Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

भोग आणि ईश्वर २७४

भोग आणि ईश्वर  २७४ वास्तविक आपण सुरवात, ईश्वराच्या  आराधनेला  नाम घेत लगोलग त्याच्या स्मरणाने करतो आणि इथेच आपण खरतर चूक करतो. आपल्या मनाला अनेक वर्षे सवय नसते, त्यात सध्याची व्यवधानं, व्याप, व्यस्तता इतकी आहे की, नामस्मरण सुरू करा असं म्हणणं आणि नामस्मरणाची गोडी लागणं, यात खूप अंतर आहे. अर्थात असंही म्हटलं जातं की, एकदा सुरू करा , गोडी त्यामागून आपोआप येईल.  पण याबाबतीत माझं मत थोडं वेगळं आहे. मनाला त्याबद्दलची ओढ लगेच लागली नाही किंवा मन त्यात गुंतलं नाही तर चांगली गोष्ट वा सवय किंवा उपासना व साधना असूनही, मधेच सुटण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यातून अवेळी मनाची निवृत्ती होण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास वृत्तीतील अनिष्ट प्रवृत्ती जास्त जोरात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. याच करता आपण दोन भागात बघितलं त्याप्रमाणे आधी श्रवण, मनन, चिंतन, श्रवण केलेला नामाचा, प्रार्थनेचा, कल्पनेतील नादाचा  आनंद अनुभवण्याची सवय व गोडी एकदा लागत गेली की, तद्नंतर नामाकडे त्याला हळूहळू वळवता येईल, असं माझं प्रामाणिक मत आहे.  मुळात जन्माला येण्याआधी आणि मागील जन्मातील देह सोडल्य...

भोग आणि ईश्वर २७३ - श्रवण-मनन-आनंद-नाम

भोग आणि ईश्वर  २७३ - श्रवण-मनन-आनंद-नाम श्रवणाचा आनंद घ्यायची गोडी मनाला हळूहळू लागेल. तशी गोडी लागते आहे किंवा लागली हा आत्मविश्वास जागृत झाला की मग, त्या श्रवणाच्या मननाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जे आपण प्रत्यक्ष ऐकत आहोत, तेच कल्पनेत ऐकण्याचा किंवा कल्पनेत आणण्याचा प्रयत्न करावा. मन खरतर कल्पनेत अनेक गोष्टी करू शकतं किंवा करतं. आपण कल्पनेत दूरवर भरारी मारून अनेक गोष्टी पाहतो अगदी ऐकतोसुद्धा.  हो हे वास्तव आहे की कल्पनेत आपण अनेक गोष्टी करतो, ज्या प्रत्यक्षात शक्य नसतील, किंवा होऊ शकत नसतील. काहीजण ज्याला दिवास्वप्न म्हणतात ते. मग याच आपल्या कल्पना शक्तीचा सदुपयोग करून घ्यायला हरकत नाही, असं मला स्वतःला वाटतं. म्हणजेच जे आपण श्रवणातून मनापर्यंत पोचवलं तेच डोळे बंद करून, मनातल्या मनात गुणगुणण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न तेंव्हाच जमेल जेंव्हा, श्रवण उत्तम व मनापासून केलं असेल.  या कल्पनेतील श्रवणाचा आनंदसुद्धा अलौकिक आहे. एकप्रकारे ही सुद्धा ध्यानधारणा पद्धतीच आहे. ज्यामध्ये मनाने कल्पनेतील एखाद्या लक्षावर केंद्रित केलं जातं. आपण पहिल्या टप्प्यात नित्य ऐकू...

भोग आणि ईश्वर २७२

भोग आणि ईश्वर  २७२ मनात येणाऱ्या विचारांच्या लाटांवर विचार करत, पण त्यात न गुंतता, तटस्थपणे, आपण अभ्यास करण्याचा सराव काही काळ नियमाने व नित्य केला तर लक्षात येईल की, यात चिंता जास्त आहेत.  म्हणजे काही गतकाळातील आपल्याच चुकांची जाणीव वा जागृती आणि त्याच्या भविष्यात होऊ शकणाऱ्या वा येईल असं वाटणाऱ्या  परिणामांची भीती.  हे दोन मुख्य भाव मनाचा वा मनाच्या अवकाशाचा बराचसा भाग व्यापून उरतात. जर ही भीती आपल्या कर्मांची नसेल तर इतर अनेक चिंतांची असते. जर ही भीती गतकर्माची असेल तर जे फल समोर येईल, त्यातून जाण्यासाठीची ऊर्जा व शक्ती आपल्याला, सद्गुरूंचं अखंड कवच आणि आपली श्रद्धा नक्कीच मिळवून देईल.  आपण मुख्यतः चिंतन करतो ते चिंतांचं. हे चिंतांचं चिंतन आपल्या मनातील सुप्त भीती करवून घेते. भीती भविष्याची असते. मुख्यतः ही भीती सांसारिक चिंता, पुढील काळ कसा असेल, कशी स्थिती येईल, आर्थिक घडामोडी व परिस्थिती काय असेल, आपण त्यातून कसे पार पडू, मुलं व त्यांचं भविष्य, त्यांच्या शिक्षणाची चिंता हे सर्व विषय सतत आपलं डोकं बुद्धी व मन पोखरत असतात. यातील सर्वच चिंता चुकीच्या असतात अस...

