ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ८७
प्रभू पुढे वदले
" कोणतेही महत्तम कार्य हे अनेकांच्या एकत्रित अथवा व्यक्तिगत प्रयत्नाचे फलरूप असते. रावण वधाचे कार्य हे देखिल तसेच आहे. यात प्रत्यक्ष युद्ध केलेले मी, लक्ष्मण, सुग्रीव हनुमंता, नल नील , अंगद यासहित सारे वानरगण , अगदी सेतुकार्यात सहकारी खार, इथपासुन ते रावणाच्या अत्याचाराने मृत्युमुखी पडलेले अनंत जीव, त्यांचे कुटुंबिय, यात विनाकारण भरडले गेलेले अगणित साधुसंत , रावणाच्या पाशवी युद्धखोरीमुळे मारले गेलेले अनेक पशु जसे अश्व, गज इत्यादि, तसेच दोन्हीकडील करोड़ो जीव, हे सर्वच्या सर्व मदतनीस आहेत, या महान कार्याला शेवटास नेण्यास. अनेक जणांची घोर तपश्चर्या, मग ती प्रत्यक्ष्य केलेली असो वा अनंत आत्म्यानी असहायवश आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आपल्या मनात रावणाबद्दल व्यक्त कलेला राग, क्रोध असो, त्याचेही तितकेच मोल आहे., किंबहुना तेही तितकेच अमूल्य योगदान आहे. कारण कोणतेही कर्म जसे वाया जात नाही. त्याचप्रमाणे या साऱ्यांच्या एकत्रित परिणाम म्हणजेच रावणवध होय. "
या क्षणी प्रभुंच्या एकाग्रचित्त बोलण्यामुळे त्यांच्या मुखकमलावर एक अलौकिक भाव व तेज प्रकट झालेले सर्वानी पाहिले आणि त्याना आदरपूर्वक प्रणिपात केला. प्रभुनी त्याचा सहर्ष स्वीकार केला.
"परन्तु तरीही लक्ष्मणाचा पराक्रम हा कोणत्याही अंशी कमी होत नाही. तो बघण हा एक मणिकांचन योग आहे, जो युगा युगात एकदा पाहायला मिळतो. पण आमच भाग्य थोर की, तो योग याजन्मि लहानपणापासून प्रत्यक्ष पाहायला मिळालाय."
यावर भ्राता लक्ष्मण वदला
" हे ज्येष्ठ भ्राताश्री , आपण माझी करत असलेली स्तुति ऐकून अंगावर रोमांच आले. किंबहुना अवघ्या जन्माचे सार्थक झाले. प्रत्यक्ष प्रभुनी माझी सेवा आपली मानून मला कृपाभिलाषी केलय. हे खरतर माझच सद्भाग्य की आपला भ्राता म्हणून जन्म घेतला. हा भ्राता होण्याचा योग पुढील जन्मात सुद्धा मिळावा हिच नम्र प्रार्थना आहे आपल्या चरणांशी."
यावर प्रभुनी सूचक स्मित केल, जे उभयतानाच समजल. प्रभू पुढे म्हणाले
" आपण सर्व रुषिमुनिनी येथे येऊन आम्हास रावणासह सम्पूर्ण असुराविषयी विस्तृत कथन करून उपकृत केलेत. त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. आता आपण आमच्यासवे काही काळ राहून आमचे आतिथ्य स्विकारून उपकृत करावे. हिच नम्र विनंती आहे आपल्या चरणी."
यावर अगस्त्य ऋषी सर्वांच्या वतीने म्हणाले.
" हे रघुकुलदीपक राजा श्रीराम आम्ही साधु असल्यामुळे जास्त काळ परगृही राहणे वर्ज्य आहे आम्हास. पण आयोध्येची अतिथ्यशीलता आणि सद्भाव याचा सन्मान राखण्यास्तव अल्प काळ राहून आम्ही प्रस्थान करू. हे मात्रा सुनिश्चित. आज्ञा असावी."
यानंतर चारही बंधुनी ऋषिवराना सद्भावे प्रणिपात केला. प्रभू भरताकडे पाहात म्हणाले
" भरत सर्व संमान्य अतिथिना अतिथिगृही घेऊन जा आणि त्यांचे योग्य अदरातिथ्य कर. आम्ही आपल्या दर्शनास उद्या प्रातः समयी येऊ. नमोनमः "
नमोनमः राजन"
यानन्तर भरत सर्वाना घेऊन अतिथिगृही परतला.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment