Skip to main content

भोग आणि ईश्वर १०२

भोग आणि ईश्वर  १०२
 
स्वतःच्या मनात व देहात आणि त्यायोगे आयुष्यात घडणाऱ्या अनिष्ट, अहितकारक, गोष्टी टाळण्यासाठी मनाचा समतोल साधून, मनाला एका नियमाची, सूत्राची व समत्वाची जाणीव देणारा, सवय लावणारा अत्यंत साधा व सोप्पा उपाय नामस्मरण हा मनापर्यंत व त्याद्वारे आत्म्यापर्यंत नेण्याच्या प्रयत्नातील पाच पायऱ्या आपण पाहिल्या. त्यांचा नित्य अभ्यास करून आपण काही प्रयास केले असतील असं समजून मी आज सहावी पायरी सांगणार आहे. 

तुमचं नित्याचं नामस्मरण करून हा प्रयोग करायचा आहे हे आधी ध्यानात ठेवा. आता तुम्ही मूकपणे मनात जप करून तो साद वा नाद मनाने ऐकत आहात. या स्थितीला आपण आलो आहोत. परंतु ज्यांनी आधीचे भाग वाचले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा एकवार गोषवारा, अर्थात संक्षिप्त स्वरूपात. प्रथम नाम घेताना डोळे मिटून आपला वैखरीतील आवाज आपणच आपल्या कानाने ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

प्रयत्नाने हे जमायला लागेल. त्यानंतर आपला वैखरीतील आवाज हळूहळू पायरी पायरीने कमी कमी करत तो कमी कमी होत असताना ऐकत आहोत याचं भान ठेवायचं आहे. यानंतर वैखरीतील जप वा आवाज पूर्ण बंद करून जप मनात म्हणून त्याचा नाद ऐकण्याचा वा जाणण्याचा प्रयत्न करायचा. इथपर्यंत जमत गेल्या नंतर आपण आता मनात जप करून तो मनाच्या श्रवणेंद्रियांनी ऐकत आहोत हे तुमच्या लक्षात येईल. 

मनाची श्रवणेंद्रिय हा शब्द कदाचित ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण मनालासुद्धा ज्ञानेंद्रिय असतात. उदाहरण देतो म्हणजे पटेल व कळेल. आपण खूपदा विचार करतो, कल्पना करतो किंवा स्वप्नसुद्धा पाहतो. त्यावेळी विचारात, कल्पनेत वा स्वप्नात संवाद करतो वा ऐकतो. त्यावेळी आपण घडलेले किंवा कल्पनेतील संवाद प्रत्यक्ष ऐकतो आहोत याची जाण असते. 

जरी घडलेले नसले तरी कल्पनेत घडत असलेले किंवा स्वप्नात घडत असलेले संवाद आपण आपल्या कानांनी ऐकत आहोत हे जाणवते. कारण त्याचा परिणाम वा नोंदणी मेंदूत होते आणि नन्तर कधीतरी आपण त्याचं पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू घेतो, किंवा कोणाशी त्या कल्पनेबद्दल चर्चा देखील करतो, किंवा काही विनोदी कल्पना असेल तर त्यातील संवाद आठवून क्वचित हसतोसुद्धा. म्हणजेच जे संवाद आपण प्रत्यक्ष ऐकले नाहीत, त्यातील वाक्य मनात नाद निर्माण करतात. म्हणजेच देहाप्रमाणे मनालासुद्धा अदृश्य स्वरूपातील कर्ण वा श्रवणेंद्रिय आहेत व असतात. 

आता या कल्पनेतील न घडलेल्या पण मनाने निर्माण केलेल्या काल्पनिक संवादांचा नाद वा ध्वनी वा आवाज आपण आठवून जसे भाव प्रकट होतात, तसाच, आपण वैखरीत केलेल्या वा करत असलेल्या जपाचा नाद, ध्वनी वा आवाज आपण मनातील श्रवणेंद्रियांनी ऐकणार आहोत. या ठिकाणी नित्याची कल्पनाशक्ती उपयोगी आणायची. 

एरवी बरेचदा ती दिवास्वप्नात वा परिकल्पनेत वापरतो तीच अद्भुत अगम्य, अस्तित्वात असलेली पण जाणिवेत नसलेली मनाची नाद निर्माण करून तो ऐकण्याची शक्ती मनात जाऊन उपयोगी आणायची. आता या ठिकाणी आधीच्या पाच पायऱ्यांचा अभ्यास का करायचा हे लक्षात येईल.  कारण मन इतर वेळी करत असलेल्या वा वापरत असलेल्या कल्पनानाद  शक्तीचा सदुपयोग नामासाठी करायचा. नित्य जप करून त्या व्यतिरिक्त मुद्दाम वेळ काढून शांततेत हा अभ्यास करून त्याचा सराव करून त्यात गती मिळवल्यास, नित्य जपात राहण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. 

काहीजण हा जप करतसुद्धा असतील,परंतु याचं ज्ञान नसल्यामुळे त्याचं मर्म व महत्व जाणलं नसेल. पण आता जाणिवेने करा. कारण जाणीवच आपल्याला ध्येयापर्यंत नेईल. उद्या याच जाणिवेबद्दल चर्चा करूया. 

याचा अभ्यास करून प्राविण्य मिळवा, आपलाच फायदा आहे. म्हणूनच नामात रहा, मी  सांगितलेल्या कल्पनानाद जपाचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१२/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...