भोग आणि ईश्वर २७०

भोग आणि ईश्वर  २७० काल म्हटल्याप्रमाणे आणि वेद, श्रुती, स्मृती पुराणं यातून , ईश्वराचं महात्म्य सांगताना, हे नेहमी सांगितलं जातं की, ईश्वर या जगताचा मातापिता, पालक, चालक असा सर्व काही आहे.  म्हणूनच समस्त सजीव व निर्जीव दोन्हीवरती तो मातृपितृवत प्रेम करतो. हे प्रेम सर्व जगता वर एकसमान आहे. खरतर एकाच समान धाग्याने हे जगत फक्त आणि फक्त ईश्वराभोवतीच गुंफलेलं आहे. आपण जगताच्या, जीवनाच्या आणि संसाराच्या तापात, भोगात बरेचवेळा हे दुर्लक्षित करतो किंवा विसरतो.  या गोष्टीची जाणीव होणं, किंवा ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान. मी ईश्वरी अंशाचाच एक भाग आहे, माझं आणि ईश्वराचं, ज्याअर्थी मातापिता व पुत्र यासमान नातं आहे आणि मला ते स्मरत नसलं तरी,माझे माता व पिता म्हणून, ईश्वराला नक्कीच स्मरत आहे. विषय आहे तो मला स्मरण होण्याचा किंवा मी स्मरण करण्याचा.  आपण हा विषय थोडा खोलात जाऊन बघूया. विचार करा की, या देशातील आई वडिलांचा मुलगा वा मुलगी दुरदेशात जाऊन, स्थायिक झाला आहे. कार्यबाहुल्या मुळे, मोहवश, लोभापायी, मायेच्या प्रभावात, त्याला मातापित्यांचं विस्मरण झालं. तरीही मातापिता, त्या पुत्रा...

भोग आणि ईश्वर २७१

भोग आणि ईश्वर  २७१ मनात उसळणाऱ्या विचारांच्या लाटा, मनाची खोली किती आहे यावर अवलंबून आहेच. परंतु मनाची सशक्तता अर्थात बल व क्षमता यावर देखील अवलंबून आहे. म्हणजेच येणारे विचार हे किती खोलवर बुडी मारून, मनात लाटांचा मारा निर्माण करतात हे वास्तविक ती व्यक्तीच ठरवू शकते. कारण मनात येणारे विचार आपणच नियंत्रित करू शकतो, हे पटत नसलं तरी सत्य आहे.  रेकी, प्राणिक हिलींग किंवा संमोहन या प्रकारात आपले मन आपल्या ताब्यात पूर्ण आणून, त्याद्वारे समोरच्या व्यक्तीवर मानसिक नियंत्रण मिळवून, इच्छित कार्यभाग साधायचा असतो. यामध्ये इच्छा आपली असो वा एखादया इतर व्यक्तीची, ज्याच्यासाठी ही प्रक्रिया वा ते कार्य हाती घेतलं आहे त्याची असो. पण इच्छा आणि त्या इच्छापूर्तीचा संकल्प या दोन गोष्टी वरील प्रकारच्या कार्याचा आधार असतो.  म्हणजेच इच्छा आणि संकल्प या पायानंतर प्रत्यक्ष कृती याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व अश्या सर्व कार्यात आहे. म्हणजेच याची त्रिसूत्री आहे इच्छा, त्या इच्छेच्या पूर्तीसाठी दृढ संकल्प आणि त्या दृष्टीने कर्म. या तिन्ही साठी मन आत्म्यावर स्थिर असणं आणि त्याची एकाग्रता काही काळासाठी ...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...

