Skip to main content

भोग आणि ईश्वर १०८

भोग आणि ईश्वर  १०८
 
आयुष्यात एक गोष्ट नेहमी मनाशी खूणगाठ म्हणून बांधून ठेवली पाहिजे की, कोणतीही स्थिती  स्थिर रहात नाही. सुख आणि दुःख दोन्हीही कायमस्वरूपी नाही. पण तुमच्या गतकर्माची शिल्लक, अधिक या जन्मातील कर्माची त्यात पडत असलेली भर, वजा तुम्ही भोगत असलेलं दुःख व उपभोगत असलेलं सुख, याचं जे उत्तर येईल ते म्हणजे आयुष्य. पण हे गणित प्रत्येक क्षण बदलत असतं. समीकरण व सूत्र हेच, पण मधले आकडे क्षणोक्षणी बदलत जातात. 

कदाचित भोगाचा काळ हा प्रमाणाबाहेर जास्त असू शकेल किंवा असेल, तरीही सूत्र तेच राहणार. फक्त याचा अर्थ असा होतो की, गतजन्मांत किंवा या जन्मी गतकाळात, आपण असं काही कर्म वा कुकर्म केलं असणार, ज्यामुळे ते कर्मफल संपल्याशिवाय भोगांचा उतारा नाही. तोच नियम सुखाचा काळ उपभोगताना लागू होतो. म्हणून माणसाची मानसिकता आणि साधना दोन्ही काळात मनाचा समतोल राखणारी व मनाला संतोष देणारी असावी. कारण दुसऱ्यांच्या कर्माचं फल कधीही मला भोगावं लागत नाही. (या मुद्द्यावर विस्तृत विवेचन उद्याच्या भागात).

भोगाच्या काळात, बरेचवेळा वा बराच काळ असं होतं की, कोणताही उपाय काम करत नाही किंवा कोणालाही उपाय सापडत नाही. सदर मनुष्य किंवा त्याचे कुटुंबीय यांना जे कोणी, जे जे उपाय सांगतील, ते सर्व अपयश देणारे ठरतात. अशावेळी हे नक्की समजावं की, गतकर्म हे खूप घातक होतं, ज्याचा उपाय हा कर्मफलाचे भोग भोगूनच संपेल किंवा सद्गुरूशरण जाऊन, त्यांची नित्यनेमाने क्षमायाचना व प्रार्थना करणे आणि या जन्मात इथून पुढे काहीही चुकीचं कर्म न करता भविष्यातील कर्मफल सुधारणे. 

आजाराच्या लक्षणांमध्ये जशी काही लक्षणं, सहज दृष्टीस पडतात आणि सहज समजतात. त्याप्रमाणे आयुष्यात अशी लक्षणं सहज लक्षात येतात, त्यावरून समजू शकतं की आपण आयुष्याच्या कोणत्या काळात आहोत. सुखाच्या काळाकडे पोचण्यासाठी केलेली मेहनत, श्रम, खर्च केलेला वेळ, गाळलेला घाम, या सर्वांनन्तर येणार यश यात, त्या कर्मांसह, आपल्या जमा संचित पुण्याचादेखील परिणाम आहे, हे कायम ध्यानात ठेवावं. अन्यथा तीच व्यक्ती, तेच श्रम, तीच जिद्द व तीच चिकाटी असूनसुद्धा परिणाम काळानुसार वेगळे असू शकतात. 

यात मेहनत, श्रम, जिद्ध यांना कुठेही कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, किंवा त्यांना गौण मानण्याचा काही मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की एकच व्यक्ती तशीच मेहनत करून दोन वेगळ्या काळात दोन वेगळे परिणाम बघू शकते वा बघते. मुद्दा हा आहे. म्हणूनच मेहनतीसह आपण काही साधना करत असू तर त्याचा परिणाम सकारात्मक तर होईलच पण बुद्धीचे व मनाचे पाय जमिनीवर राहायला, त्याचा आधार असतो. कारण सरतेशेवटी आपलीच कर्म आपल्याला उपयोगी पडतील किंवा आपल्याला खड्ड्यात पाडतील. 

म्हणून सर्व काळात व सर्व स्थितीत, मन व बुद्धी यांचा तोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शेवटी माया ही मन व बुद्धी यांच्याद्वारातूनच येऊन, कर्माचा ताबा घेऊन, स्वतःचीच मेहनत  धुळीस मिळवू शकते. मग ती माया, एखाद्या प्रलोभनाच्या रूपाने, भावनेच्या रूपाने, व्यक्तीच्या रूपाने वा चुकीच्या निर्णयाच्या रूपाने समोर येऊन उभी राहू शकते. बरं ही मायादेखील आपल्याच गतकर्माचा परिणामस्वरूप मन व बुद्धी यांना ग्रासू शकते.

परंतु या सर्वांवर उपाय म्हणजे नित्य साधनेत राहून व सद्गुरूचरणी श्रद्धा ठेवून, आपले कर्म करत गेल्यास, ती साधना व सद्गुरू भोगाच्या काळात, आपल्या मनाला खंबीर ठेवून, सुखाच्या वा उपभोगाच्या काळात, मन स्थिर ठेवायला मदत करतील. आपल्या साधनेच्या व सद्गुरुंच्या हाती कर्मफलाचा लगाम दिला की, यशात जमिनीवर राहायला आणि अपयशाच्या काळात स्थिर राहायला ते मदत करतील. म्हणजेच योग्यवेळी लगाम सैल सोडून, योग्यवेळी तो ओढून धरतील. 
 
------------------------------------------------------------------------
हे आवाहन पुढील काही दिवस प्रत्येक लेखाखाली असेल. 

श्रीगणेशाय नमः पुस्तक : भोग आणि ईश्वर भाग १ बद्दल.

भोग आणि ईश्वर हे आता भाग १ या रुपात पुस्तक स्वरूपात गुढीपाडव्याला प्रकाशित होऊन, विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  ज्यांना स्वतः घेऊन जाणं शक्य आहे, त्यांच्यासाठी पुणे , मुंबई (खार) , डोंबिवली व बदलापूर येथे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल व त्यांना पोस्टेज/कुरियर  खर्च आकारला जाणार नाही. 

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. ज्यांचे व्हाट्सऍप क्रमांक आहेत, त्यांना ही पोस्ट व्यक्तिगत कळवण्यात येईलच. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
------------------------------------------------------------------------

उद्याच्या भागात पुन्हा भेटूच. पण तोपर्यंत  गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तुमच्या गुरूंपर्यंत नेईल व तारेल. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...