Skip to main content

Posts

Showing posts from July, 2023

राम अनुज भरत भाग ५४

राम अनुज भरत भाग ५४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. प्रभूंच्या अनुमतीच्याच अतिरम्य कल्पनेत, भ्राता भरत हरवून गेलेला असताना, अचानक महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमा समीप आपण आलो आहोत, या जाणीवेने, भरताला भाना वर आणलं. भरताने आपला रथ, मुनिवर वसिष्ठ यांचा रथ महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमाकडे वळवून, बाकीचा सर्व जमाव, रथ, अश्व इत्यादी सर्व, तिथेच थांबण्याचे आदेश, भरताने दिला. त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना आर्य सुमंत यांनी आपल्या सचिवांमार्फत दिली आणि स्वतः आपला रथ आश्रमाच्या दिशेने नेला.  त्यांच्या मागोमाग, वसिष्ठ महर्षी विराजित असलेला रथ निघाला. थोड्याच अंतरावर महर्षींचा रमणीय आश्रम परिसर दृष्टी पथात आला. आश्रमाच्या थोड्या अंतरावर, रथ थांबले. भ्राताश्री प्रभू श्रीराम, यांच्या पादुका आपल्या मस्तकी धारण करून, अनवाणी पायाने, भरत उतरला. त्याच्या पाठोपाठ, शत्रुघ्न उतरला. वैशिष्ठ महर्षींनी पुढे होऊन, आश्रमात प्रवेश केला.  महर्षी भारद्वाज, आपला नित्याहार उरकून, आपल्या विद्यार्थ्यांना वेद मंत्रांचा नित्य...

राम अनुज भरत भाग ५३

राम अनुज भरत भाग ५३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. श्रीरामांचा भरतावरील स्नेह पाहून, न राहवून लक्ष्मण वदला,  "आपला भरतावर अधिक स्नेह आहे, हे मी जाणतो. पण आपल्यावरील स्नेहाखातर,भरत हे दुःखमय,कष्टमय जीवन व्यतीत करेल, हे आपण जाणून घ्यावं." लक्ष्मणाच्या बोलण्यातील भाव जाणून प्रभू म्हणाले,  "तसा माझा स्नेह सर्वांवर समान आहेच आणि लक्ष्मणा तू तर माझी छाया आहेस. आपल्या छायेची चिंता कोणी करत का, लक्ष्मणा. जसा मी आहे, त्याच भावात आणि स्थितीत तू असणार, याबद्दल मी निःशंक आहे. पण भरत आणि शत्रुघ्न हे दोघे कायम मला अतिप्रिय होते. नव्हे त्यांची मी नेहमी जास्त चिंता केली. त्यांना विशेष स्नेह दिला. कारण आपण सदैव सोबत असल्यामुळे, तुझी वेगळी चिंता मला करावी लागली नाही. किंबहुना तूच माझी अधिक चिंता करतोस, हे मी जाणून आहे" रामाच्या बोलण्याने थोडासा वरमुन लक्ष्मण म्हणाला, "ज्येष्ठ भ्राता, मला तसं म्हणायचं नाही. कारण आपले सर्व भाव जसेच्या तसे माझ्या मनात उमटतात, ज्येष्ठ भ्राताश्री. आपली चिंता ही माझी चिंता आहे....

राम अनुज भरत भाग ५२

राम अनुज भरत भाग ५२ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. आपल्या पर्णकुटीत प्रभू आले. बाहेरचे अयोध्या वासी जन, मंत्रीगण, अधिकारी सचिव, परिवार सर्व काही क्षणात नजरेसमोरून दूर झालं. इतका वेळ आपल्या निश्चयात धीरोदात्त असलेले प्रभू, शांत झाले. जानकी आणि लक्ष्मण सुद्धा अत्यंत भावूक झालेले. क्षणभरापूर्वी इथे अवघी अयोध्या लोटली होती. हजारांचा जनसमुदाय इथे. जमा झालेला. पुन्हा ते सारं विश्व, एखाद्या आभासाप्रमाणे अस्तित्वहीन झालं.   आता हे सारं विश्व पुन्हा चौदा वर्षे दिसणार नाही, हे तर नक्कीच होतं. प्रभूंची शांत पण, मनाच्या कोपऱ्यात विचार मग्न झालेली चर्या पाहून, राजराजेश्वरी, जनक दूलारी, सीता, प्रभूंच्या समीप येऊन,तिने त्यांच्या खांद्या वर हात ठेवला. दोंघानी एकमेकांच्या लोचनात पाहिलं.  भाव या ह्रदयीचे, त्या हृदयी पोचले होतेच. विचारात मग्न, प्रभू, आपल्या पर्णकुटीत, शोचनीय अवस्थेत बसलेले श्रीराम, यांच्या लोचनात, नकळत अश्रू तरळले. गाला वरून जमिनीवर ओघळू पाहणारे ते अश्रू,सीतेने आपल्या ओंजळीत घेऊन, आपल्या न...