भोग आणि ईश्वर २६८

भोग आणि ईश्वर  २६८ कालचाच विषय पुढे नेऊ. वास्तविक आपण भोग भोगत असताना हे विसरतो की, आपण फक्त कर्मच करू शकतो. अन्य काही आपल्या हातात ईश्वराने ठेवलंच नाही. म्हणजे याची दुसरी बाजू अशी की, मनात बुद्धीत व आत्म्याच्या अंतरंगात फक्त आणि फक्त पुढचा विचार असावा. काय बिघडलं यावर विस्तृत आणि निरर्थक चर्चा करुन आपण, उपलब्ध वेळेचा दुरुपयोग करतो.  यामध्ये वास्तविक ईश्वरसुद्धा आपल्यावर हसत असेल की, जी गोष्ट तुझ्या हातातच नाही किंवा ज्या कर्मांना तू भूतकाळात करून इथपर्यंत आला आहेस आणि त्याचे परिणाम आज कर्मफलरुपात भोगत आहेस, त्या भोगांचा इतका विचार किंवा सुख व ऐश्वर्य प्राप्तीदेखील कर्मफल आहे हे माहीत असूनही, दोन्ही काळात फक्त त्यावर आरूढ होऊन, त्यांनाच वाहन समजून, त्यातूनच त्या त्या काळात, मनाची व बुद्धीची सर्व यात्रा देहाला व आत्म्याला घडवतोस. पण यातून साध्य काहीच होत नसूनसुद्धा, त्यातच व्यर्थ काळ घालवून, काळाचासुद्धा अपमान करतो आहेस.  कारण फक्त चिंता, क्लेश, काळजी यांनी मन,  काळीज, देह व देहातील प्रत्येक इंद्रिय, धमन्या, रुधिर अर्थात रक्त यांचा अकारण अतिरिक्त दाह घडवून आणतोस. अनेक...

भोग आणि ईश्वर २६७

भोग आणि ईश्वर  २६७ काल मनाच्या ऊर्जा, शक्ती याबद्दल आपण बोलत होतो. मुळात मनाकडे ही अफाट आणि अचाट ताकद आली कुठून, हा विचार केला तर लक्षात येईल की, याची निर्मिती वा याचा स्रोत हा प्रत्यक्ष ईश्वराने स्वतः असल्याचं सांगितलं आणि पंचमहाभूता तील अवकाश तत्वाने मनाची जडणघडण केली. इंद्रियांमध्ये मी मन आणि देहातील आत्मा मीच असं सोप्प समीकरण, विधात्याने स्वतः सांगितलं आहे.  मन मीच आत्मा मीच, तरीही देह आणि बुद्धी यांच्या व्यापामुळे कर्मबंधनांचा भागीदार होऊन, देहातून देहात प्रवास करत बसतो तो आत्मा आणि मन. म्हणजे आधी परमात्म्यापासून विलग होऊन, देहात प्रवेशणं. नन्तर मनाच्या आधारे बुद्धी व देह विचारात वाहावत जाऊन, मायेच्या व काम क्रोधादी असुरांच्या नादी लागणं. चुकीच्या किंवा जरूर नसलेल्या कर्माचे भागीदार होतात. हाच ईश्वरी संकल्पाचा खेळ. मीच खेळ मांडला त्यात मीच खेळाडू आणि मीच पंच. अद्भुत अतर्क्य, उद्या हे विस्ताराने पाहू.  नंतर विधात्याने निर्माण केलेल्या कर्माच्या साखळीत गुंतून, जन्मोजन्मी षड्रिपुंचे दास होतात. त्या आधारे केलेल्या कर्माचं दान पदरी पडताच, भीतीने, आश्चर्याने, अविवेकाने ते ...

भोग आणि ईश्वर २६४

भोग आणि ईश्वर  २६४ स्थूल पातळीवर आपण काल पाहिलं की, आज जे अत्याचार सहन करत आहेत, त्यांनी आधी अत्याचार केले होते आणि त्या कर्मफलाने पुढील काळात त्याचे परिणाम त्या जीवाला भोगावे लागतात. यात एक महत्वाची गोष्ट ही की, हा जीवाचा प्रवास एखाद्या गतिशील नदीच्या प्रवासाप्रमाणे आहे. किंवा एखाद्या इमारतीच्या जिन्यासमान आहे.  नदी जशी प्रवाहानुसार वाहात जाते, जशी दिशा मिळेल, जसे मार्ग असतील, त्यानुसार पुढे जाते. जिन्यासमान म्हणजे आपण एखादी इमारत चढत असताना, त्यात अनेक मजले चढतो. आत्म्याचा प्रवास हा असाच आहे, प्रवाहप्रमाणे.  काळ फक्त या प्रवाहाला जाणतो, त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार, त्या त्या कर्माचं फल समोर आणून ठेवतो. बदलणारे देह हे त्या नदीच्या मार्गाप्रमाणे आहेत किंवा बदलत जाणाऱ्या मजल्यांप्रमाणे आहेत.  ते मजले जसे एकामागून एक येतात व जातात. किंवा नदीच्या प्रवाहात अनेक गोष्टी व अनेक टप्पे येतात आणि जातात. म्हणूनच,  एका देहाने केलेल्या कर्माचं फलित, भलताच देह भोगतो. ते फल सुख असेल किंवा दुःख असेल. तर्कसंगती लागो अथवा न लागो. पण नीट पाहिलं तर, ज्याअर्थी आपण भोगतो त्याअर्थ...

