Skip to main content

जानकी पुनःवनवास ७९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ७९

येथे प्रभु प्रश्नकर्ते झाले

" महामुनी अगस्त्यजी म्हणजेच तेथे रावणा आधी राक्षस अस्तित्वात होते."

यावर ऋषिराज वदले

" होय राजा. ब्रम्हदेवानी सृष्टि घडवली त्यावेळी ती जलमय होती. त्यातील जीवजंतु अन्नाविना तड़फड़त होते. ते ब्रम्हदेवाकड़े आले. त्यातील अर्धे रक्षामि (आमच रक्षण करा) अस म्हणाले आणि अर्धे यक्षामि ( आमच पोषण करा) अस म्हणाले.

बम्हदेवानी तदनन्तर ज्यानी रक्षामि अस म्हटल त्याना राक्षस म्हणून जन्माला घातल आणि ज्यानी यक्षामि म्हटल त्याना यक्ष म्हणून जन्माला घातल. अश्या तर्हेने राक्षसांची उत्पत्ती व उत्पात या जगात मुलारम्भापासुन चालला आहे.

अश्याच राक्षस कुळात  हैती राक्षसाने महातपोबलाने वर प्राप्त करून घेतले होते. त्याचाच पुत्र विद्युत्केश यानेदेखिल पित्याप्रमाणे उग्र तप करून अनेक सिद्धि प्राप्त केल्या होत्या. दोघानीही जगताला भयंकर ताप दिला आणि जगताला त्राहि त्राहि करून सोडल.

यांच्याच काळात राक्षस लंकाद्विपावर वसतिसाठी आले. त्याआधी येथे देवलोकांची वसति होती. त्या देवलोकांनी या नगराला एका सुंदर नगरीच स्वरूप दिल होत., छान रस्ते, सुंदर बाग़बग़ीचे, विहारासाठी व स्नानासाठी रमणीय व विस्तीर्ण  तलाव, त्यांच्या चहुबाजुला विविध रंगी फुलांची झाड़, वेली, उद्यानात विविध प्रकारचे ऊंच ऊंच व्रुक्ष या सर्वानी ती नगरि अत्यंत मोहक एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत असे. त्यातच रात्री विविध दिव्यांच्या रोषणाईने नगरीला स्वर्गासमान शोभा येत असे.

त्या देवाना पळवून लावून राक्षस येथे वसतिसाठी आले आणि इथेच स्थायिक झाले. पण आजुबाजुच्या सर्व राज्याना व प्रदेशाना त्याचा उपद्रव सुरु झाला. विद्युत्केशीचा पुत्र सुकेश याच्या नन्तर तो अधिक वाढला. सुकेशसुद्धा मोठा बलवान व तपोबलाने मत्त जाहला  होता. याला तीन पुत्र झाले.  माल्यवान, सुमाली आणि माली. या तिघानिहि घोर तप केले. ज्यावर प्रसन्न होऊन ब्रम्हदेवानी त्याना अनेक।सिद्धि व वर प्रदान केले.

त्याच जोरावर यांचा ताप त्रिभुवनाला सुरु झाला. आता यानी मिळालेल्या वरांच्या व सिद्धिंच्या जोरावर स्वर्गातील देव देवताना सुद्धा त्रास देण्यास सुरवात केली. ज्याला कंटाळून सर्व देव महाविष्णुच्या पायी आले आणि त्याना विनवणी केली की आपणच यातून आम्हाला सोडवा. भगवंतानी ध्यानधारणेने सर्व जाणले आणि तिन्ही राक्षसांसह सर्व असुराना पाताळी परत पाठवून लंका व तिन्ही लोक भयमुक्त केले.  यांच् सुमालीचा पौत्र रावण अर्थात दशग्रीव."

"अर्थात त्याचीसुद्धा जन्मकथा मला सांगावी आपण" प्रभुनी।अगस्त्य ऋषिवराना प्रार्थना केली.

" ऐक तर राजन"

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...