राम अनुज भरत भाग ५१

राम अनुज भरत भाग ५१ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  भरताच्या खांद्याना धरून, प्रभू म्हणाले " हे ज्ञानी, गुणवंत भरत, मी चौदा वर्षांनी परत येईन, त्यावेळी ही राज्याची धुरा मी माझ्या हाती घेईन. तोपर्यंत तू या राज्याचा सांभाळ कर. आर्य सुमंत यांसह सर्व मंत्री, सचिव व अधिकारी, यांचं सहाय्य घे आणि मात्र प्रजाजन हित यास्तवच हे राज्य चालव."  यावर भरत म्हणाला "हे त्रिलोक पती, जगतपालक, आपणच माझे स्वामी आहात. मी सुद्धा आपल्या प्रमाणेच, जटा धारण करून व वल्कलं नेसून, अयोध्येबाहेर राहून, केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून, हे राज्य सुरळीत चालवून, चौदा वर्षानी हे राज्य,निष्कंटक आपल्या स्वाधीन करीन व आपल्या पावन चरणाची सेवा करण्यात धन्यता मानीन. हे प्रभू आपल्याला, या दासाला, एक वचन द्यावं लागेल, तरच हे चरण मी सोडीन. "  अजाणता भाव दर्शवून, जाणते प्रभू, प्रश्न कर्ते झाले की,  " कोणतं वचन प्राण प्रिय भरता"  " हे दयानिधी, चौदा वर्षे पूर्ण झाली की त्या दिवशी आपण कोणत्याही परिस्थितीत मला येऊन भेटाल. जर तसं...

राम अनुज भरत भाग ५०(श्रीराम पादुका प्राप्ती)

राम अनुज भरत भाग ५० (श्रीराम पादुका प्राप्ती) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  भरताने हताशपणे, श्रीरामांना पाहिलं. दिग्मुढ भरत, सद्गदित स्थितीत आपले सर्व अंग प्रभूंच्या पायाशी टाकून, त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून म्हणाला.  " हे त्रिलोकाधिपती, जगतोध्दारक, जनप्रिय श्रीराम, मी आपल्या चरणांशी आर्जवे मांडतो की, मी कोणत्याही स्थितीत हे राज्य स्वीकारणार नाही. कारण रघुकुलाची रीत आहे की, ज्येष्ठ पुत्रच राज्यपदी विराजमान होतो आणि सिंहासनी विराजित होतो. ज्याप्रमाणे वचनांच्या पुर्ततेची परंपरा आहे, त्याचप्रमाणे ही देखील एक जाज्वल्य, निष्ठावान परंपरा आहे, जी भंग करण्याचा अधिकार मलासुद्धा नाही आणि मी ते देह असेपर्यंत करणार नाही."  काळाला सुद्धा, दोन बंधूंच्या या वाग् कौशल्य आणि चातुर्याचे, हे स्नेह आणि कर्तव्य यांच्या शब्दांच्या संवादाचे कौतुक वाटतं होते. जमलेल्या सर्वांनाच, या तिढ्यापेक्षा या दृढ निश्चयी श्रीराम आणि बंधुप्रेमी भरत, यांचा हा संवाद असाच युगापर्यंत सुरू रहावा असेच वाटत होते. परंतु गुरुदे...

राम अनुज भरत भाग ४९

राम अनुज भरत भाग ४९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..   ती चटई राजकुमार भरत याने खाली जमिनीवर मांडली आणि खाली जमिनीवर मांडी घालून, त्यावर बैठक मारून बसला. त्याने तसे केलेले पाहून, प्रभू विस्मयित झाले. त्याच विस्मयकारक भावात प्रभू भरताला म्हणाले. ' हे अनुज भरत, हे काय आरंभले आहेस. मी माझ्या कर्तव्याच्या आणि आज्ञा पालनाच्या मार्गावर जात असताना, माझा मार्ग अडवण्यासाठी, काय हे धरणे धरून बसला आहेस. हा हट्ट सोड आणि पिताश्रीच्याच आज्ञेने पालन करून, धर्म निभावून ने. त्यातच सर्वांचे भले आहे." हे ऐकून भरत हताशपणे, जमलेले प्रजाजन यांच्याकडे पाहून म्हणाला " हे अयोध्या प्रजाजन हो, माझ्या या हट्टाला आपणही साथ देऊन, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना विनवून, पुन्हा माघारी येण्यासाठी आग्रह करावा."  भरताच्या या बोलांनी काही महाजन पुढे येऊन म्हणाले " रघुकुल भूषण कुमार भरत, आपला आग्रह रास्त आहे. पण तरीही पितृ आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिलेले श्रीराम, यांचे कथन योग्यच आहे. त्यांना पितृ आज्ञेचे पालन करणे क्रमप्राप्त आ...

