(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ७
"चलाव दादा मी आहे आपल्यामागे." कृष्ण म्हणतो
कृष्ण दादाच्या पावलांवर प्रस्थान करतो आणि देवी रेवती या देवी रुक्मिणी, देवी सत्यभामा, देवी जम्बुवंती सह इतर कृष्ण पत्नीना बोलवायला राजमहालात निघुन जातात. देवी रुक्मिणी आणि देवी रेवती यांची भेट होते. देवी रेवती विचारतात
" द्वारकेस प्रस्थान आता कोणत्याही क्षणी होऊ शकतं त्यांमुळे आपली तयारी कितपत आहे ते एकदा बघून घेऊ. सेवकवर्गाने सर्व केले असेलच, पण आपण एकदा नजरेखालून घालू. कारण काही समस्या आल्यास आपल्यावर दोषारोप टाकून दोन्ही बन्धु मोकळे होतील. "
" हे बाकीं रेवती वहिनी तुम्ही योग्य बोललात. चला आपण एकदा बघुया. मी बाकीच्या राण्याना घेऊन येतेच."
" हो ये तू. मी पुढे होते"
इकडे ही तयारी चालू आहे. पण तिकडे गोकुळात क़ाय स्थिति आहे ते बघुया. ज्यानी कृष्णासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यानी जाण्याच्या तयारीला सुरवात केली. त्यांच्यासाठी कृष्णाने वाहनांची विशेष व्यवस्था सुद्धा केली आहे. त्यांमुळे तेही त्याच धामधुमित आहेत. पण काही व्यक्तिगत आणि अन्य कारणास्तव ज्यानी न जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे आणि विरहाचे भाव दाटलेले आहेत. कारण इतकी वर्षानची सख्य असलेले आपले बांधव कायम स्वरूपी सोडून जात आहेत याच दुःख आहे. अर्थात जे जात आहेत त्यानासुद्धा हे विरहाच दुःख आहेच. पण यात सर्वात अगतिक स्थिति आहे राधेची. तिच्या मनाचा ठाव लागतो का पाहुया. बघुया तिच्या मनात क़ाय चाललय. बऱ्याच काळात कृष्ण न भेटल्यामुळे तिची अवस्था काहीशी अशी आहे
ही विरही प्रीतीची बेला
श्रावण हा रिताच गेला
तो आला नाही घनही
घनश्याम ही आला नाही
किती जळून वृदावनी या
तरु लता समर्पित झाल्या
मन अजूनी तरी वाट पहाते
मुरलीची धुन परि नच येते
ती आली बघ आली सयहि
तरी मयूरावीण नाही नभही
पसरून पंख तो आहे चातक
वाट पाहतो हे का पातक
हा कृष्ण कृष्ण जाइ तो दूर
सोडुन तिमिरी या मज घोर
या विरही बेलेतून मग मी
एकटीच जळते रे अजूनी
एकटीच जळते रे अजूनी
एकटीच जळते रे अजूनी
याचाच विचार करत आणि याच भावावस्थेत राधा सखींसह वृंदावनाच्या दिशेने निघाली आहे, कृष्णभेटिसाठी. कारण तिलाही कृष्णाचा संदेश मिळालेला आहेच, द्वारके प्रस्थानाची निकड आहे. पण एकदा भेट वृंदावनी. पुन्हा एकवार माझी मुरली आणि तुझे पैजण. तेंव्हा ये सखयाना घेऊन. पुन्हा एकदा फेर होऊ देत. म्हणून कृष्णवीरहिणी राधा निघालेली आहे वृन्दावनाकडे.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
१९/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment