Skip to main content

राम अनुज भरत भाग १४

राम अनुज भरत भाग १४

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

इतर छोट्या व मध्यम नौकेत, राजकुमार भरत, शत्रुघ्न, आर्यसुमंत एका नौकेत, इतर मंत्रीगण बाकीच्या अनेक नोकांमधुन वेगवेगळे जाण्यास निघाले. हे सर्व बसल्यावर, भरलेल्या, छोट्या, मध्यम व मोठ्या नौका,पलीकडील किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. अश्याप्रकरे काही फेऱ्यांमधून, सर्व सैन्य, राज परिवार व सर्व प्रजाजन पलीकडील तीरावर पोचले. 

त्यांना तिकडे सोडावयास गेलेल्या गुह आणि त्याच्या विश्वासू साथीदारांनी, साश्रू नयनांनी निरोप घेतला. गुहाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन, भरताने त्याला एक आलिंगन दिले आणि आपल्या हृदयाशी धरले. साश्रू नयनांनी भरत गुहाला म्हणाला

" निषाद राज आपण याचं हातानी माझे पूजनीय ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना या तीरावर आणून सुखरूप सोडलत. आपले हे उपकार अयोध्या, रघुकुल आणि व्यक्तिशः मी व ज्येष्ठ भ्राता आजन्म विसरू शकणार नाही. आपण अजून एक महत्कार्य माझ्यासाठी करावं." 

गुहांच्या नयनात सुद्धा अश्रुधारा आल्या होत्या. तश्याच डबडबलेल्या स्वरात, आपल्या घनगंभीर वाणीत गुह म्हणाला

" आपण उपकार शब्दप्रयोग करून, आम्हाला लाजवत आहात. स्वामींना घेऊन जाणं हा आमचा धर्म आहे आणि आम्ही फक्त धर्मपालन केलं. आपली जी आज्ञा आहे, ती सांगावी, प्राण मागितलेेत तर तेदेखील अवघी निषाद प्रजा, आपल्या सारख्या पुण्यात्म्यांसाठी हसत हसत देईल. आपण फक्त आज्ञा करावी." 

इतकं बोलून निषादाने, भरताचे चरण धरले. त्याला खांद्याला धरून उठवत, भरत म्हणाला की,

" आपण , काशी विश्वेश्वराला प्रार्थना करावी की, त्यांच्या कृपेने, प्रभूंना परत आणण्यात मला यश येवो. श्री कैलाश नाथ, भ्राताश्रींना योग्य ते करण्याची सुबुद्धी देतील आणि ते माझी विनवणी ऐकून,पुन्हा अयोध्या येऊन राज्य कारभार हाती घेतली. अजून एक आज्ञा आहे निषाद राज, आपणही आमच्या सोबत, भ्राता श्रींना घेऊन येण्यास, चालावं. " 

गूहानें, आपले दोन्ही हात जोडून, अश्रूमय नेत्रांनी याचा स्वीकार केला आणि भरत वळून, आपल्यासाठी असलेल्या पालखीत बसला. सर्व राजमाता, स्नूषा आणि इतर राजपरिवार हे आपल्या आपल्या रथात स्थिरावले. भरताच्या विनंतीचा स्वीकार करून अर्थातच,निषादराज, आपल्या सोबत निवडक सैन्य, आपल्या परिवाराला घेऊन, निघाले. त्यांनाही एक स्वतंत्र रथ, अश्व व्यवस्था करून देण्यात आली. आता सर्व प्रस्थानास तयार आहेत, याची खातरजमा सुमंत यांच्याकडून मिळाल्यावर, भरताने सर्वांना भारद्वाज मुनींच्या आश्रमाकडे, प्रयागच्या दिशेने कूच करण्याची आज्ञा दिली. 

भरताच्या आज्ञेला प्रमाण मानून सुमंतांनी, सर्वांना प्रस्थान करण्याची सूचना केली आणि सर्व रथ, गज, अश्वदळ, पायदळ व या सर्वांच्या सुरक्षेत, सोबत आलेले, अयोध्येचे प्रजाजन शंख,वाद्य, भेरी, तुतारी, ललकाऱ्या, राजकुमार श्रीराम, देवी सीता, लक्षण, भरत व शत्रुघ्न यांचा जयजय कार करत, निघाले. या जयजयकाराचा ध्वनी आणि त्याचा साद प्रतिसाद आसमंतात घुमत होता. जणूकी स्वर्गातील सुरवरांना हा निनाद कानी पडत होता. 

मजल दरमजल करत मार्गात विश्रांती आणि न्याहारी व भोजन यांसाठी मुक्काम करत, ही रामनामाचा गजर करणारी भक्ती रसाची निष्पत्ती करणारी, भूलोकी वैकुंठ निर्माण करणारी, सर्व भाव एक केलेली आणि एकाकार यात्रा, प्रयाग क्षेत्री, भारद्वाज मुनींच्या आश्रमाच्या परिसरा जवळ येऊन पोचली. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२२/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...