Skip to main content

मुरली - १०

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - १०

यांच अवस्थेत कितीतरी वेळ गेला आणि अचानक आलेल्या एका घोड्याच्या शकटाने आलेल्या आवजामुळे सर्व जणी भानावर आल्या.  गोकुळातून याना शोधत शोधत  काही गोप एका घोडागाडीतून इथपर्यंत पोहोचले होते. याना पाहून त्यातील एक गोप म्हणाला

" तुम्ही इथे क़ाय करताय. आम्ही संपूर्ण गोकुळ शोधून इथपर्यंत आलो आहोत. नशीब कोणीतरी तुम्हाला या दिशेने येताना पाहिल होत, त्यानीच आम्हाला सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो आणि इथे पोहोचलो बघतो तर तुम्ही इथे आहात. "

एक सखी म्हणाली

"आम्हाला कान्हाने इथे यायला सांगितल होत म्हणून इथे आलो. कारण तो आणि बाकीं सारेजण मथुरा आणि गोकुळ सोडून द्वारकेला जाणार आहेत , कान्हाने राज्य आणि राजधानी तिथे हलवण्याचा निर्णय घेतलाय आणि आम्हासह काही जण जाऊ शकत नाहीत. म्हणून कान्हा शेवटच्या भेटिसाठी येणार होता."

"मग येऊन गेला का? चला मग. उन्ह तापलय आणि नन्तर उशीर होईल आणि घरचे काळजी करतील. क़ाय? चला येताय ना ?"

" अं हो हो येतोय काही क्षण आलोच मी घेऊन येते सर्वाना. पण तुम्ही एकच शकट आणलय आणि आम्ही इतक्या जणी आहोत. "

" काळजी नसावी. मागे अजून अश्व शकट आहेत. चला बोलाव सर्वाना. मी घेऊन येतो बाकीची शकट."

" बर"

अस म्हणून ती सखी राधेसह सर्व सख्याना जमा करायला सुरवात करते. सर्व जणी खिन्न मनाने, निराश भावाने व जड़ पावलानी परतण्याचा  निर्णय घेऊन निघतात. राधेचा पाय काही केल्या निघायला तयार नाही. एक एक पाऊल टाकत, प्रत्येक पावलागणिक कृष्ण गेला त्या मार्गाकडे आणि त्याच्या रथामुळे उडालेल्या मृत्तिकेकडे उदास चेहऱ्याने पहात आपल्या नशिबाला दोष देत सख्यांबरोबर ओढल्या सारखी चालत होती. सख्यानी तिला जवळ जवळ उचलून शकटात बसवल.

दोन जणानी खाली उतरून आजुबाजुला फिरून कोणी राहिलं नाही ना याची खातरजमा करून घेतली आणि सर्व अश्व शकट एकाच वेळी निघाली. त्याच्या उडणाऱ्या धुराळयाकड़े हताशपणे पहात राधा जणू मनाने त्या शकटाच्या  आवाजाच्या पलीकडे गेली होती. कोणीही वाटेत फार काही बोलल नाही. किंबहुना कोणाचीही त्या मनःस्थितित नव्हतच. आता आवाज फक्त गाड्यांचा आणि त्या हाकताना होणाऱ्या गाड़ीवानाच्या बोलण्याचा. बस.

इकडे मथुरेहुन सुद्धा सर्व रथ गाड्या, सैन्य, अश्व, घोडदळ , सर्व नागरिक, त्यांच्यां सामानाच्या गाड्या, बैलगाड्या, असा सर्व लवाजमा तयार आहे. वाट पाहात बलरामदादाच्या आज्ञेची प्रतीक्षा करत.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
२२/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...