Skip to main content

राम अनुज भरत भाग १७

राम अनुज भरत भाग १७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

एकूणच सारा आश्रम परिसर, बहरलेली व डवरलेली फुलं, पक्व होण्यास सज्ज असलेली फळं, यांच्या समिष्रीत बहारदार आणि नसिकांना समोहित करणाऱ्या गंधाने भारलेला होता. आलेला प्रत्येक विद्यार्थी, पाठक, आश्रमवासी, सन्यासी, ब्रम्हवृंद त्या संपूर्ण परिसराला आपलंच गृह जाणून, त्या आश्रम परिसराला सुशोभित, स्वच्छ आणि नयनरम्य ठेवण्यासाठी मनापासून कार्य करताना दिसत होता. त्या भारलेल्या समिश्रीत गंधाने, भरत आणि आर्य सुमंत यांसह सर्वांच्या मनाला प्रफुल्लित, पवित्र आणि प्रसन्न केलं. 

"या सर्वांचा मनावर परिणाम होऊन, येथेच थांबण्याचा मोह मनाला लागला आहे, आर्य सुमंत. असं वाटतं की, राज्यभार एकदा ज्येष्ठ भ्राताश्री, आकाशस्थ मेघांसम नीलवर्णी श्रीरघुंनंदन याना सोपवला की, येथेच कायम स्वरूपी राहण्याची तीव्र इच्छा जागृत होत आहे." 

" महाबली, कुमार भरत, आपण या आश्रमात येऊन, येथील अतिथ्य स्वीकारण्यास, कधीही याव, असच आम्हा सर्व आश्रम वासीयाना वाटतं आहे." 

आपलं आग्निहोत्र कार्य संपन्न करून, त्याच्या पुढील पूजाविधीच्या पूर्ततेची व्यवस्था लावून, भरताच्या आगमनाची सूचना प्राप्त होताच, भरताला आश्रमात आमंत्रित करण्यास्तव, भरताच्या पाठीमागे आलेले महर्षी भारद्वाज, भरताचं कथन ऐकून उत्तरले. भरताने व आर्य सुमंत यांनी त्वरित मागे वळून, महर्षींना पाहिलं. भरताने विनम्रतेने दोन्ही कर जोडून, चरण वंदन करून, महर्षींचे कृपाशीर्वाद प्राप्त केले. आर्य सुमंत व इतर मंत्रीगण यांनीही त्याचं अनुकरण करून, आशीर्वाद प्राप्ती केली.

अशिर्वच मंत्र उच्चारून, ऋषीवर भरताला म्हणाले, 

"हे परमप्रतापी महावीर, श्री दशरथ यांच्या पराक्रमी सुपुत्रा, आपण आश्रमात, अतिथी सेवार्थ असलेल्या कुटीत बसून, पुढील वार्तालाप करूया, असा माझा मानस आहे."

भरत विनम्र स्वरात वदता झाला.

"अर्थातच आपली आज्ञा शिरोधार्य आहे, महर्षी. आम्ही आपल्या पावलांप्रणाने आपल्या पाठोपाठ येतो." 

ऋषिवर आपल्या मागून, भरताला आणि इतर मंत्रीगण व आर्य सुमंत याना घेऊन, आपल्या पर्णकुटी शेजारी असलेल्या उत्तम शाकारालेल्या एका कुटीत घेऊन गेले. तिथे अर्थातच भूवर उच्च आणि उत्तम आसन व्यवस्था केलेली होती. त्यावर स्वच्छ कसलेल्या मृगाजीनाचं आसन घालून, व्यवस्था चोख ठेवली होती. त्या आसना शेजारी तांब्याच्या कलशात आणि चांदीच्या कलशात जल भरून ठेवण्यात आलेलं होतं. आर्य सुमंत यासह मंत्रीगण यांनी तांब्याच्या पात्रातून तांब्याच्या पेल्यात जल भरून आपली क्षुधा शांती करून घेतली. 

तिथे उपस्थित द्विजवरांनी, राजकुमार भरत याला चांदीच्या पात्रातून, चांदीच्या पेल्यात जल भरून, जलपान करवले. अर्थातच, सर्वांची क्षुधा शांती झाल्याच्या पश्चात, महर्षी भारद्वाज यांनी, भरताला प्रश्न केला. 

" हे प्रतापी,अयोध्या कुमार, भरत, आपला येथपर्यंतची यात्रा सकुशल आणि निर्विघ्न झाली ना. आपल्या मार्गात आपदा विपदा काही आल्या नाहीत ना.आपल्या सर्व माता सुस्थितीत आहेत ना. " 

मुनींच्या प्रश्नाला भरताने उत्तर दिले. 

"ऋषिवर आमचे कुलगुरू महर्षी वसिष्ठ आणि आपल्या आशीर्वादानेच आम्ही सुस्थित आहोत. पण गत काळा तील काही मन विदीर्ण करणाऱ्या मानव निर्मित घटनांनी, मन दु:खाश्रूनी व्याकूळ आणि व्यथित झालेलं आहे व काळीज हेलावून गेलेलं आहे. आपण त्रिकाल ज्ञानी आहात. तस्मात् आपण जाणता." 

तेजोवलयांकित महर्षी एकाग्र चित्ताने भरताचा शब्द अन् शब्द कर्ण आकृष्ट करून ऐकत होते. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

क्रमशः 
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२५/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...