ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ८०
"अर्थात त्याचीसुद्धा जन्मकथा मला सांगावी आपण"
प्रभुनी अगस्त्य ऋषिवराना प्रार्थना केली.
" ऐक तर राजन. सुमालीला एक कन्या होती. ती उपवर झाल्यावर यथावकाश एकदा पाताळलोकातून पृथ्वी लोकी विहार करताना, तिने ऋषी विश्रवा अर्थात वैश्रवण म्हणजेच कुबेराचे पिताश्री याना पाहिलं. त्यांच्यां तपतेजाने ती मोहित झाली आणि त्याना म्हणाली
" आपल्या तेजाने मला मोहित केलय. अतः मला आपल्याशी विवाह करण्याची मनीषा उत्पन्न झाली आहे. म्हणून मी आपल्याला आर्जव करते कि आपण माझा स्वीकार करून मला उपकृत करावं आणि आपल्या पुत्रांची माता होण्याच सद्भाग्य मला प्रदान करावं."
ऋषी विश्रवा यानी योगज्ञानाने तिच्याबद्दल सर्व व्रुत्तान्त जाणला आणि म्हणाले
" हे युवती तुला होणारी संतति ही जगताला तापदायक व संहारक असेल. तद्वत तू याचा आग्रह धरु नकोस."
" नाही मुनिवर आपल्या तपोबलाने झालेली संतति असेल ती. आपण माझी विनंती मान्य करावी. आणि निदान एकतरी कुलवान व धर्मात्मा संतति व्हावी जी कुलोद्धारक असेल.
यावर ऋषी विश्रवा यानी तिला सांगितल जशी तुझी मनीषा. तुला तीन राक्षस आणि एक थोर धर्मात्मा पुत्र माझ्या योगे प्राप्त होईल. "
आणि प्रथम दश आनन असलेला पुत्र जन्माला आला. ज्याच्यां दहा शिरा मुळे त्याला दशानन नाव ऋषिनी दिल. हा जन्मतः अक्राळ विक्राळ रूप असलेला व अत्यंत कुरूप असा होता. हा जन्मला तेंव्हा अनेक अशुभशकुन घड़ले, अनेक विपदा आल्या. विजांचा प्रचंड कडकडाट झाला, मेघ गर्जना करू लागले. जे महर्षिनी आधीच सांगितल होत.
त्यानंतर एक भयानक रूप असलेली पुत्रि जन्माला आली. तिची नख जन्मतःच सुपासारखी होती. °सुळे बाहेर आलेले अशी विचित्र राक्षसी जन्माला आली. तीच नाव ऋषी विश्रवा यानी शूर्पणखा ठेवल. ती जन्मतः भेसुर आवाजात रडत होती.
त्यांन्तर एक प्रचंड आकाराच्या आक्राळविक्राळ पुत्राला तीने जन्म दिला. ज्याच्या रडण्याच्या आवाजाने प्रत्यक्ष काळ सुद्धा थरारला. याच नाव कुंभकर्ण ठेवण्यात आल. यांच वैशिष्ट्य हे की याला जन्मतः प्रचंड भूक लागली. जी आयुष्यभर कधीही पूर्ण होत नसे.
यापश्चात सर्वात शेवटी एक छानसा रूपवान असा पुत्र जन्माला आला. याच्या जन्मानन्तर देवतानी स्वर्गातून पुष्पव्रुष्टि केली, गन्धर्वानी गायन आणि अप्सरानी आनंदे नृत्याविष्कार सादर केले. हाच तो महान धर्मात्मा विभीषण.
या राक्षस प्रजातिबद्दल एक गोष्ट आहे. हैती पुत्र विद्युत्केशी, अर्थात रावणाचे तात सुमाली याचे तात, याच्या जन्मानन्तर त्याची माता, म्हणजेच हैती पत्नी भया, हिने निर्जन बेटावर जाऊन पुत्र जन्मानन्तर त्याला तिथेच सोडुन परत हैती कड़े प्रयाण केले. त्यावेळी भुकेने व्याकूळ विद्युत्केशी आक्रन्दत असताना शिवपार्वती आकाशमार्गे जात होते. पार्वती मातेला त्या पुत्राची दया आली. तीने त्याची सर्व अवस्था पाहुन वरदान दिले होते की, या पुढे राक्षस कुळात जन्मलेल कोणतेही अपत्य हे जन्माला आल्याबरोबर मातेच्या वयाचे होईल.
म्हणून यांच् वरायोगे रावण, शूर्पणखा कुंभकर्ण विभीषण आदि चारही अपत्ये जन्म झाल्या झाल्या पूर्ण वाढलेली झाली.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment