ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ८८
भरत सर्वाना घेऊन अतिथिगृही परतला.
प्रभुनी काही काळ लक्ष्मणाबरोबर सैन्याच्या गरजा, सुसज्जता, परराज्यातिल गुप्त वार्ता यावर उपयुक्त चर्चा करून काही महत्वपूर्ण सूचनां केल्या. शत्रुघ्ना बरोबर राज्यातील घडामोडी आणि लोकांच्या काही तक्रारी असल्यास त्यावर चर्चा केली.
इतक्यात काही गुप्तचर भेटिसाठी वेळ मागत आहे असा निरोप घेऊन प्रतिहारीं आला. प्रभुनी त्याना आपल्या महालात घेऊन येण्यास सांगितले आणि लक्ष्मण व शत्रुघ्न याना सूचनां देऊन प्रभुनी महालाकडे प्रस्थान केले.
तिथे काही गुप्तहेर जसे विजय, मधुमत्त, काश्यप , मंगल , कुल, सूर्याजी, कालिय, भद्र दंतवक्र आणि सुमागध हे प्रभूंच्या महालाबाहेर प्रतीक्षा करत होते.
प्रभुनी त्यांना आत येण्यास सांगितले. प्रभुनी राज्य कारभार सुरु केल्या पासून हे नित्याचे होते. रोज सर्व कारभार झाल्यानंतर व अन्यथा काही जरुरीचे काम असल्यास , प्रभू आपल्या गुप्तचरांकडून शत्रूंबद्दल, त्यांच्या हालचालींबद्दल , सैन्याच्या मानसिकतेबद्दल माहिती घेत. त्याचबरोबर एक उत्तम राजा असल्यामुळे राज्याबद्दल, राज्यकारभाराबद्दल, राजाबद्दल आणि राजपरिवारातील इतर सदस्यांबद्दल प्रजेचं काय मत आहे याचा वेळोवेळी अंदाज घेत असत. त्याच रिवाजानुसार नुसार प्रभुनी या सर्वांना भेटीस बोलावले होते.
प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्राशी निगडित समाचार प्रभूंच्या कानावर घातल्या. ज्या त्यांनी शांतचित्ते ऐकून काही सूचना सुद्धा केल्या. काही बाबतीत त्यांचे मत देखील विचारले. त्यानंतर भद्र नावाच्या गुप्तचरांकडे वळून प्रभू म्हणाले,
" राज्यात राजाबद्दल, माझे बंधू लक्ष्मण , भरत शत्रुघ्न तसेच राजपरिवारातील बाकीच्या सदस्यांविषयी प्रजेचं एकूण काय मत आहे. काय चर्चा चालते, यावर मला विस्तृत निवेदन हवंय. "
" प्रभू आपण वनवासात जाऊन चौदा वर्ष राहून पितृआज्ञा पालन करून एक आदर्शवत आयुष्य जगलात आणि त्याच बरोबर रावण वध करून अयोध्येचा गौरव वाढवून आलात याबद्दल सर्वांना अत्यंत अभिमान आहे. तुम्ही रघुकुलाच्या कीर्तीला आसमंतात नेलेत याबद्दल कोणाचंही दुमत नाही. उलट सर्वानसाठी ती अभिमानास्पदच आहे. "
" अजून काय काय मत आहे प्रजेचं, सर्व घटनांबद्दल मला विस्ताराने सांगा. "
"अजून तुमचा सर्व बंधूंचा सलोखा हा एक उत्तम आदर्श आहे यातसुद्धा दुमत नाही. तुमचा सर्वांचा आदर्श समस्त अयोध्यावासी नव्हे तर समस्त जगताने घ्यावा असहि सर्वांच मत आहे. हीच रघुकुलाची रीत सदैव चालू राहूदे अशीही प्रार्थना सर्वजण ईश्वराकडे करतात. "
प्रभू हे सर्व ऐकून समाधानी तर दिसत होतेच पण तरीही काही पूर्ण कथन होत नाही याबद्दल त्यांना शंका येऊ लागली. म्हणून त्यांनी भद्रास सांगितले.
" हे भद्रा तू पूर्ण माहिती जी तुझ्याकडे आहे ती मला दे. आणि कोणताही संकोच न करता तू कथन कर आणि जी वार्ता तुला सांगायची असेल अथवा जो परामर्श तुला करायचा असेल तो तो निःसंकोच कर. "
यावर भद्र म्हणाला
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment