Skip to main content

नाम अवतार कलियुगी - १२

नाम अवतार कलियुगी - १२

जरी अनेक प्रकारात विभागली गेली असेल तरी माझ्या दृष्टीने भक्ति ही भक्ति आहे. आणि  कोणत्याही एका प्रकारात मांडता येणारी साधिसुधी गोष्ट म्हणजे भक्ति नव्हे. परम् आत्म्याचा आणि भौतिक शरीरात वास करणाऱ्या आत्म्याचा सुंदर संगम साधून देण्याचा प्रवास म्हणजे भक्ति. दोन विलग झालेल्या जीवाना एकत्र आणण्यासाठी भगवंतानी योजलेली एक कार्यप्रणाली म्हणजे भक्ति.

कर्म करणे आणि त्याच्या फलाची वाट बघणे आणि या चक्रात अडकणे अशीच गत माणूस धरुन सर्व प्राण्याची झाली आहे. या सर्वातून बाहेर पडाव अस ज्याला वाटल त्याने लढाई जिंकण्याची तयारी केली हे नककी. म्हणजेच यातून हेच सिद्ध होत की यातून बाहेर पड़ाव हा विचार म्हणजेच कर्म त्या त्या व्यक्तीला करण गरजेच आहे. म्हणजेच पुन्हा कर्म श्रेष्ठ.

इथे एक प्रश्न उभा राहतो की , अस वाटण हे देखील पुर्वकर्मावर अवलबुन आहे का. आणि जर तस असेल तर प्रत्येकाला ती वेळ येईपर्यन्त थांबणे गरजेच आहे का. मग तस असेल तर प्रत्येक प्राण्याची त्याच्या त्याच्या कर्माच्या क्रमानुसार या फेऱ्यातून सुटण्याची वेळ कधी असेल हे परमेश्वर जाणे. मग यावर काही उपाय नाही का की मानव कोणत्याही जन्मी इच्छा झाली की यातून सुटण्याचा प्रयत्न करू शकतो.

याच उत्तर हो असच देता येईल. निश्चय आणि इच्छा ही दोन शस्त्र असतील तर कोणतही काम कठीण नाही हे नककी. पण, हा पण महत्वाचा आहे. हे करण्याची बुद्धि, इच्छा, आणि निश्चय याचा मेळ कसा, कधी जमावा याचच गणित कस सुटाव.

पाहुया पुढील भागात .

आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...