राम अनुज भरत भाग ४८(श्रीरामांचा दृढ संकल्प आणि भरताचा दृढ निश्चय)

राम अनुज भरत भाग ४८ (श्रीरामांचा दृढ संकल्प आणि भरताचा दृढ निश्चय) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  वसिष्ठ ऋषींच्या या कथनावर अयोध्यावासी, आर्य सुमंत, आणि परिवारातील मंडळींना आशेचा किरण दिसायला लागला. आचार्य पुढे म्हणाले. " हे राघवेंद्र, प्रत्येकाला आयुष्यात तीन गुरू असतातच. माता, पिता आणि गुरू. पिता आपल्या पुत्राला देह प्रदान करतात या अर्थाने ते त्याचे प्रथम सद्गुरू आहेत. माता त्याला नऊ महिने गर्भात धारण करून, जन्म देते, त्यामुळे ती दुसरी गुरू ठरते. सद्गुरू पुत्राला, विद्या, ज्ञान प्रदान करून,जगण्याला दिशा व अर्थ प्रदान करून, पुरुषार्थ सिद्धीचा मार्ग आणि मोक्षाची सिद्धता प्रदान करतात.  हे रामचंद्रा, या सर्व गुरूंनी सिद्ध केलेला पुत्र सर्व कर्म व कर्तव्य करण्यास, पात्र ठरतो. त्यामुळे यातील कोणत्याही एकाचं कथन न ऐकणं, कोणताही वचनभंग ठरत नाही. कारण जर तो धर्म मार्गी असेल आणि आपल्या परंपरेचा पालनकर्ता असेल तर, नक्कीच त्याचा सर्वांना अभिमान वाटेल.  दुसरं म्हणजे अनुज भरत याचा आर्जव मान्य करून, ...

राम अनुज भरत भाग ४७(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद २)

राम अनुज भरत भाग ४७ (महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद २) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  महर्षी च्यवन त्यावेळी हिमालयात साधनेसाठी गेले होते. कालिंदिने तिथे जाऊन, महर्षि च्यवन याची भेट घेऊन, त्याना प्रणाम केला. महर्षी च्यवन यांनी तिला आशिर्वाद दिला की, तुला एक सत्य व धर्म परायण,पराक्रमी, बल शाली आणि तुझ्या कुल शील यांची कीर्ती वाढवणारा पुत्र होईल. कालिंदीने महर्षी च्यवन याना प्रदिक्षणा घातली आणि तिथून पुन्हा ती शैल पर्वतावरील आपल्या निवास स्थानी परत आली.  तिची सवत असलेली दुसरी राणी, ही कालिंदीचा मत्सर करणारी होती. म्हणून तिने, कालिंदीचा गर्भ नष्ट व्हावा यासाठी तिच्यावर विषप्रयोग केला. त्यासाठी तिने जो गर विष घालून कालिंदीला खायला घातला,तो गर तसाच तिच्या गर्भात गेला. कालांतराने, जन्मावेळी बालक आणि तो विषारी गर दोन्ही उदरातून बाहेर आले. ते बालक त्या गराला सोबत घेऊन जन्मले म्हणून, त्याचे नाव सगर ठेवले.हा सगर महापराक्रमी बलवान होता.यानेच आपल्या पुत्राच्या मदतीने समुद्र निर्मिती केली. म्हणूनच त्...

हे ईश्वर कौन हो तुम !!

हे ईश्वर कौन हो तुम !!  नीळकंठ महादेव तुमहि हो अष्टभुजा नारायणी तुम हो अनंत ब्रम्हांड धारक तुम हो अगणित तारेग्रह तेज तुमही हो न गिनती कितनी सांसो मे बसे प्राण का कण तुमही हो महाप्रवर्तक, महाशक्ती तुम पृथ्वी पर की प्रभा तुमही हो अवकाश गोल पाताल गहिरा नाद प्रकाश लहरी सब तुम हो न ऐसी वस्तू सजीव निर्जीव जहाँ न तुम हो, कहां न तुम हो अमृत तुम और विष तुमही हो सजा संवरा रूप भी तुम हो कुरूपता मे आलोकित तुम हो साक्षात विलोकित तेज तुमही हो मेरे मन को आकृष्ट करे जो ऐसां माया पती तो तुम हो माया से भी पार जो हो तुम मुठ्ठीमे भर आदिशक्ती तुम हो हो अलौकिक, हो प्रकाशित सबका अस्तित्व हो पंचमहाभूत  धरा अधरा आधार धरोहर हो भास आभास विभास भी तुम हो मन मेरा जब जो करे कल्पना  उसके भी तो पार तुमही हो त्रिखंड, त्रीलोक, त्रिदेव त्रिमिती इन के भी तो पार तुमही हो ध्वजा सनातन ध्वजा केसरी ध्वजा विराजे ध्वजा तेजमय सारी ध्वजायें धरे तुमही हो मंगल पावन भरत खंड का साक्षात्कारी विस्मय तुमही हो नतमस्तक हर आविष्कार पे नतमस्तक मै हर राग रंग पे  नतमस्तक निर्गुण स्वरूप पे नतमस्तक मैं श्रीरामनाम पे ऐसी देखी ज...

राम अनुज भरत भाग ४६(महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद १)

राम अनुज भरत भाग ४६ (महर्षी वसिष्ठ यांचा श्रीरामाशी संवाद १) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  महर्षी वसिष्ठ, आपल्या कथनात पुढे म्हणाले.  " हे रघुकुल शिरोमणी, परंपरा आणि कर्तव्य यामधे, जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचं, पालन सत्पुरुष करतात. तू स्वतः एक पुण्यात्मा आहेस आणि अनेक कारणांनी, अनेकांशी बद्ध आहेस. पण या बद्धतेत, सर्वात श्रेष्ठ बद्धता ही, जन साधारण यांच्याप्रती असलेली बद्धता आहे. कर्तव्य पालन करताना कोणतं कर्तव्य श्रेष्ठ, याचा निवाडा अनेकदा आपल्याला चुकीच्या पथाकडे घेऊन जातो. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती यामधे कधीही सावध असतात.  तू स्वतः जरी इथून परत जाऊन, राज्यपद स्वीकारलस तरीही ते कोणत्याही वचनांचा भंग ठरणार नाही. कारण तुझ्या सर्व कर्म व धर्म यामधे, एक राजवंशी म्हणून असलेलं कर्तव्य आणि धर्म हा श्रेष्ठ आहे आणि तोच पालनयोग्य आहे. धर्म आणि कर्तव्य यामधे राजाचा किंवा राज घराण्याचा धर्म आणि कर्तव्य दोन्हीही, प्रजेशी, राज्याशी, भुमीशी आणि आपल्या पदाशी असते. तू तेच निवड, जे प्रजा, राज्य, भू आणि पद चार...

राम अनुज भरत भाग ४५(श्रीरामांचं विप्र जाबाली याना उत्तर आणि महर्षी वसिष्ठ यांचं कथन)

राम अनुज भरत भाग ४५ (श्रीरामांचं विप्र जाबाली याना उत्तर आणि महर्षी वसिष्ठ यांचं कथन) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..   प्रभू स्वयं जाबाली यांच्या या अतर्क्य बोलण्याने चकित झाले आणि उत्तरादाखल जाबाली याना म्हणाले.  " हे विप्र वर जाबाली, आपण ज्ञानी असून, अशी नास्तिक भाषा बोलून, अतर्क्य युक्तिवाद करत आहात. ज्या गोष्टीं साठी वेद लिहिले गेले,ज्या जन्माच्या,नव्हे जन्म जन्माच्या गोष्टी, अनेक ऋषी मुनी यांनी आपल्या अनुभव व प्रचिती माध्यमातून, इतक्या कळकळीने मांडल्या आहेत. त्या सर्व मिथ्या आहेत, असे आपल कथन आहे, असं दिसतंय.  मुळातच उया गोष्टी काही ज्ञानी जनांनी आपल्या आंतरिक शक्तीच्या माध्यमाने, ब्रम्हांडात भ्रमण करून, पाहून, कथित केल्या आहेत आणि ज्या ज्ञान स्वरूपात आज अनेक गुरूंनी त्यांच्या शिष्य गणांनी जपून, प्रत्येक पुढच्या पिढीला सांगून त्या आपल्या ज्ञानाने, अनुभवाने, अनुभूतीने, प्रचिती परिपूर्ण आणि सिद्ध केल्या आहेत, त्या मिथ्या आहेत, असं आपल म्हणणं आहे का.  आणि हे अस तर्क ज्ञान आपण...

राम अनुज भरत भाग ४४(प्रभू भरत आणि प्रभू जाबाली संवाद)

राम अनुज भरत भाग ४४ (प्रभू भरत आणि प्रभू जाबाली संवाद) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  जमलेले सर्वजण, भरत आणि प्रभू यांच्या संवादाकडे, आशादायक दृष्टीने पहात होते. प्रभू पुढे म्हणाले "अविवेकी विचार माणसाला, अनेक कर्म व धर्म संकटात टाकतो. धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत, त्याचं महत्त्व तू जाणतोस. यामध्ये, जर दोन पुरुषार्थ एकमेकांना छेद देत आहेत असा प्रसंग निर्माण झाल्यास, त्यातील सर्वात श्रेष्ठ व अंतिम जे असेल, ते ग्राह्य मानून, त्यानुसार आपल्या कर्माची दिशा ठरवावी, असं धर्म, निती, शास्त्र आणि महाजन यांचं वचन आहे. आपल्या या समस्येत, राज्य कारभार करणे, पितृ आज्ञा प्रमाण मानणे या द्वैतातून काय मार्ग योग्य आहे, हे खरतर फार क्लिष्ट आहे, असं मला भासत नाही. याचं कारण म्हणजे, भावनिक दृष्टी, कर्तव्य दृष्टी, धर्म दृष्टी आणि माया दृष्टी अश्या चार दृष्टी सहसा मानवाला अनेक ठिकाणी निर्णय घेण्यासाठी दिलेल्या असतात. यातील भावनिक आणि माया दृष्टी या दोन दृष्टी जन्मतः आणि परि...

