Skip to main content

राम अनुज भरत भाग १५

राम अनुज भरत भाग १५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

यात्रा, प्रयाग क्षेत्री, भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या परिसरा जवळ येऊन पोचली. भरताने, सुमंतांना, थांबण्याची आज्ञा केली. सुमंत भरत रथातून खाली उतरले आणि विचार विनिमय करून, भरत शत्रुघ्न ला म्हणाला. 

" हे सौमित्र, तू येथील व्यवस्था बघ, मी, आर्य सुमंत आणि काही निवडक प्रतिनिधी, महर्षी भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन, पुढील व्यवस्था पाहतो. तद्नंतर, इकडे तुला त्यानुसार संदेश धाडतो. त्यानुसार, तू सर्वांना घेऊन, आश्रमाकडे ये. " 

अर्थातच शत्रुघ्न यावर समंती दर्शवून म्हणाला

" आपला संदेश येईपर्यंत मी येथील व्यवस्था पाहतो. आपण निश्चिंत मनाने व अविचल चित्ताने, महर्षींना विनंतीपूर्वक आश्रम वा त्यानजिक उतरण्याची अनुमती मागावी. आपल्या रघुकुलाची अलौकिक कीर्ती जाणून, महर्षी नक्कीच योग्य ती अनुमती देतील. श्रीराम चिंतन आपल्याला यात यश प्रदान करेल. "

शत्रुघ्नची अनुमति घेऊन, निवडक मंत्रीगण व सेवक यांना घेऊन, भरत आणि आर्य सुमंत भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या प्रवेशद्वाराशी आले. अत्यंत रमणीय स्थानी, महर्षींचा आश्रम होता. वनाच्या मध्यभागी असलेला हा आश्रम आणि अश्रमापासून जवळच गंगेचा निर्मळ प्रवाह, होता. गुरुकुल पद्धतीने, शिक्षा प्राप्तीसाठी येथे अनेक पाठक, वस्तीला होते. 

त्यांची, नेमून दिलेल्या कार्यासाठीची लगबग, जलप्रबंध, फलमूल यांची व्यवस्था, कंदमुळं शोधून आणण्यासाठी त्यांची लगबग, आश्रमाच्या संपूर्ण परिसराची नित्यनेमाने केली जाणारी स्वच्छता, आपापल्या पर्णकुटीची व्यवस्था, गुरुदेव भारद्वाज यांच्या आज्ञा पालनासाठीची कार्य कुशलता, महर्षींनी दिनक्रमाच्या योजलेल्या साधनेची, पाठाची तयारी या सर्वात तो आश्रम निमग्न होता.

अर्थातच, आश्रम विस्तीर्ण परिसरात पसरलेला असल्या मुळे, तेथे कार्यार्थ मग्न असलेल्या काही सहपाठकांशी, आर्य सुमंत यांनी संवाद साधून, महर्षींच्या पर्णकुटीचा मार्ग विचारून घेतला. त्यापैकी, एका सहपाठीने, सोबत येऊन गुरुदेव भारद्वाज मुनी यांची पर्णकुटीचं स्थान दाखवण्यासाठी अगत्य दाखवून, आपल्या पाठोपाठ येण्यास विनवले. अर्थातच राजकुमार भरत, आर्य सुमंत आणि सोबत आलेले निवडक अधिकारी,त्या पाठकाच्या मागोमाग आश्रमाच्या दिशेने प्रस्थान करते झाले. 
त्या सहपाठीच्या मागे चालताना भरत परिसराचं आणि आश्रमाच निरीक्षण व अवलोकन करत होता तो संपूर्ण परिसर, वनातील वृक्ष, वेली, लता, छोटी छोटी फुलांची झाडं, फळांची झाडं,डेरेदार व विस्तीर्ण महाकाय वृक्ष, हे सारे दृश्यमान विश्व, मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करणारं होतं. इतक्या सुखमय, शांतीमय वातावरणाने, दिवस भराचा प्रवासाचा शीण कधीच नाहीसा केला होता. वनाने सुशोभित त्या विस्तीर्ण आश्रम परिसरात, छोटे सुंदर फुलांचे ताटवे, अनेक छोट्या छोट्या पण स्वच्छ असलेल्या आणि पायाखालील तृण अर्थात गवत साफ करून, सुंदर नक्षीकाम करून सजवलेल्या मार्गिका होत्या. 

बाजूने वाहणाऱ्या नदीतून, सुंदर पाट काढून, त्यातून तयार केलेले छोटे छोटे शेतमळे, त्यामधे लावाण्यात आलेला भाजीपाला, त्यांची निगा राखून, त्यांना योग्य ते पाणी मिळण्यासाठी कामात व्यग्र असलेले आणि गुरु कुलात वस्ती साठी असलेले विद्यार्थी व त्यांचं एकाग्र चित्त सुरू असलेले कार्य अद्भुत होतं. 

काही अंतर वनातील वाट चालून गेल्यावर, महर्षींनी पर्णकुटी, त्या शेजारी असलेली अग्निशाला लाबून दिसली. त्या सहपाठीने, दुरूनच पर्णकुटी दाखवून दिली आणि नम्रपणे प्रणाम करून, परत आपल्या कार्यासाठी जाण्याची अनुमती मागितली. भरत या नम्र वागणुकीने आणि संस्कार मय वागण्या बोलण्याने भारावून गेला. त्या सहपाठीच्या निर्मळ स्मिताने, अत्यंत हर्षाने भरताने त्यास अनुमती दिली. समोर काही अंतरावर महर्षी भारद्वाज यांची पर्णकुटी दिसत होती. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२३/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...