Skip to main content

जानकी पुनःवनवास ६८

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६८


कोणतीही माता ही प्रथम आणि शेवटी मातच असते. पुत्र दूर असण आणि बराच काळ भेट न होण हे अत्यंत क्लेशकारक आणि वेदनादायी आहे. पण हाच पुत्र दुरवलाय तरीही अश्या कामात आहे की ,

पुत्र व्हावा ऐसा गुंडा
ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

तर मातेला त्या विरहात देखील एक संतोष असतो की, पुत्र दूर आहे पण अश्या कार्यात आहे की जे कार्य भविष्यात त्याला चिरंजीवत्व देईल, देहरूपी आणि चरित्ररूपी. अश्याच मोजक्या मातांमधे माता अंजनीची गणना झाली होती. त्यातही अभिमानाची गोष्ट अशी की पुत्राच्या कार्याची महती व पुत्राची स्तुति कोण्या थोर वा उच्च पदस्थ व्यक्तिकडून  ऐकायला मिळण्या सारख सद्भाग्य यांच जन्मी यांच देही लाभलेली माता अंजनी सुखेनैव मारूतिरायाकडे विलक्षण कौतुकाने पहात होती

ऎसा पुत्र मी थोर प्रसवला
धाके जो कळि काळाला
प्रभुसेवेचा लाभ पाहिला
शक्तिचा जो स्रोत जाहला
ऎसा पुत्र मी थोर प्रसवला

युक्तिचा परिपाक कोंडीला
ज्याने महाविष्णु संतोषला
लक्ष्मीलाही याने उद्धरिला
कार्याचा तो भार उचलला
ऎसा पुत्र मी थोर प्रसवला

द्रोण एकहस्ते उचलला
शेषाला यमपाशे सोडविला
सद्भाग्याची खाण जाहला
मातेला सानंदे पूजिला
ऎसा पुत्र मी थोर प्रसवला

वायुवेगे कार्यास पोचला
जगताधारे सिद्ध जाहला
प्रभु आनंदे आशीष दिधला
ज्याला जगती बहु मानिला
ऐसा पुत्र मी थोर प्रसवला

माता अंजनी फक्त पुत्राला बघत होती आणि सोबत नयनात अश्रु आणि ओठात कौतुक, पुत्राच.  का नसाव. जीला हनुमंतासारखा पुत्र प्राप्त झाला. ज्याने बालपणी आपल्या खोड्यानी त्राहि करून सोडल होत, त्याच इतकं कौतुक व्हाव यासारख भाग्य ते क़ाय मातृजन्माच.  कदाचित जन्मभर माता अंजनी पुत्रावलोकन करत राहिली असती. पण इतक्यात हनुमंताने मातेला विचारल की,

" क़ाय पाहतेस माते"

" तुझ कौतुक जे स्वतः राजा सुग्रीवानी येऊन इथे जमिनीवर बसून कथन केलय, पुत्रा ते अजून आठवतय आणि आठवल तरी कौतुकाने मन पुनः पुनः भरून येतय. तरीही पुन्हा रीतं होऊन पुन्हा तेच कौतुक आठवतय. पुत्राच अस गुणगान ऐकायच भाग्य तू दिलेस मला. जन्माच सार्थक केलस माझ्या. तेच पाहते आहे तुझ्या डोळ्यात."

" मग तिथे तुला अजून काही दिसतय का?"

"अर्थात"

" अर्थात भूक जी आग बनून मला ग्रासू इच्छीत आहे"

मातेने दोन रट्टे हाणले. पण तिला कौतुक सुद्धा वाटल की, इतकं महान कार्य करून सुद्धा माझा पुत्र ते कौतुक ऐकू इच्छीत नाही आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ही विशेष अभिमानास्पद गोष्ट आणि गुणधर्म पुत्राचा.

" थांब मारुति तुला लगेच भोजन देते. पण इथेच बसून खाणार की बालपणीसारख एखाद्या फांदिवर बसून. "

अस मातेने म्हटल्याबरोबर माता अंजनी आणि हनुमंत हास्यासागरात  बुड़ुन गेले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...