राम अनुज भरत भाग ४३(भरताला श्रीरामांचा बोध)

राम अनुज भरत भाग ४३ (भरताला श्रीरामांचा बोध) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..  प्रभू पुढे सांगत आहेत.  "हे कैकायात्मज, याच उत्तरदायित्वाचं बीज, आपल्या देहात, जन्मतः पेरल गेलं आहे. ही नैतिक अधिष्ठानप्राप्त परंपरा, जितकी शुद्ध आणि सात्विक आहे, तितकीच ती नाजूक आहे.म्हणजेच आपल्या छोट्याश्या चुकीने आपण या परंपरेला जपण्यास अपात्र होऊ.या परंपरेचे वारसदार असलेले,स्वर्गीय महाराज दशरथ,यांनी आपल्या वचनाच्या खातर, आपल्याला दोन आज्ञा दिल्या आहेत.  याच आज्ञेची बद्धता, आपल्याला पुढील चौदा वर्ष, आपल्या आज्ञेत बांधून ठेवणार आहे. लक्षात ठेव, हे काही सर्व सामान्य जीवांनी, जगताना दिलेलं वचन नाही. तर ते रघुकुल भूषण, प्रजाहित दक्ष, महाराज दशरथ यांच्या मुखातील अंतिम आदेश आहे. त्यांचा त्या नंतर अंत झाला कारण, त्यांनी परंपरा उल्लंघन करण्यापेक्षा, त्या देहातून प्राणत्याग करणं उचित समजलं.हे तू ध्यानात घेतलस म्हणजे तुला या वचनांच महत्व ध्यानात येईल. जो मार्ग आज तू उचित समजून, मला, पिताश्री यांची आज्ञा उल्लंघन करायला, ...

राम अनुज भरत भाग ४२(भरताचा आर्जव आणि प्रभूंचे उत्तर- २)

राम अनुज भरत भाग ४२ (भरताचा आर्जव आणि प्रभूंचे उत्तर- २) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. भरत पुढे सांगत आहे.  "धर्म निती व शास्त्र यातील, जी जाणं व जे ज्ञान मला परम गुरू महर्षी वसिष्ठ यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे, त्यानुसार, आपण, या क्षणी अयोध्येला पुन्हा परत येऊन, या सार्वभौम राज्याचा अधिकार, निदान कर्तव्य या नात्याने स्वीकारून, माझ्यासह समस्त अयोध्येचं हित पहावे. कारण पिताश्री पश्चात धर्म, निती, न्याय, तर्क, विवाद, अस्त्र, शस्त्र ,शास्त्र, गुणवत्ता, निपुणता, लौकिक, अधिकार, मर्यादा- पालन, नेतृत्व, सद्गुण, पराक्रम, सिद्धी, बुद्धी, आत्म संयम, मनोबल, दृढता, धारिष्ट व आत्मशुद्धी यामधे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आणि त्रिलोकात एकमेव व अद्वितीय आहात.  आपल्या वर्तनाने, नीतीचे पाठ, या जगतात दिले जातील. आपल्या श्रेष्ठत्वाचा दृष्टांत जनमानसात दिला जाईल. आपण, या आपल्या वनवासाच्या निश्चयाचा त्याग करून, या समस्त लोकांच्या कल्याणास्तव माझ्या या विनंतीचा स्वीकार करावा.यातच रघुवंशाचं हित,राजाची इतिकर्तव्य ता आणि आप...

राम अनुज भरत भाग ४१(भरताचा श्रीरामांना आर्जव -१)

राम अनुज भरत भाग ४१ (भरताचा श्रीरामांना आर्जव -१) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. त्या दिवशी सर्वांनी एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली. एकमेकांना सांत्वना दिली आणि स्वर्गीय महाराज दशरथ याना, त्यांच्या सात्विक पुण्यकर्मासाठी, देवदेवता कडून, उत्तम प्रकारची फलप्राप्ती होवो, यासाठी कामना करत, दिवस घालवला. प्रभूंप्रमाणेच सर्वांनी, वनातील, कंदमुळं, फळं, फुलांचा मधुरस, इत्यादींच्या सेवन, भक्षण व ग्रहणात संध्या समय व्यतीत केला.  रात्रीच्या समयी, पुत्र राम यांनी,आपल्या तीनही मातांच्या सेवेत रत राहून, त्या निद्राधीन झाल्यावर, मग आपल्या मऊ तृणांनी तयार केलेल्या, आपल्या बिछान्यावर अंग टेकले.पिताश्री महाराज दशरथ यांच्या आठवणीत, चारही बंधू शेजारी शेजारी पहुडले.अर्थातच प्रभूंच्या हृदयात प्रिय स्थान प्राप्त भरत,प्रभूंच्या शेजारी स्थिरावला. लक्ष्मणाने निश्चयरुपी, निग्रह, धारण केलेला असल्यामुळे, तो समस्त परिवार, जनसाधरण यांच्यावर देखरेख ठेवत, त्यांच्या सुरक्षेची चिंता करत करत, पूर्ण रात्र जागृत राहिला.  भल्या पहाटे...

राम अनुज भरत भाग ४०

राम अनुज भरत भाग ४० श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. दोन्ही माता सुमित्रा आणि कैकयी हा हृद्य सोहळा, कौतुके पहात होत्या. एकीकडे वेदोक्त मंत्रोच्चार आणि विधिवत पिंडदान सुरू आहे. लक्ष्मण प्रथम माता कौसल्या आणि नंतर माता सुमित्रा यांच्या पाया पडतो. थोडीशी सावरलेली माता कौसल्या, पिंडदानासाठी इंगुदी या फळाच्या गरापासून तयार केलेल्या पिंडाकडे पाहून, बाजूच्या मांडवीला म्हणाली. संपूर्ण जगताच सार्वभौम राज्य ज्यांनी उपभोगलं, स्वर्गातील देवांना सुद्धा ज्यांनी दानवांविरुद्धच्या अनेक युद्धांमधे सहाय्य केलं आहे, अश्या परमप्रतापी विरवान राजांचे राजा, स्वर्गस्थ महाराज यांना, इंगुदिच्या फळाच्या गरापासून तयार केलेल्या पिंडाने श्राद्ध व पिंडदान का केलं जावं, हे माझ्या मनाला पटत नाही."  यावर मांडवी म्हणाली की,  " थोड्या वेळापूर्वी मी, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना आर्यपुत्र भरत यांच्याशी वार्तालाप करताना ऐकल आहे. तेंव्हा ज्येष्ठ भ्राता म्हणाले की, आपण जो आहार विहार करतो, तेच अन्न देवता व पितर याना अर्पण करावं, हेच उचि...

राम अनुज भरत भाग ३९

राम अनुज भरत भाग ३९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. ईंगुदी पासून तयार केलेल्या पिंडाच्या, प्रभूंच्या कल्पनेला, गुरुदेवांनी दुजोरा देऊन, पिंडदानाच्या मंत्र उपचारास प्रारंभ केला. विधिवत पिंडदान आदी प्रेतकार्य व मर्त्यक कार्य संपन्न होत होते. स्वतः महर्षी वसिष्ठ याचं संचालन करत होते. याच दरम्यान, श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे आर्य सुमंत, तीनही राण्या, स्नुषा आणि समस्त राज परिवार, याना घेऊन आले. माता कौसल्या, तिथे आल्यापासून, तिच्या नजरेने, पुत्र राम याचा शोध सुरू केला होता. पती निधन आणि अत्यंत लाडका एकमेव पुत्र राम याच्या विरहात शोकमग्न माता कौसल्या, अन्न त्याग केल्यामुळे, गेल्या काही दिवसात कृश झाली होती. तिला मांडवी आणि सुमित्रा यांनी धरलं असल्यामुळे, माता संथ पावलांनी एक एक पाऊल टाकत मंद गतीने, मंदाकिनी घाटाकडे पोचली. अती कृश झाल्यामुळे मातेच्या दृष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे मातेने दुरून, घाटावर पिंडदान क्रिया चालली होती, तिथे पाहिलं. वनातील जीवनामुळे, मृत्तिकेने आणि उन्हाशी संबंध आल्याम...

राम अनुज भरत भाग ३८

राम अनुज भरत भाग ३८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. लक्ष्मण सुद्धा,एखादा वृक्ष उन्मळून पडावा त्या प्रमाणे, भ्राता श्रीराम यांच्या समीप खाली कोसळला. त्याला तसा पडलेला पाहून,भरत सुद्धा विव्हालावस्थेत,अतीव दुःखाने ग्रस्त होऊन, आपल्या बंधूंच्या शेजारी, पडला. त्या तीनही बंधूना असे, दुःखसागरात बुडून, रडताना पाहून, आजूबाजूचे मंत्री, सचिव व आर्य सुमंत यानाही अश्रू अनावर झाले. पण भानावर असलेल्या आर्य सुमंत यांनी,त्वरित शत्रुघ्नला घेऊन येण्याची आज्ञा केली. शत्रुघ्न त्वरेने त्या स्थळी पातला व तीनही भावांना, पिताश्रीच्या मृत्यू वार्तेच्या शोकात बुडालेले पाहून, तीनही भ्राताच्या शेजारी जाऊन शोकमग्न रडायला लागला. त्या दुःखद अवस्थेत सुद्धा, प्रभूंनी, सर्वात लहान अनुज, शत्रुघ्न याचा स्वर ओळखून, त्याला उठून दीर्घ आलिंगन दिले.  त्याला पाठीवर थोपटून, ज्येष्ठ भावाच्या स्नेहाने, सांत्वन करण्याच्या उद्देशाने त्याला आपल्या छातीशी धरले. मोठे विदारक दृश्य होते. स्वर्गातून, देव, कैलासावरून उमा व महेश्वर, ब्रम्हलोकातून ब्रम्हद...

राम अनुज भरत भाग ३७(शोकाकुल श्रीराम)

राम अनुज भरत भाग ३७ (शोकाकुल श्रीराम) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.  प्रभू अश्या रीतीने, भरताला,एक उत्तम व आदर्श राज्य कर्ता होण्याच्या दृष्टीने, बोधवचन करता करता, अचानक थांबले. इतका समय, भावविभोर अवस्था आणि तदनंतर, राज्याची नित्य कर्तव्य, यांचां बोध भरताला देताना, प्रभू, एक गोष्ट विसरून गेले, जी आता त्यांच्या ध्यानात आली. भरत हा राजवस्त्रां मधे आला नसून, तो वल्कलं आणि मृगचर्म परिधान करून, जटा बांधून, अनवाणी पायाने, आपल्याकडे आला आहे. इतक्या समयात, भावनेच्या भरात आणि भरताच्या भेटीच्या नादात, आपलं लक्ष गेलं नाही, याचं वाईट वाटून, प्रभू म्हणाले. " हे अनुज, इतक्या समयात आमच्या लक्षात आलं नाही. वास्तविक, तू आलास, तेंव्हाच ध्यानात यायला हवं होतं, पण आता आमच्या लक्षात आल की, तू राजा असून राजवस्त्रात का नाहीस आणि पिताश्री का आले नाहीत. कदाचित, मला या वनवासाची आज्ञा दिल्याचं ओझ मना वर असल्यामुळे, त्याना माझ्या समोर येण्यास संकोच वाटत असावा. पण त्यांनी अशी आज्ञा देऊन, रघुकुलाची उच्च परंपरा पालन केलं आहे. म्...

राम अनुज भरत भाग ३६(राजाची कर्तव्ये -२)

राम अनुज भरत भाग ३६ (राजाची कर्तव्ये -२) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. याचं कारण तुला सांगतो, म्हणजे ही संगती तुझ्या ध्यानात येईल. याचं कारण म्हणजे, तुझ्या अत्यंत निकट असणार, म्हणून ते सुरक्षा अंगरक्षक हे अत्यंत विश्वासू असावेत. जेणेकरून, त्यांच्यावर तू अवलंबून राहू शकशील. पण हे अवलंबित्व, अर्थातच पूर्ण काळजी घेऊन असावं. तू राजा म्हणून प्रजेशी तुझी असलेली बांधिलकी, कधीही विसरत नसशील ना. तू अष्टौप्रहर, फक्त प्रजेशी बांधील आहेस, हे तू नक्कीच, राजा म्हणून तुझ्या मनात ठसवून घेतलं असशील.  तू हे देखील नक्कीच जाणत असशील की, तू राजा म्हणून ईश्वराचा अंश आहेस. त्यामुळे नैतिकता हे तुझं अधिष्ठान असलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृत्याशी,वागण्याशी,व्यक्तींशी अथवा विचारांशी तुझा दुरान्वयानेही संबंध असता कामा नये.  तू राजा या अर्थाने, नित्य, न्यायाशी बांधलेला आहेस ना. कारण राजाकडून, प्रजा, मंत्री, सचिव, अधिकारी, सेवक हे सर्वच न्यायाची अपेक्षा करतात. याच सूत्राने तुझं, न्याय मंडळ मांडलं गेलं...

