्वर व सद्गुरूरूप चैतन्यशक्तीबद्दल असते.

म्हणून जगतात दिसणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाबद्दल विश्वास असावा आणि त्याच्या न दिसणाऱ्या, पण निरंतर प्रत्ययाला येणाऱ्या, अनुभूतीबद्दल श्रद्धा असावी.

विश्वास म्हणजे पुरुष आणि श्रद्धा म्हणजे प्रकृती अर्थात विश्वास हा शिव आणि श्रद्धा ही शक्ती आहे. दोघेही एकमेकांच्या आधाराने असतात. दोघेही एकत्र असावेत अन्यथा दोघेही अपूर्ण आहेत.

विश्वास हा आपल्या मनाचा अध्यात्मिक सहभाग आणि श्रद्धा ही ईश्वरीय सहभागाची खात्री समजावी.

म्हणजेच आपल्या मनात विश्वास असेल तर, आत्म्याच्या माध्यमातून, ईश्वर तुम्हाला श्रद्धेचा त्याचा सहभाग प्रकट करतो. त्यामुळे विश्वास नसेल तर श्रद्धा दोलायमान असते. पण विश्वास असेल तर, श्रद्धा दृढ असते.

अध्यात्म यज्ञातील हवनात, विश्वास हा मानवाचा स्वाहाकार असतो, तर श्रद्धा ही ईश्वराच्या वरदानाची पावती वा प्रचिती आहे. 

म्हणून आधी विश्वास ठेवला की, त्यापाठोपाठ श्रद्धा आपला प्रत्यय व प्रचिती देते.

© संकल्पना, मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०८/२०२३

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...