Skip to main content

अध्यात्म विराम १९५

अध्यात्म विराम १९५

पूर्ण श्रद्धा असा शब्दप्रयोग खरतर चुकीचा आहे असं माझं मत आहे. जर आपल्या मनातील भाव व विश्वास हा पूर्ण नसेल तर,त्याला श्रद्धा म्हणताच येणार नाही. कारण ज्याच्यावर आपल्याला पूर्णतः विसंबून राहता येईल, असा एकमेव परम अंश जगतात आहे आणि तो म्हणजे ईश्वर. हा एकच असा आहे की, जो कधीही आपल्या भक्ताला निरुत्साही करत नाही, कधीही निराश करत नाही किंवा कधीही आपल्या ब्रीदापासून ढळत नाही. याच्यावर ठेवलेला विश्वास कधीही खोटा ठरत नाही. विश्वंभर असलेला हा विश्वात्मक ईश्वर अवघ्या विश्वाची प्राणशक्ती, आपल्या हृदयातून नियंत्रित करतो. 

आताच्या परिभाषेत तो या जगताचा महा संगणक आहे. या जगतातील सर्व जडजीव या महासंगणकाला स्थानीय कार्यप्रणालीने (lan किंवा प्रभू लीलेने), जोडलेले छोटे छोटे संगणक आहेत. जे तारारहित तंत्रज्ञानाने, मुख्य असलेल्या महा संगणकाला जोडलेले असतात. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यां ज्ञानाचेचं उगम स्थान, हे अनंत काळा पासून अस्तित्वात असलेल्या ज्ञानात आहे. आता हे छोटे छोटे संगणक, जे जे कार्य करतात, त्याची आज्ञावली अर्थात प्रोग्राम नक्की असणारच. 

पण तो लिहितो कोण हा प्रश्न निर्माण होतो. तर ती देहात आल्यावर आज्ञावली लिहिण्याच स्वातंत्र्य, ईश्वराने प्रत्येक संगणकाला दिलेलं आहे. ते देताना उपजत ज्ञान देऊन प्रत्येक संगणकातील माहिती साठवणाऱ्या तबकडी अर्थात हार्ड डिस्क ड्राइव्ह प्रमाणे हृदयातील आत्म्यात, ही व्यवस्था निर्माण करून, पुढे या जगतात, स्थापित केलेलं असतं. या तबकडीला मानवी देहाचा संगणक लागतो. ज्यामुळे ही सर्व यंत्रणा कार्यरत होऊन, या जगतात, ईश्वराने धाडलेली प्रत्येक तबकडी, पुन्हा विधात्यकडे परत गेली पाहिजे, ही ईश्वरीय अपेक्षा अर्थात objective आहे. 

पण त्यासाठी प्रत्येक संगणक रूप देहाला, आतील हृदय रूप तबकडी, कार्यरत करून, त्यातून योग्य ती माहिती साठवून,त्याचा सदुपयोग करून,आपल्या महा संगणकाशी जोडणी पूर्ण करून, महा संगणकातून प्राप्त आदेशांचे पालन करणे, याची आज्ञावली दिलेली आहे आणि हे एकच मुख्य कार्य त्या तबकडीचं असते.त्यासाठी तो छोटा संगणक महा संगणकाला जोडला जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि तरच, आदेश प्राप्ती होईल आणि विधात्याला अपेक्षित कार्य पार पडू शकेल. आता ही जोडणी कशी करावी याचं उपजत ज्ञान प्रत्येक तबकडी मधे घालूनच आत आत्मारुप तबकडी, या जगतातील कार्यालयात पाठवलेली असते 

परंतु, त्याचा संयोग देहरूप कार्य व्यवस्थेशी आला की, जसं दोन गोष्टींच्या,मूलद्रव्यांच्या वा पदार्थांच्या संयोगातून काही तरी प्रक्रिया घडते आणि नवीन पदार्थ वा प्रणाली तयार होते. पण या संयोगामध्ये, जो पदार्थ वा द्रव जास्त शक्तिमान असेल, तो दुसऱ्या पदार्थाला निष्प्रभ करतो. त्याचप्रमाणे या भुलोकात, मायारुप शक्तीने प्रेरित देहरुप व्यवस्था भारीत होते आणि त्यायोगे देह, बुद्धी आणि मन यांची क्षमता, शक्ती ही श्रेष्ठ किंवा प्रबळ ठरते.अर्थात त्यामुळे, त्या देहाला प्राप्त तबकडीतील मूळ शुद्ध सात्विक आज्ञावली, ही झाकोळली जाते आणि त्यावर नको असलेले कर्म संदेश, ज्ञान संदेश व संस्काररूप आज्ञावली कोरली जाते.

मूळ शुद्ध ज्ञानरूप आज्ञावली अर्थात प्रोग्राम हा हळूहळू अकार्यक्षम होऊन, तो तबकडीचच्या स्मरण व्यवस्थेतून सुप्त व्यवस्थेत अर्थात सुप्त मनात, मागे टाकला जाते. ही स्मरण व्यवस्था विधात्याने, या तबकडीला सतत कार्यरत व महा संगणकाशी जोडलेले अर्थात connected राहण्या साठी केलेली असते. पण भुलोकातील सदोष माहिती,ज्ञान आणि कर्म यामुळे,मूळ आज्ञावली अकार्यक्षम होते आणि विधात्याने प्रत्येक संगणकाला दिलेल्या कर्म स्वातंत्र्यामुळे, प्रत्येक देहरुप व्यवस्था आपली स्वतःची आज्ञावली अर्थात प्रोग्राम लिहून, तोच कार्यरत करते. 

यातून घडणारी सदोष व्यवस्था, मूळ तबकडीचं शुद्धी करण व पुनरुज्जीवन यासाठी पुन्हा विधात्याची कार्य व्यवस्था आहे. पण त्यावर चिंतन उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...