Skip to main content

राम अनुज भरत भाग ११

राम अनुज भरत भाग ११

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

 निषादाच्या सैन्यातील प्रत्येकाने आपली आपली नेमून दिलेली जागा घेऊन, येणाऱ्या सैन्याकडे व राजा गुहा यांच्या आदेशाकडे नजर ठेवून, सावध पावित्रां घेतला. इकडे मुख्य रथात सर्वात पुढे असलेले, भरत यांनी आपला रथ थांबवण्याचा आदेश दिला. त्याबरोबर सर्व सैन्य एका जागी स्तब्ध झालं. भरत समोर दिसणाऱ्या सज्जतेकडे पहात आपले ज्येष्ठ मंत्री आर्य सुमंत याना म्हणाला

" आर्य, समोर कोण आहे आणि त्यांच्या हालचाली काय सुरू आहेत, याबद्दल काही सूचना घेता येईल का. "

आर्य सुमंत म्हणाले की,

" राजकुमार भरत, हा निषादांचा प्रदेश आहे आणि समोर दिसणारं सैन्य अर्थात निषाद म्हणजेच मल्लाह यांचं आहे. येथून जाणाऱ्या यात्रेकरू, गरजू याना, गंगा नदीच्या या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाणं आणि पलीकडील तीरावरील यात्रेकरूंना इकडील तीरावर घेऊन येणं, हे यांचं कमाईच, जगण्याचं व उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे या प्रदेशात त्यांची सत्ता आहे. "

"अर्थातच अयोध्येशी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध आहेत. महाराज दशरथ इथे अनेक पारंपरिक, कार्य, पूजा, तीर्थयात्रा या निमित्ताने, यांच्या आमंत्रणाने व स्नेहाने आले होते. आपले ज्येष्ठ भ्राता श्री रघुनाथ हे देखील इथे येऊन जात असतं.अर्थातच या दृढ संबंधा कारणे श्रीरामांनी यांच्याच सहाय्याने गंगा पार केली आणि ते पुढे मुनी भारद्वाज यांचा आश्रम व गुरुकुल आहे. 

तिथे महर्षींचां आशिष घेऊन, पुढील स्थानी गेले. ज्याचं नाम प्रयागराज आहे. सृष्टिकर्ते श्री ब्रम्हदेव यांनी याच स्थळी सर्वात प्रथम यज्ञ अर्थात याग केला, याकारणें सर्व यागांचा आद्य म्हणून त्या स्थानाला प्रयागराज असं संबोधण्यात येत. प्र म्हणजे प्रमुख किंवा प्रथम जिथे याग झाला, ती भूमी अर्थात सर्व यागांचा राजा"

"अर्थातच आपल्याला सुद्धा या निषादांच्या सहाय्याने गंगा पार करून, पुढे जायचं आहे. म्हणून आपण त्यांना सामोरं जाऊन, पुढील जाण्याच्या यात्रेची व्यवस्था करून येऊ. तोपर्यंत आपल्या सोबतचे सर्वजण येथेच थांबतील." ' 

भरताने या योजनेला त्वरित होकार देऊन, आपल्या रथा वरून बाहेर येणे केले. आर्य आणि भरत, भ्राता शत्रुघ्न याला तिथेच थांबण्याची सूचना देऊन, निषाद राज गुह यांचेकडे प्रस्थान करते झाले. निषाद नरेश गूहाने, समोरून राजकुमार आणि आर्य याना येताना बघून, त्यांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. पण पुरेशी सावधगिरी बाळगून व आपल्या सोबत आपल्या विश्वासू व पराक्रमी बंधुला सोबत घेऊन. दृष्टीच्या टप्प्यात येताच भरताने गूहाला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाला

" हे निषाद राज गूह, आपल्याला माझा आणि समस्त अयोध्या पुरीचा नमस्कार. आपण अत्यंत भाग्यवान आहात की, आपल्याला, माझे ज्येष्ठ भ्राता व जगतातील सर्वात पराक्रमी वीरपुरूष नर शार्दुल श्रीराम याना वनात जाताना, सर्वात प्रथम सहाय्य करण्याचा मान मिळाला. याकारणें प्रभूचं शेवटचं दर्शन प्राप्त झालेले आपणच आहात. म्हणून मी आपल्याला सादर वंदन करतो. 

ज्या नेत्रांनी माझ्या बंधुंचं दर्शन घेतलं, त्यांना मी वंदन करतो. ज्या करांनी त्यांची सेवा केली, त्या करांना मी वंदन करतो. ज्या छातीशी प्रभूंनी आपली छाती लावून, आपल्याला हृदयाशी धरलं त्या छातीला व त्या हृदयाला मी प्रणाम करतो. ज्या आत्मतेजाला, कौसल्या नंदन श्रीराम यांनी जागृत केलं त्या आपल्या देहातील आत्म तेजाला मी साष्टांग दंडवत घालतो. 

मी आपल्या इतका भाग्यवान नाही. कारण मी कैकेय देशी मातुल गृही असल्यामुळे, प्रभू, वनवासात जाताना पाहू शकलो नाही. अर्थात मी इथे उपस्थित असतो तर हा अप्रिय प्रसंग घडलाच नसता. मी खचितच हे घडू दिलं नसतं. त्यामुळे आपल्या सारख्या भाग्यवंताला नमन करून, मीदेखील स्वतःला धन्य मानतो." 

वंदन करणारे भरताचे दोन्ही हात धरून, निषादाने आपल्या लोचनांना लावले आणि म्हणाला.

"आपण माझ्या स्वामींचे भ्राता आहात. आपण स्वामीं समान. आपण मला वंदन करणं म्हणजे मी घोर पापाचा धनी होणं आहे. परंतु मला एका गैरसमजाची कबुली द्यायची आहे. आपल्याला ससैन्य येताना पाहून, मी समजलो होतो की,....

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...