Skip to main content

मुरली  - ३


(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ३
 . 

पण ही मर्मबंधातली ठेव अजुन जपून ठेवल्ये मी , होय मी , या  यादवनरेश कृष्णाने.

पण तीने ........................ तेच जाणून घ्यायचय. त्याचसाठी ही धावपळ, हा अट्टाहास. की ही शिक्षा  फक्त मलाच आहे.  हे कालपुरुषा वृंदावन आज इतकं दूर कस. की रथाची गति कमी आहे आज. 

कृष्णाच्या मनाची ही अवस्था सारथी जाणून होता. म्हणूनच तो मधेच कृष्णाला समजावणीच्या सुरात सांगत होता.

"आता घटक्यात येईलच महाराज. आज वाऱ्याची दिशा नेमकी उलटी आहे म्हणून घोड्याना वेळ जास्त लागतोय." 

त्याही मनोवस्थेत कृष्णाला सारथ्याच्या बोलण्याचं हसू आल आणि कौतुकही वाटल. किती विचार करतोय हा माझ्या मनस्थितिचा, त्याच्या एकाग्रतेत सुद्धा. खरच रथ चालवण किती एकाग्रतेच कार्य आहे.  तरीसुद्धा हा आपलाही विचार करतोय. त्याक्षणी त्यालाही क़ाय माहित की आपल्यावर देखील  जबाबदारी येणार आहे नन्तर.  कदाचित माहित असेलही. विश्वनियंता आहे तो. पण आज अगतिक होता, आपल्या प्रेमापायी, निष्कलंक ,निरपेक्ष, विषयातीत प्रेमापायी, राधेवरील.

असाच विचारात काही काळ गेला आणि सारथ्याच्या उत्साह पूर्ण आवाजाने कृष्ण भानावर आला. 

" ते बघाव महाराज वृंदावन. नजरेच्या टप्प्यात आल."

कृष्ण , वैकुंठीचा राजा, पण वृंदावनाच्या त्या दर्शनमात्रे मिळालेला स्वानंद, हा परमोच्च आहे याची जाण आणि जाणीव, देही ईश्वर का पहाना, माहित असुनसुद्धा सुखावला. राधेच्या भेटिसाठी आतुर जीव , परमातम्याचा पुर्णांश असलेल्या वासुदेवालासुद्धा, अगतिकता आणि वृंदावनाच्या फक्त दर्शनाचा स्वल्पानंद हिमालयाहून मोठा वाटला आज.
क्षणात विचार विजेसम चाटून गेला, 

" राधा येईल ना, येईल का, तिला आपली साद पोचेल ना, कृष्णविरहिणी माझी राधा." 
 
आणि भगवंतांच्या लोचनातून उष्ण अश्रुधारा सुरु झाल्या. देवाधिदेव, पण इतकं अलौकिक विशुद्ध प्रेम, मैत्री अनुभवतानाच, त्याचे चटकेपण सोसावे लागतात या देहाला, त्याचा दाह होतो मनाला , पीळ काळजाला आणि दुःख भोगाव लागत  अन्तरातम्याला हे माहित नव्हतं आणि कल्पनेतसुद्धा नव्हतं. जाणवल ह्या देहात आल्यावर आणि त्या टप टप ओघळणाऱ्या अश्रुनाही आवेग अनावर झाला. त्यांच्यां स्वरांचा आवाज आला.

कळेल का कधी प्रेम निर्व्याजी, विषयी या जनसाऱ्याना 
किती युगे या देही झिजती किती गेले न कळे कोणाला

अनंत मरणे ज्याने देखिली, झुरतो आज राधा दिसण्यास्तव 
बहु होतील अन झाले, देखुनी यासी धन्य जाहलो जगण्यास्तव

प्रत्यक्ष अश्रुनाही धन्यता मिळाली आज नरेश्वराच्या नेत्रातून ओघळताना.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले 
१५/०४/२०१८
श्रीकृष्ण 
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...