Skip to main content

भोग आणि ईश्वर ९८

भोग आणि ईश्वर  ९८
 
काल गुरुमहती, त्याआधी नाममहती यावर विस्तृतपणे चर्चा केल्यानंतर, आज जरा वेगळ्या विषयाकडे वळूया. जगात प्रत्येक गोष्टीला शेवट असतो.  तसाच जन्म मृत्यू यांनासुद्धा आहे. म्हणजे जो अंश, आत्मरूपाने, परम आत्म्यापासून वेगळा होऊन, या जगतात, विविध देहरूपात, जन्मोजन्मी फिरत आहे, तो कधीनाकधी आपला प्रवास संपवून पुनः वैकुंठाला जाणार हे नक्की. 

अर्थात जगताच्या अस्तानंतरतरी, सर्व जीव पुन्हा सदा - शिवाच्या चरणी सामावले जाणे नक्की आहे. कारण या जगतात, ज्या ज्या गोष्टी सजीवरूपात वा निर्जीवरूपात आल्या, त्या प्रत्येकाला शेवट आहे. त्यामुळे आत्मा ही एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा ही नष्ट होत नाही, तरी आपलं स्वरूप व अस्तित्व नक्की बदलते. त्यामुळे सर्व पुन्हा एकजीव होऊन विश्वनिर्मितीच्या वेळी होते, त्या स्थितीत, अर्थात पुनः मूळ उर्जास्रोताकडे परत जाणार हे नक्की. 

पण हा काही मोक्ष वा मुक्ती नव्हे. ही सुद्धा एक तात्पुरती स्थिती असेल. कारण पुनः, विश्वनिर्मितीच्या वेळी, परत सर्व जीव, या ब्रह्मांडाच्या व मायेच्या पसाऱ्यात व फेऱ्यात, येणार हे नक्की. अशावेळी यात अडकणार नाहीत ते, मुक्ती वा मोक्ष मिळालेले जीव.  म्हणजेच या चक्रात पुनः पुनः न अडकण्या साठी उपाय म्हणजे साधना,भक्ती या मार्गाने प्रभूपर्यंत पोहोचून मुक्त होणं. त्याकरता साधना आणि प्रभुकृपा किंवा गुरुकृपा आवश्यक आहे. 

भोगातून सुटण्याचे अनेक विकल्प आहेत.  कारण जिथे शेवट आहे तिथे विकल्प हे आलेच. पण भोगातून सुटण्याचे विकल्प म्हणजे भोग भोगणे, या देहाला समाप्त करणे अर्थात मृत्यू पत्करणे किंवा नामसाधनेच्या आधारे सद्गुरुकृपा प्राप्त करणे. कारण भोगातून सुटका भोगांची समाप्ती किंवा गुरुकृपा करू शकते. 

मुक्ती आणि स्वर्गप्राप्ती या सर्वस्वी दोन भिन्न गोष्टी आहेत. थोडं धक्कादायक आहे. कारण आपल्या कल्पनेनुसार स्वर्गप्राप्ती म्हणजे शेवट. पण वास्तविक तसं नाही. जन्मांच्या पुण्याईने स्वर्गप्राप्ती होऊ शकते. परंतु भू लोकासारखा तोसुद्धा एक निर्मित केलेला लोक आहे. ज्याप्रमाणे भूलोकी पंचमहाभूतरुप देहात फक्त पुण्य करून स्वर्ग वा मुक्तीप्राप्ती करता येते, त्याप्रमाणे स्वर्ग हा पुण्याचा उपभोग घेण्यासाठी निर्माण केलेला एक लोक आहे. तिथे फक्त पुण्यसमाप्ती होते, संचय होऊ शकत नाही. 

स्वतःच्या पुण्याईवर मनुष्य अनेक गोष्टी मिळवतो, अगदी स्वर्गसुद्धा. पण त्या स्वर्गसुखाच्या उपभोगांचा कालावधी  
 पुण्य असे पर्यंत. म्हणजेच तो सुद्धा एक तात्पुरता थांबा आहे, अगदी हजार वर्षे असेल तरी, त्याला अंत आहेच आणि पुण्यसमाप्तीपश्चात त्या जीवाला पुन्हा मृत्यूलोकी येऊन आपलं पुण्य पुनः परत मिळवायचं असतं.  

म्हणूनच यासर्वातून कायमस्वरूपी सुटकेचा एकच मार्ग म्हणजे मोक्षप्राप्ती.  प्रत्येक मनुष्याने जगात आल्यानंतर खरतर या मार्गावर चालणं अपेक्षित असतं. परंतु इथेच पूर्व जन्मातील पुण्यसंचय, पापसंचित, पूर्वसुकृत आणि त्यानुसार आलेलं प्रारब्ध काम करतं. ज्या गोष्टींचा जोर जास्त त्याप्रमाणे मानवाला बुद्धी होऊन त्यानुसार पुढील कर्म माणूस करतो. पुन्हा त्या कर्माच्या फलाची बद्धता जीवाला जन्म घेण्यास भाग पाडते आणि भोग भोगायला लावते. 

मनुष्य मिळालेल्या भोगांना कंटाळून, त्यातून सुटकेसाठी अनेक मार्ग अवलंबतो वा विचारतो. परंतु आज टाळलेले भोग, पुन्हा कोणत्याना कोणत्या स्वरूपात, समोर येऊन उभे राहतात आणि जेंव्हा उभे रहतात, तेंव्हा मनुष्य गतविस्मृती मुळे, हे मी कधी केलं,हे काय माझ्या नशिबाला आलं, असा दूषित दृष्टीने विचार करतो. 

परंतु भोग भोगताना जर साधना सुरू असेल तर गुरुकृपेच्या बळावर काहीतरी सुटकेचा मार्ग निघू शकतो. म्हणून साधना हा गुरुकृपेचा राजमार्ग आहे. 

म्हणून नामात रहा, मी आधीच्या भागात सांगितलेल्या पाच पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. उद्या पाचच्या पुढील पायरीचा विचार करू. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...