भोग आणि ईश्वर २६६

भोग आणि ईश्वर  २६६ बहुमिती आणि अतर्क्य किंवा गुह्य जगतातून, या भूलोकी आलेला आत्मा, पुन्हा त्याच जगतात परत जावा, हा उद्देश विधात्याने आत्मतत्त्व या लोकी पाठवताना, योजला. नव्हे हाच संकल्प विधात्याने योजला, सर्व सृष्टी निर्माण करताना. यासाठी पंचमहाभूतरुप देह निर्माण करून एकप्रकारे आत्म्याला परतीच्या प्रवासासाठी इंद्रियांनी युक्त अशी एक सुसज्ज यंत्रणा दिली.  या यंत्रणेला आपल्या स्वतःच्या बळावर हा योग किंवा हे कार्य साधणं शक्य नव्हतं. हे जाणूनच, विधात्याने आपला हुकुमाचा एक्का दिला.  म्हणजेच या सर्वातून हा देहाचा डोलारा घेऊन बुद्धीच्या सहाय्याने आत्म्याची शुद्धता साधत परम ईश्वराला पुन्हा भेटण्यासाठी जावं, यासाठी. तो एक्का म्हणजे मन. पुन्हा पुन्हा येऊन, सांगितलं की, इंद्रियांमध्ये मी मन आहे, म्हणजे त्या मनाचं महत्व अधोरेखित होईल.  हा देह प्रारब्धाचे चटके, भोग व उपभोग यात गुंतलेला असताना, याच्या जाळ्यात अडकता व चित्ताची शुद्धता राखत, आत्म्याला निजधामी पोचवण्याची नैतिक जबाबदारी, मनाचीच आहे. खरतर मनाचं सामर्थ्य, आवेग, आवाका इतका प्रचंड आहे की, तेच मन प्रसंगी हळवेपणाची सीमा गाठ...

भोग आणि ईश्वर २६९

भोग आणि ईश्वर  २६९ ईश्वर हा खूप कोमलहृदयी , दयाळू आणि अत्यंत प्रेमळ अंतःकरणाचा आहे. आपण आपलं मन पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन केलं की, तो त्याचा निर्वाह सहज करवून घेतो. सहज करवून घेतो म्हणजे, ज्या देहात ते मन आहे, त्या देहाची नित्य व्यवस्था पाहून, त्या देहात स्थित आत्म्याच्या उद्धाराची चिंता स्वतः वाहतो आणि त्यानुसार कर्म त्या देहाकडून मन बुद्धी आत्मा यांच्या सहाय्याने घडवून घेतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की, ईश्वर आत्मा पाहतो आणि फक्त मनाची भाषा जाणतो.  म्हणजेच मनात, मनाने केलेले विचार व त्या विचारांची, संकल्पांची, भाषा हिच ईश्वराला ज्ञात आहे किंवा ईश्वरा पर्यंत तीच भाषा व तिचाच संवाद, पोचतो. म्हणजे मनाने घातलेली साद ईश्वर ऐकतो. ईश्वर हा हृदयाने ऐकतो, त्यामुळे जी साद मनातून अंतर्मनाने व आर्ततेने घातली जाते, ती साद भगवन्त हृदयात पोचते.  भगवंत हा इतका कृपाळू व दयाळू आहे, की तो पापांचे पर्वत सुद्धा क्षणात नष्ट करून, कोणत्याही जिवामात्राला पावन करून घेऊ शकतो. वास्तविक तो एखाद्या माते समान आहे. म्हणजे माता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांच्या शत चुकांना आपल्या मायेच्या पदराआड सामाव...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...
ll श्रीविष्णवे नमः ll  श्रीविष्णुसहस्रनामात श्रीविष्णूंच्या अनेक नावात असलेलं एक नाव म्हणजे विष्णू.  विष्णू हा शब्द दोन शब्दांचा मिळून तयार झालेला संधी शब्द आहे. यात दोन शब्द आहेत, ते म्हणजे विश आणि अणू. विश म्हणजे  व्यापून टाकणे आणि अणू म्हणजे अतिसूक्ष्म कण किंवा कोणत्याही पदार्थाचं विघटन केल्या नंतर त्याचे जे सूक्ष्म भाग तयार होतील, त्याला अणू म्हणतात.  व्यापणे म्हणजे यात मूळ शब्द व्याप आहे. ज्यामध्ये विस्तार दर्शवला जातो. एखादी वस्तू वा पदार्थ, सजीव निर्जीव दोन्ही, जितकी जागा घेतो, त्याला व्यापणं म्हणतात. म्हणजेच physically ती वस्तू जितकी जागा घेईल, तो त्या वस्तूचा व्याप. खरतर हा मूलरूपात व्यापकतेच्या सर्व सीमांपालिकडे आहे. म्हणून व्याप्त शब्दात सुद्धा मांडता येईल की नाही ही शंका, ज्याबाबत आहे.  व्याप या शब्दावरूनच व्यापक हा शब्द तयार होतो, जे विशेषण आहे. त्याची घनता दर्शवण्यासाठी व्याप्त हा शब्द वापरला जातो. म्हणजे एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा व त्या जागेचे एकूण क्षेत्रफळ.  त्यावरून व्याप्ती हा शब्द आला. कारण क्षेत्रफळ म्हटलं की त्याला भूमितीय परिमा...

भोग आणि ईश्वर २६५

भोग आणि ईश्वर  २६५ विश्वाच्या रचनेचे गूढ खरतर त्याचक्षणी उलगडलं, ज्यावेळी सर्व सृष्टीची रचना समजली. कारण इतकी गणितीय नियमात्मक, प्रमेयात्मक, कलाकौशल्याने युक्त, सजीव, अखंड प्रवाही अद्वितीय रचना ज्याने केली, तो स्वतः नक्कीच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असणार. हे तर्कयुक्त आणि तर्कसंगत आहे की, अश्या रचनेचा शिल्पकार कुशल आणि निपुण असणार हे नक्कीच. मुळात इथे त्रिमितीय जगतवर्तुळात राहून, बहुमिती जगताची कल्पना करणं हे बुद्धी पलीकडील आहे.  आपण प्रत्येक गोष्टीकडे कार्यकारण भाव धरून आणि शास्त्राची परिमाणं लावून बघतो. ते या जगतासाठी योग्य आहे. कारण या जगताच्या रचजेचा पाया तोच आहे. पण बहुमिती जगतातील तत्व, विचार व नियम कदाचित वेगळेच असतील. म्हणूनच आपल्या परिमाणात त्या विश्वनिर्मात्याला मोजू पाहणं हाच मुळात तर्कहीन विचार आहे. महाभारतातील मुचकुंद राजाची गोष्ट आपण वाचली आहेच. जो देवासुर संग्रामात देवांच्या बाजूने लढण्यासाठी स्वर्गात युद्धाला गेला होता. स्वर्गातील कालमाना नुसार तिकडे एक वर्ष पूर्ण झालं, युद्ध संपायला.  राजा मुचकुंद ज्यावेळी परत पृथ्वीवर येण्यासाठी निघाला, तेंव्हा देवेन्द्राने...

भोग आणि ईश्वर २६३

भोग आणि ईश्वर  २६३ आत्मा एकदा निजतत्वापासून अर्थात परम तत्वापासून विभक्त झाला की, त्याची ब्रह्मांडातील यात्रा सुरू होते. मूळ शुद्ध चैतन्यस्वरूप व सात्विक तेजाने युक्त असलेल्या या परामाच्या सूक्ष्म अंशाला, ब्रह्मांडात प्रवेश करताच, सर्वात प्रथम माया वा ब्रह्मांडाची शक्ती, ग्रासते. तिच्या प्रभावाने तो या भूलोकी अथवा मर्त्यलोकात येऊन, पंचमहाभूतरुप देहातील आपल्या प्रवेशा साठी प्रयत्न सुरू करतो. इथेच कर्माचा प्रवास आणि मायेसोबत वास सुरू होतो.  आपण खूपवेळा विचार करतो की, प्रथम कर्म कधी घडतं. तर ते मायेच्या प्रभावात देहधारणेसाठी घडलेलं प्रथम कर्म असतं.  कर्म आणि माया हे दोन, त्या आत्म्याचे अविभिन्न अंग होतात. यातील माया ही जीवाला संसारात गुंतवून टाकते. मुळात संसार म्हणजे आपण समजतो तो लग्नसंसार नाही, तर जीवाचा षड्रिपूंच्या सान्निध्याचा आणि त्याद्वारे मन व बुद्धी, यांच्या व्यवहारांचा संसार सुरू होतो. कारण देहधारणेसाठीचं कर्म आत्मा सुरू करतो, तिथेच या व्यवहारात अडकून, जन्मो जन्मीच्या बद्धतेचा प्रवास सुरु होतो.  एकदा कर्माच्या खेळात आणि मायेच्या फेऱ्यात मन व बुद्धी सापडले की, ज...

