ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७२
प्रभुंच आणि देवी जानकी यांच यथास्तित भोजन झाल्या नन्तर हनुमंताने शिदोरी उचलुन सुयोग्य जागी ठेवली आणि प्रश्न केला की,
" प्रभु मला माझी शंका विचारण्याची अनुमति द्यावी, जी मी मातेला भेटण्याआधी विचारली होती. तीचे समाधान झाल्याशिवाय ती मनास शांत होऊ देणार नाही. तद्वत अनुमति असावी."
प्रभु स्मितवदन म्हणाले
" जरूर विचार हनुमंता. मी यथाज्ञान तुझ समाधान करण्याचा यत्न करीन."
"प्रभु आपण सर्वज्ञानी आहात आपण माझ समाधान कराल हा विश्वास आहे मला. आपल्याच मागील कथनानुसार उत्पन्न अशी माझी शंका ही आहे की, कोणत्याही जिवाला जऱ स्मरणात राहताच तुमच्या प्रति पोहोचता येत असेल तर मग कर्मफलाचा अर्थ क़ाय."
" उदाहरणार्थ "
". रावण हा दुराचारी, अधमी आणि खल प्रव्रुत्तिचा होता. त्याच्या कर्माप्रमाणे त्यालाही नरकप्राप्ति व्हावयास हवी होती. मग आपल्यास्मरण मात्रे तो तरला हे तार्किक दृष्टया पचनी पड़ल नाही. क्षमा असावी मी या आधी कथन केले नाही आणि आपण म्हणता यावर पूर्ण श्रद्धा आहे. तरीही साशंकता आहे . म्हणून आपण समाधान करावे."
"वा हनुमंता चाणाक्ष आणि बुद्धिमान आहेसच पण जिज्ञासु सुद्धा आहेस. ऐक तर मगतुझी शंका तर्कसंगत आहे. याच योग्य उत्तर म्हणजेच जी बाजू तुला माहित नाही अथवा विस्मृतित आहे त्याबद्दल सांगतो. ऐक. नाम विरुद्ध अर्थाने घ्यावे अथवा योग्य उद्देशाने घ्यावे ते नाम फक्त आपला धर्म जाणते. म्हणूनच अनेक असुराना या आधी त्यांच्यां तपानुसार वर मिळालेच. नव्हे ते देणे क्रमप्राप्त होत. कारण नामाचा नैसर्गिक प्रकृतिधर्म त्या साधकाला त्याच्या श्रद्धेनुसार इच्छित नामदेवतेपर्यन्त पोचवणे. त्यानुसार नाम ते कार्य यथास्तित पूर्ण करते. पण इच्छित देवतेप्रत पोचल्यावर क़ाय मागायच हे ती देवता नाही तर तो जीव ठरवतो. इथपर्यंत ग्रहण झाल."
" हो भगवंता "
" एकदा लक्षप्राप्ति झाली की त्याचा कशाप्रकारे उपयोग करून घ्यायचा हे ज्याच त्याने ठरवायच. नाम त्या प्राण्याचे पुर्वकर्म सुधरून देण्यास हातभार लावते. त्याला मोक्षाच्या वाटेवर पुढे घेऊन जाते. तद्वत रावणाने मृत्यु आधी अनेक वार रामनामाचा उच्चार केला. नामजपात अनेक जन्मांचे पाप धुवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. त्याची शक्ति प्रत्यक्ष परमेश्वराच्या शक्तिहून श्रेष्ठ आहे. तुझी माझी भेटही त्यामुळेच घडली या जन्मी. तसेच विभीषण व शबरी यांचेही नामबल अत्यंत उच्च प्रतिचे होते. दोघेही थोर साधक होते. त्यांच्याप्रत पोचणे मला क्रमप्राप्त होते. इतकी त्यांच्या तपाची शक्ति होती. आणि अन्ते मति सा गति: या तत्वानुसार रावणाला असलेला मद, मोह, काम क्रोध मत्सर, दंभ अर्थात दुराभिमान हा मायेचा प्रभाव शेवटी गळून पडला. तो पश्चातापाच्या अग्नित जळून पावन झाला.
पश्चाताप जऱ सत्य असेल तर तेच प्रायश्चित्त ठरत. त्यायोगे आत्मा उजळून निघतो. परन्तु त्याच्या पुण्यप्रभावानुसार तो स्वर्गसुख उपभोगून पुन्हा पावन होण्यासाठी मर्त्यलोकि जन्मु शकतो. आत्म्याचा हा खेळ पूर्ण मोक्षप्राप्तिपर्यन्त अविरत चालू रहातो."
" अर्थात प्रभु पूर्णमोक्षप्राप्ति म्हणजे क़ाय"
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment