Skip to main content

जानकी पुनःवनवास ८२

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८२

प्रसन्न मुद्रेने ब्रम्हदेव दशाननाला म्हणाले

" बोल वत्सा तुजप्रत कल्याण होवो. निर्भय होऊन माग "

" ऐकाव देवा. समस्त चराचरावर राज्य करण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. त्रिलोक विजय हेच माझ उद्देश आहे आणि त्यासाठीच आपण मला अमरत्व प्रदान कराव."

" वत्सा हे कदापि शक्य नाही. असा वर मी कोणालाही देऊ शकत नाही. अमरत्व सोडून काही दूसरा वर माग. जरूर मी तुझी इच्छा पूर्ण करीन."

"ठीक आहे तर मग. ऐकाव.  देव, सुरवर, दानव, असुर, निशाचर, यक्ष, किन्नर, वरुण, इंद्र, यम, यापैकी कोणा कडूनही मला म्रत्यु येऊ नये.  मी फक्त यानाच आपला शत्रु मानतो. बाकीं मानव आणि पशु हे माझ्या दॄष्टिने तुच्छ जीव आहेत, ते माझ काहीही वाकडं करू शकणार नाहीत , याची मला पूर्ण कल्पना आहे."

"जशी तुझी इच्छा दशानना. तथास्तु. हे शूर्पणखा तुझ्या सुद्धा घोर तप केले आहेस. मी तुझ्यावर देखील प्रसन्न आहे. तूसुद्धा इच्छिल ते माग."

" हे ब्रम्हदेवा तुम्ही जऱ खरच प्रसन्न असाल तर मला अशी मायावी शक्ति द्या ज्यायोगे मी कुठेही केंव्हाही प्रकट होऊ शकेन आणि कोणतेही रूप कधीही धारण करू शकेन."

"जशी इच्छा शूर्पणखे. तथास्तु"

इतकावेळ शांत असलेल्या कुम्भकर्णाकड़े वळून काही सांगणार इतक्यात अनेक देव ब्रह्हदेवांच्या कानात येऊन सांगतात हे देवा कॄपा करा आणि याला कोणताही वर देऊ नका. कारण काहीही वर न मिळताच हा इतका उत्पात करतो आहे.  वर मिळताच हा त्राहि त्राहि करून सोडेल. तेंव्हा हे देवा कृपे करून जगताला वाचवा. ब्रम्हदेव एक क्षण विचार करून देवी सरस्वतीच चिंतन  करताच  समोर साक्षात देवी प्रकट होतात.

"आज्ञा देवा कोण्या कारणे आपण माझ स्मरण केलेत."

" हा कुंभकर्ण आता वर मागेल. त्याआधी आपण त्याच्या जिव्हेवर आरूढ़ व्हाव, जेणेकरून हा काही गैर मागणार नाही."

" जशी आज्ञा देवा."

अस म्हणून देवी सरस्वती कुम्भकर्णाच्या जिव्हेवर स्वार होते. इकडे ब्रम्हदेव विचारतात

" हे कुम्भकर्णा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. जे तुझ्या ओठी येत असेल ते माग मी ते पूर्ण करीन."

कुम्भकर्ण म्हणतो

" देवा मला झोप प्राणाहून प्रिय आहे तेंव्हा मला झोपेच वरदान द्या"

ब्रम्हदेव त्वरित तथास्तु अस म्हणतात आणि देवी सरस्वती अंतर्धान पावतात.

दशानन , शूर्पणखा आणि स्वतः कुम्भकर्ण विस्मयाने पहातात की इतकि घोर तपश्चर्या करून याने हा क़ाय विचित्र वर मागितला. कुम्भकर्ण स्वतः विचार करतो अशी क़ाय मोहिनी जडली बुद्धिला की मी हा वर मागितला.

" हे धर्मरूप, धर्मात्मा विभीषण तुझ्या तपतेजाने मी प्रदीप्त झालो आहे. तू सुद्धा इच्छीत वर माग मी तो पूर्ण करण्यास उत्सुक आहे."

" हे देवाधिदेव ब्रम्हदेवा, जऱ आपण प्रसन्नच असाल तर आपण मला कायम , सर्वकाळी, सर्ववेळी निरंतर, नित्य, धर्ममार्गावर चालण्याची , वागण्याची, बोलण्याची अर्थात काया, वाचा, मन या द्वारे फक्त आणि फक्त धर्माच्या व सत्याच्याच मार्गावर चालण्याची सुबुद्धि द्यावी. अशी बुद्धि की , जी कधीहि ढळणार नाही. कोणत्याही संकटात तीच बुद्धि माझी प्रेरणा व तारक असेल. त्या मार्गावर चालताना कधीही माझा तोल ढळणार नाही."

" हे महात्मा विभीषण मी तुझ्या बुद्धिवर खुप प्रसन्न आहे. प्रत्यक्ष मी उपस्थित झाल्यावर अनेकांची बुद्धि भ्रष्ट होते. त्याद्वारे ते भौतिक सुख, सामर्थ्य, माया, शक्ति, युक्ति, म्हणजेच मर्त्य जगात उच्चता मिळेल अश्याच गोष्टी वर म्हणून मागतात. परन्तु तू तर या सर्वांहुन निराळा आहेस. अश्या कोणत्याही मोह जालात न अडकता तू या मर्त्य जगातून तारुन नेणारा असा वर मागितलास.  माझ मन प्रसन्न झाल, तुझ्या सारखा भक्त पाहून. तुझी ही इच्छा पूर्ण होईल. परंतु मी स्वेछेने तुला अमरत्व प्रदान करतो. तू यांची देही चिरंजीव होशील आणि ज़गाच्या अंतापर्यंत धर्ममार्गाचा ध्यास धरशील. वत्सा तुजप्रत कल्याण होवो."

" भगवान मी आपला कृपाभिलाषी आहे आणि आजीवन ऋणी राहिन. आपण मला दिलेल्या बहुमूल्य वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही याची मी आपल्याला शाश्वती देतो आणि आश्वस्त करतो."

" शुभम भवतु भक्ता.

आणि ब्रम्हदेव अंतर्धान पावतात.

इच्छीत वर प्राप्तिमुळे दशानन आणि इतर दोन असुर पूर्ण भयरहित होऊन समस्त जगतात आणि तिन्ही लोकांत त्राहि त्राहि असा अत्याचार सुरु करतात

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...