Skip to main content

जानकी पुनःवनवास ८४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८४

पुत्र मेघनाद याच्या यज्ञ पुर्तते विषयी आणि सिद्धि प्राप्ति बाबत ऐकून दशानन अजूनच उन्मत्त झाला. इन्द्रलोकीच्या चढ़ाई विषयी ऐकून मेघनाद अत्यंत हर्षित झाला आणि म्हणाला

" पिताश्री ही उत्तम योजना आहे. मलासुद्धा इंद्राला बंदिवान करण्याची खुप प्रबळ मनीषा आहे. पण आधी आपल्या बाकीच्या युद्धाविषयी क़ाय समाचार आहे."।

" आम्ही पृथ्वी, पाताळ, यमलोक , सूर्यदेव , चंद्रलोक, वरुणनगरी सर्व जिंकून ताब्यात घेतलय. आता स्वर्ग घेतला की तिन्ही लोकी आपलेच राज्य."

यावर दशानन आणि मेघनाद दोघेही विकट हास्य करतात. काळाला त्यात इंद्राचा पराभव आणि मानहानी स्पष्ट दिसते आहे.

सांगताना अगस्त्य प्रभुना मधेच म्हणाले

"येथे एक गोष्ट लक्षात घे राजारामा की, दशाननाचे सर्व विजय हे त्याला मिळालेल्या वरामुळे होते. कारण ज्याना ज्याना त्याने पराभूत केलय, त्यात यम व सूर्य यानी युद्ध करण्याआधीच ब्रम्हदेवाने त्याना प्रकट होऊन सांगितले की याला मारू नका आणि मी दिलेल्या वरदानाचे रक्षण करा. अन्यथा यमाने आपला कालदंड दशाननास मारण्यासाठी उचलला होता आणि तो कालदंड हे असे अमोघ अस्त्र आहे ज्यापुढे कोणाचाहि पाड़ाव लागू शकत नाही. तसच सूर्यदेवापुढेहि कोणाचा पाड़ाव लागू शकत नाही. म्हणून या दोघानि युद्ध न करताच पराभव स्वीकारला हे ध्यानात ठेव.

इंद्राच्या स्वर्गलोकावर आक्रमण करण्यास्तव दशाननासह मेघनाद आणि चार लक्ष असुरबल निघाले. स्वर्गलोकी आक्रमण करून इंद्राच्या सर्व वसुना मेघनादाने परास्त केले.सरतेशेवटी स्वयं इंद्र युद्धास आला. यावेळी दशानन मेघनादास म्हणाला

"तू काही काळ विश्राम कर इंद्राला मी स्वये पाहातो." मेघनाद मोठ्या निराशेने तयार झाला आणि युद्धक्षेत्राबाहेर जाऊन बसला.

इंद्राचे  आणि दशाननाचे तुंबळ युद्ध झाले. जे हजार वर्ष चालू होते. शेवटी अनेक ठिकाणी युद्ध करून थकलेल्या दशाननास इंद्राने आपल्या अमोघ आणि दिव्य अस्त्रानी घायाळ केले. याचवेळी महापराक्रमी मेघनाद युद्धास आला . त्याने सुरवातीपासून आपला पराक्रम व बल इंद्रास दाखवून प्रथमपासून आपले नियंत्रण कायम ठेवले. त्याने त्याच्या कडील सर्व अस्त्र , शस्त्र व माया यांचा अचूक वापर करत इंद्राला परास्त केले आणि बन्दी केल.

हे पाहताच दशानन अत्यंत हर्षित होऊन पुढे आला आणि त्याने मेघनादाला अलिंगन दिले आणि म्हणाला

" पुत्रा मेघनादा, आज तू असुर कुळाचा उद्धार केलास. माझ नाव राखलस आणि साक्षात इंद्राला जायबंदी केलस."

मेघनादाच्या या पराक्रमावर प्रत्यक्ष ब्रम्हदेव प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि वदले

" हे मेघनादा तू तुझ्या पराक्रमाने मला दिपवून टाकलस. मी तुझ्या अतुलनीय पराक्रमाने प्रसन्न झालो आहे. मला प्रसन्न करण्याचा भक्ति व तप हा सर्व परिचित मार्ग आहे, पण तू एकमेव असा आहेस ज्याने मला पराक्रमाच्या बळावर प्रसन्न केले आहे. बोल वत्सा मी तुला एक वर देण्यास उत्सुक आहे."

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...