भोग आणि ईश्वर २६२

भोग आणि ईश्वर  २६२ कालचा विषय पुढे नेऊया. आत्मा जो चैतन्यरूपात अनंतात भ्रमण करत असतो, त्यावेळी त्याला असलेलं ज्ञान, अनुभवातून आलेलं शहाणपण, शांतपणा, गांभीर्य किंवा या विरुद्ध प्रवृत्तीचे संस्कार, हे सर्व, देहात प्रवेश करताच, पूर्ण लुप्त, वा विस्मृतीत जातं का.? तर याचं उत्तर नाही असंच देता येईल. याचं कारण असं की, देहात आल्यानंतर वयाच्या तीन ते चार वर्षापर्यंत, आधीच्या जन्मापर्यंत मिळालेलं ज्ञान, अनुभवांचं गाठोडं हे सर्व हळूहळू विस्मृतीत जातं.  म्हणजे बाह्य जगताचे जसे संस्कार घडत जातील, तसतसं ते आधीचं ज्ञान वा अनुभवांचं संचित, मागे पडत जातं. माणूस या देहातील सर्व अवस्थांमध्ये झिरपत जातो. हळूहळू या देहातील गुण व अवगुण आत्म्याच्या मूळ संस्कारांना मागे सोडत जातात आणि देहाचे संस्कार वा त्या संस्कारांची पुटं आत्म्याच्या संस्कारांवर चढत जातात. परिणामस्वरूप एक भिन्न व्यक्तित्व उदयाला येतं.  असे हे संस्कार जे लुप्त झालेत, ते सुप्त मनाच्या कोपऱ्यात पार मागे जाऊन बसतात. बाह्यांगी भिन्न व्यक्ती, अंतरात भिन्न असू शकते. यामध्ये देहाच्या संस्काराने, मूळ आत्मव्यक्तित्वात फक्त  नकारात...

भोग आणि ईश्वर २६१

भोग आणि ईश्वर २६१ काल आपण जे चिंतन केलं, त्यातून काही गोष्टी कळल्या पण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यावर अजून थोडं चिंतन,आज करूया. ज्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण करतो वा करू, त्याप्रमाणे पुढे त्यातून, प्रवेश करणारं चैतन्य आपल्या समोर येणार. म्हणजेच आपलं आपल्या खाण्यावर किती नियंत्रण असावं, याचा विचार व्हायला हवा. म्हणूनच, कदाचित, पूर्वीच्या काळी, जन्माला आलेली संतति, ही अनेक कारणांनी व गुणांनी युक्त अशी असायची. किंबहुना तशी ती जन्माला यावी , यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जायचे, शुद्ध सकस आणि पूर्ण घरगुती जेवण खायला घालून. अर्थात पूर्वी बाहेरून आणून खायची पद्धत नव्हतीच आणि बहुतेक घरातून शेती हा प्रधान उद्योग असल्यामुळे, सकस व उत्तम जीवनसत्वांनी युक्त भोजनच घेतले जायचे. उत्तम प्रतीची संतती निपजण्यासाठी त्या प्रकारचा आहार विहार अत्यंत जरुरी आहेच. आता चैतन्यशक्ती जी, चैतन्यमय अवस्थेतून, पंचमहाभूत रुप देहात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून पार पडली. पण आता ज्या देहात प्रवेश करता झाला, तो देह, कसा काय व कुठे आहे, हे देखील जाणण्याची काही सोय विधात्याने केली आहे का. तर नक्कीच...

चैतन्याचा रथ चालला

चैतन्याचा रथ चालला भक्त हृदयी नामातून वत्सल तो ईश्वरही वसतो भक्त हृदयातून वाहतो हा निर्मळ वारा सुघट घटी बैसले आत्मन वास करे या हृदयी तेज वाट पाहे भेटण्या माय मज उगवतीस सूर्यबिंब ते पातले जणू हरी प्रतिनिधी समोर उभा परमात्मा हा अनेक रूपे साक्षीत्वाची जात जात जीवन पथावर ओठ हलती नाम घेताना साजिरे ते रूप नयनात दिसे मज मुखी वदताना इतुके जे दिसले जाणिवेला तरी मन मागे हरीची खुण जाणिवेला जाग आली अन मन अनुभवते शांतपण कैवल्याची जाणा ही साक्ष वसतो भक्त हृदयातून ©® कवी : प्रसन्न आठवले १८/०८/२०२१ ०८:४७

भोग आणि ईश्वर २६०

भोग आणि ईश्वर  २६० आत्मा आणि देह हे दोन भिन्न घटक आहेत आणि काही विशिष्ट परिस्थितीत आणि कारणांसाठी ते एकत्र आलेत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असाही होतो का, की सदर एकत्रीकरण हे काही उद्देश्यपूर्तीसाठी आणि उद्देशापर्यंत आहे. ती उद्देश्य काय हे आपण पाहूया, मगच पुढे जाऊ.  उद्देश्य म्हणजे अनेकवचनी शब्द आहे. म्हणजेच यांच्या एकत्र येण्याचा व काही काळ सहवासाचा नक्कीच काही तरी हेतू असणार. एक देह सोडल्यानंतर आत्मतत्त्व हे नवीन देहाच्या व त्या देहधारणेसाठीच्या अनुकूल वेळे पर्यंत अविरत प्रयत्नशील राहून फिरत असतो. इथे काही गोष्टी ज्ञानासाठी आवश्यक म्हणून मुद्दाम सांगतो. आत्मा हा चैतन्यमय असल्यामुळे व लहरी वा तरंग या स्वरूपात असल्याकारणाने, त्याला नवीन देह धारणे साठी माध्यम लागतं. ते म्हणजे वीर्य. कारण जन्मासाठी विधात्याने केलेली ती व्यवस्था आहे आणि सर्व प्राणीमात्र देहधारणेसाठी, त्या व्यवस्थेचा भाग आहेत. आता तिथ पर्यंत पोचण्यासाठी पुन्हा अजून एक माध्यम जरुरी आहे.  चैतन्यशक्ती ही लहरींसम असल्यामुळे खरंतर हवेतून, प्राणीदेहात जाऊन, देहधारणेसाठी विर्यतत्वात प्रवेश करू शकतात का. तर नाही. कारण ...

भोग आणि ईश्वर २५९

भोग आणि ईश्वर  २५९ वरिष्ठांच्या आदेशानुसार, त्या नवीन अकाउंटंटने, अंदाज पत्रक, पुनर्लेखीत केलं आणि मासिक अंदाजपत्रकात, त्या खर्चाची तरतूद केली. पण मनात त्याला खुप त्रास झाला, आधीच्या अकाउंटंटच्या चुकीमुळे, त्याने काटेकोर पणे बनवलेलं अंदाजपत्रक कोलमडून पडलं. निदान त्यात बदल करावे लागल्यामुळे, खर्चात काही कपात व काही फेरबदल करावे लागले.  आता आपण याचं विश्लेषण करूया. हा आधीचा अकाउंटंट म्हणजे आपला मागचा देहरुप जन्म, ज्यामध्ये आपण काही चुका करून ठेवल्यात. नवीन अकाउंटंट म्हणजे आपलाच देहरुप नवीन जन्म. या नवीन जन्मा मध्ये आपण, नीटनेटके, शिस्तशीर आहोत. वरिष्ठ म्हणजे अर्थात विधाता आणि तो देणेकरी म्हणजेच आपलं कर्मफल. आता सर्व चित्र स्पष्ट झालं असेल.  म्हणजे आपणच आधीच्या जन्मात केलेल्या चुका, या जन्मात  आपल्यासमोर, आपल्या दृष्टीने अयोग्य वेळी, पण त्या देणेकऱ्याच्या दृष्टीने योग्य वेळी, समोर आल्या मुळे, आपण या जन्मात स्वतः नीटनेटके असूनही, नियती रुपात समोर आलेल्या, आपल्याच चुकीमुळे क्रुद्ध, हताश व निराश झालो. खरतर यात क्रोधीत व्हायचं कारण म्हणजे आपल्याला त्या आधीच्या अकाउंटंटने क...

