ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७३
हनुमंताने लगेच पृच्छा केली की,
" अर्थात प्रभु पूर्णमोक्षप्राप्ति म्हणजे क़ाय"
"हे हनुमंता तू स्वतः ज्ञानाचा सागर आहेस आणि तरीही अजून ज्ञान प्राप्तिची तुझी जिज्ञासा खरच कौतुकास्पद आहे."
" प्रभु माझ जे ज्ञान आहे ते आपल्यामुळेच आहे आणि शास्त्रवचन अस सांगत की जस नाम हे कोणत्याही अवस्थेत शुद्ध आहे आणि कितीही घेतले तरीही कमीच् आहे , तद्वत ज्ञान हे सुद्धा पूर्ण पवित्र आहे आणि आध्यात्मिक ज्ञान जितक आणि जस मिळेल तस आणि तितक ते घेत जाव. ते बहुउपयोगी आहे."
" इथे एक मूलभूत भेद लक्षात घे की, ज्ञान नुसतच साठवून काहीही उपयोग नाही. तर त्याचा उपयोग करण तितकच महत्वाच आहे. किंबहुना यालाच ज्ञान आत्मसात करण म्हणतात. मिळवलेले ज्ञान अंतरात्म्यापर्यन्त जाऊन त्याचा आत्मोन्नत्ति साठी सदुपयोग जेंव्हा होतो तेंव्हाच खरी ज्ञानप्राप्ति होते. अस ज्ञान मातेकड़ून वा सुयोग्य गुरुकडून मिळालेले असल्यास ते सर्वश्रेष्ठ ठरत. आत्मोन्नत्तिच्या दॄष्टिने हेच ज्ञान सर्वोत्तम मानल जात. "
" का भगवन "
" कारण हे दोघेही स्वार्थरहित ज्ञान प्रदान करतात आणि यांचा उद्देश स्वार्थरहित असतो."
"एक स्वाभाविक प्रश्न "
" बोल वत्सा"
" माता तर कोणत्याही परिस्थितीत पुत्राच्या उन्नतिची कामना करते. जे नैसर्गिक आहे. पण सुयोग्य गुरु कसा ओळखावा काही सुत्र आहे का की काही संज्ञा आहे याची "
" योग्य प्रश्न केलास हनुमंता. सयोग्य गुरु तोच जो शिष्याची उन्नति होत असताना संतोष पावतो. ज्याच्यां व्रुत्तिमधे आईचे ममत्व व प्रसंगी पित्याची कठोरता असते."
" अर्थात पित्याची कठोरता का"
" शिष्य जऱ काही चूक वा प्रमाद करत असेल तर प्रसंगी जो त्यालाही वठणीवर आणू शकतो. त्यासाठीच पित्याची कठोरता असावी लागते. असाच गुरु श्रेष्ठ समजावा आणि असाच गुरु शिष्याची नौका भवसागरातून पार करून त्याला योग्य मार्गी पोचवतो. पण शिष्याची काठी वा कुबड़ी न बनता त्याला विचारप्रव्रुत्त करतो. असा शिष्य जेंव्हा गुरुला लाभतो तेंव्हा गुरुला मातेसमान आनंद व समाधान प्राप्त होत. "
" स्वामी मी सर्व ज्ञान आपल्याकडूनच प्राप्त केले आहे आणि आपणच माझे स्वामी, गुरु सर्व काही आहात. एक प्रश्न आहे दयानिधान आज्ञा असावी."
"तुझ्या सारखा शिष्य लाभला की गुरुलासुद्धा ज्ञान अर्पण करण्यात एक विलक्षण आनंद मिळतो. जो मी आता अनुभवत आहे. विचार क़ाय विचारतोस ते."
उत्तम शिष्य कसा असावा याचहि मार्गदर्शन केलत तर कृपा होईल जगत्पिता."
"गुरुआज्ञा पालन हा शिष्याचा सर्वोत्तम गूण जाणावां. गुरु हा शिष्याला त्याच्या कुवतीनुसार आत्मोन्नत्तिच्या मार्गावर पुढे नेत असतो. पण उत्तम शिष्य हा आपल्या गुरुंच्या आज्ञेच बिनचुक आणि पूर्णपणे पालन करून गुरुला संतोष देतो. उत्तम शिष्य हा गुरुंच्या कथनाचा उचित अर्थ, यथार्थ जाणून त्यांची आज्ञा सार्थ करतो. गुरुला संतोष व समाधान मिळेल अश्याच सर्व गोष्टी व कर्मे यात तो नेहमी रत असतो. तसच त्यातच त्याची उन्नति आहे हेही तो जाणून असतो. "
"कृपानिधान तुम्ही उत्तम शिष्य लक्षण सांगून आपण खरच उपकृत केलत. आता माझा मूळ प्रश्न आहे त्यावर आपण मार्गदर्शन करावे आणि मला उपकृत करावे ही विनंती."
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment