Skip to main content

माझी बासरी प्रस्तावनेसह

राधाकृष्ण संवाद माध्यमातून सगुण, निर्गुण , साकार, निराकार या भावांचा भगवंतानी केलेला आणि मला उमगलेला उहापोह. मुळात भक्त भगवंत ह्या संकल्पना मानल्या तर भिन्न आहेत आणि सदस्वरूप पाहिलं तर एकच आहेत. म्हणूनच राधा आणि कृष्ण ही भक्त , भगवंत अशी बाह्य रुपात भिन्न दिसणारी जोडी, प्रत्यक्षात एकाच स्वरूपाची दोन प्रतिरूप आहेत. माया दुर झाली की ते एकरूप दिसतील. हेच भगवान श्रीकृष्ण राधेच्या माध्यमातून आपल्याला सांगत असावेत.

ही माझीच जुनी कविता आहे. खास दिवाळीनिमित्त वाचकांसाठी. ओवीबद्ध रचना आहे ही. अरे संसार संसारच्या पारंपारिक चालीत वाचा आनंद द्विगुणीत होईल. :

माझी बासरी

माझी बासरी निर्गुण
सांगे भाव मन जैसा
ज्याला जैसे भासे जग
बासरित येई तैसा

तूझ्या मनी प्रेम भाव
तूला माझे प्रेम ठाव
म्हणून तू बघतेस
जग  सारे माझे ठाव
माझी बासरी ........

तू ग राधा प्रेमवेडि
वाटे तूज माझे हित
म्हणूनी तू बाहि मज
सदा तूझे स्वरुपात
माझी बासरी .......

कान्हा मी रे वृंदावनी
पाहि तूज या नयनी
तेंव्हा सारे रे गोकुळ
पाहे तूज निजधामी
माझी बासरी ........

माझे रूप हे निर्गुण
पाहावे ते तैसे होय
जिथे भाव आपपर
तिथे दिसणे न होय
माझी बासरी ....

नाही ना रे भास् हाच
वाटे मना हां संदेह
तूझी रुपे रे अनेक
फेड शंका निःसंदेह
माझी बासरी .......

राधे माझ्या स्वरुपात
स्वर आणि रूप असे
सगूण निर्गुण दोन्ही
ज्याने पहावे ते तसे
माझी बासरी ......

कान्हा तू रे प्रेम रूप
भावे तूझे हे स्वरुप
राधे मी आहे हृदयी
भाव पाहि माझे रूप
माझी बासरी ....

कान्हा पटली रे खुण
तूचि गुण अन निर्गुण
जिथे जिथे तुझा भाव
तिथे होसी तू सगुण
माझी बासरी ....

तुझी बासरी निर्गुण
तुझे स्वरुप नीराकार
भजतो जो जैश्या भावे
दिसे तैसे हेचि सार
माझी बासरी .......

©  कवी: प्रसन्न आठवले
२८/०८/२०१६

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...