भोग आणि ईश्वर २५८

भोग आणि ईश्वर  २५८ आपण काल हे पाहिलं की, देहात असलेली आणि देहा हून भिन्न असलेली ही चैतन्यशक्ती, देहाला ऊर्जा पुरवते. पण फक्त इतकंच कार्य ती शक्ती करते का. आत राहून, आत बसून, ही शक्ती अनेक प्रकारची अशी अद्भुत कामं करते,  ती समजली की थक्क व्हायला होईल. म्हणजे आज आपण त्यावर विचार करूया आणि अंदाज घेऊया की, नक्की काय कार्य ही शक्ती करते.  आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो, त्याचं आपण किंवा तो आपलं काही देणं लागत असेल तर, त्या व्यक्तीने कितीही रूप व कपडे पालट केलं तरीही, आपण त्याला ओळखून त्याच्याकडून त्या रकमेची वसुली करण्यासाठी तगादा लावू शकतो किंवा याऊलट आपण कितीही वेशांतर केलं तरीही ती व्यक्ती आपल्याकडून, सदर रकमेची वसुली करूच शकते.  यात एकमेकांना ओळखण्याचे काही आडाखे, अंदाज वा साम्यस्थळं असतात. जसं डोळे, नाक, रंग ओठांची ठेवण चेहरा इत्यादी. ज्यायोगे आपण एकमेकांना ओळखू शकतो. मग आपण मागे खूप आधी,एका लेखात म्हटल्याप्रमाणे त्या स्मृतिभ्रंश झालेल्या सद्गृहस्थाला त्याचा आधीचा देणेकरी वा घेणेकरी ओळखेलच. पण या देहातील साम्यावरून, या जन्मी आणि याच देहाला ओळखण्याची अनेक तंत्र, काळाच्या...

भोग आणि ईश्वर २५७

भोग आणि ईश्वर २५७ कालचाच विषय पुढे नेऊ. कालच्या विस्तृत विवेचना वरून एक गोष्ट लक्षात आली असेल की, मी म्हणजे देह नाही. कारण मी ती दुःखं आणि लाभ भोगतो व उप भोगतो जी, या देहाचा वास्तविक अधिकार नाही व नव्हती . म्हणजे जे माझ्या अधिकारात नाही, ते मी उप भोगतो किंवा भोगतो. हे वास्तविकपणे तर्कात बसत नाही. पण जर कर्माचा आणि त्याच्या फलाचा संबंध जोडला किंवा योजला तर, नक्कीच कोणीतरी ते कर्म केलं आहे, जे आज फलद्रूप होऊन समोर आलं आहे. पण मग ते माझ्या वाट्याला का आलं. असा कोण आहे जो, इतरांच्या वाटचे भोग वा उपभोग माझ्या पदरात टाकून, मला त्याचा विनाकारण अधिकारी करत आहे. पण कर्माचा सिद्धांत नीट तपासून पाहिला, तर हे नक्कीच खात्रीपूर्वक सांगता येईल की, कधीतरी केलेल्या याच जन्मातील चुकांचं फल वा वास्तव आपल्या समोर आलेलं आपण पाहिलं आहे. उदाहरणार्थ आपण घेतलेलं वा जामीन राहिलेलं कर्ज जर फेडलं नाही, तर त्याचे देणेकरी कधीनाकधीतरी समोर येऊन उभे राहणार वसुलीसाठी. याचं साधं कारण, तो कोणाचा तरी इतरांचा पैसा आहे आणि ज्यांनी मला दिला तेदेखील कोणाला तरी उत्तरदायी आहेत. म्हणजेच कर्म फल हा एकप्रकारे चक्राकार ...

भोग आणि ईश्वर २५६

भोग आणि ईश्वर २५६ खरतर सद्गुरुचरणी स्थिर राहून, आपलं किंबहुना आपल्या आत्म्याचं, हित साधण्यासाठी नामस्मरण हा एकमेव उत्तम मार्ग, सहजसाध्य आणि अत्यंत परिणाम कारक आहे. याची जाणीव जागृत होणं किंवा जाणं येणं किंवा ज्ञान येणं हे मात्र सद्भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे मुळात आपल्याला असलेल्या सर्व समस्या, या भौतिक मार्गाने सिद्ध करता येण्याजोग्या नसून, काही समस्या या पूर्वकर्मांचा परिणाम आहे, हे मान्य करून पुढे गेल्यासच काही मार्ग वा उत्तरं शोधणं शक्य होईल. हे मान्य केल्यानंतर , यात पूर्वकर्मात काही सुधारणा शक्य नाही, मग जे घडतंय वा ज्या चक्रातून आपण जात आहोत, त्या चक्रातून, मन बुद्धी व देह या माध्यमातून आत्मतत्वाला वा आत्म्याला बाहेर काढून, पुढे घेऊन जाण्याबाबत काही करता येऊ शकेल. मी बरेचवेळा या आधीच्या लेखांमध्ये किंवा आता दोन ते तीन वेळा हे म्हटलं की, देह, बुद्धी आणि मन यांच्या सहाय्याने आपण आत्म्याला पुढे न्यायचं आहे. याचा सरळसरळ अर्थ हा आहे, किंवा बोलण्याचा उद्देश हा आहे किंवा इथपर्यंत ह्या मालिकेतील लेख वाचून व त्यांचं चिंतन करून, हे लक्षात आलं असेल की, आपण म्हणजे देह ही आपली मानसिकत...