राम अनुज भरत भाग ३५( श्रीराम भरत भेट आणि राजाची कर्तव्ये -१)

राम अनुज भरत भाग ३५ ( श्रीराम भरत भेट आणि राजाची कर्तव्ये -१) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. त्याचे अश्रू पुन्हा पुन्हा पुसत प्रभूंनी त्याला आपल्या जवळ घेत, आलिंगन देत हृदयाशी धरले.दोन्ही हृदयातून स्नेहांकित भावाने,आपापल्या मनातील भाव, एकमेकांना मूकपणे कथन केला.आपल्या मनातील भावना मन मोकळेपणाने व्यक्त करून झाल्यावर,भरताने ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या लोचनात पाहून, अश्रू पूर्ण नयन आणि स्वरात म्हटले. " का आपल्या अनुजाला, एकटं सोडून, निघून गेलात. माझी आठवण सुद्धा नसेल का झाली आपल्याला. का असं केलत. "  प्रभूंनी, भरताचे दोन्ही स्कंद आपल्या हातांनी धरले आणि अत्यंत धीरगंभीर स्वरात म्हणाले "हे प्राणप्रिय अनुज,भरता, माझ्या या देहातील नसानसात ज्याप्रमाणे रुधिर वहात आहे त्याचप्राणे, भरत माझ्या देहात, मनात आणि प्राणात व्याप्त आहे.माऊली ज्या प्रमाणे, आपल्या पुत्राला कदापि विसरू शकत नाही. तद्वत, हा राम आपल्या भरताला कधीही क्षणमात्र सुद्धा विसरू शकत नाही. किंबहुना तुझ्या श्वासांचा स्वर आणि मनातील विचार लहरी हे,...

राम अनुज भरत भाग ३४(राम भरत अलौकिक हृद्य भेट)

राम अनुज भरत भाग ३४ (राम भरत अलौकिक हृद्य भेट) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.   इतका वेळ, धरून ठेवलेले अव्यक्त भाव, हळूहळू व्यक्त व्हायला सुरवात झाली आहे, हे तिघांच्याही लक्षात आलं. अर्थात हेदेखील समजलं की प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याचं स्थळ समीप आले आहे. महामंत्री आर्य सुमंत यांनी भरताला आपल्या दोन्ही हातांनी धरून सावरलं आणि त्याला तसेच धरून, तिघे, पुढील मार्गावर, पद चिन्हांच्या मागे निघाले. काही अंतर गेल्यावर, जवळून एक पर्णकुटी, दृश्यमान होण्यास सूरवात झाली.  भरत थोडा सावरला. गुरुदेवांनी त्याला, आपल्या कमंडलु तील जलतीर्थ प्राशनार्थ दिलं. पुन्हा चारही जण, त्या पर्णकुटी च्या दिशेने काही पावलं जातात न जातात तोच, समोर साक्षात जगताधिपती, गंभीर मूर्ती, जगताचं सर्व तेज धारण केलेले, श्रीराम, महालक्ष्मी स्वरूप देवी सीता आणि त्यांच्या मागे, धनुष्यबाण सज्ज अवस्थेत, अग्निस्वरूप, शेषावतारी लक्ष्मण उभे होते.  श्रीराम आणि अनुज भरत यांची नजरानजर झाली आणि भरत अतीव दुःखातिरेकाच्या, आतापर्यंत दाबून ठेव...

राम अनुज भरत भाग ३३

राम अनुज भरत भाग ३३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.   त्या वृक्षाव्या बुंध्यावर असलेल्या एका श्लोकाकडे अंगुली निर्देश करून भरत, आर्य सुमंत आणि कुलगुरू महर्षी वसिष्ठ, याना म्हणाला.  " महर्षी, हा श्लोक आपल्याला, विनासायास श्री रघुपती यांच्याकडे घेऊन जाईल.आपण याचं मार्गाने पुढे जाऊया. कदाचित याच मार्गाने, पुढील खुणा आपल्याला सापडत जातील."  अर्थातच, बाकीच्या तिघांनीही, भरताच्या त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि भरतासह इतर, त्याचं मार्गाने पुढे निघाले.थोड्या अंतरावर,पुढील एका वृक्षावर, श्लोकाच्या ओळी दिसल्यावर आणि त्यांचा गुह्यार्थ जाणल्यावर, भ्राता भरत, सुहास्य वादनाने,अतिवेगाने, पुढील मार्गाकडे निघाला. बाकीचे तिघेही, त्याचं गतीने मागोमाग निघाले. अर्थात इकडे श्रीराम, देवी सीता आणि लक्षण प्रतीक्षेत उभे होते. भरत, त्या श्लोकांच्या चिन्हांचा माग काढत काढत अतिवेगाने पुढे जात होते.  अचानक एका वृक्षाच्या श्लोकावर नजर जाऊन, भरत थबकला आणि म्हणाला,  " मुनिवर, ब्रह्मस्वरूप महर्षी वसिष्ठ, आता इथे ...

राम अनुज भरत भाग ३२

राम अनुज भरत भाग ३२ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.   लक्ष्मण पुढे म्हणाला  "पण एकूण समूदाय फक्त सेनेचाच असावा असे भासत नाही. म्हणजे प्रजाजन सुद्धा त्याच्या सोबत असल्या सारखे, एकूण जनसमुदाय संख्येवरून भासित होत आहे. ज्येष्ठ भ्राता,परंतु यामधे, महाराज दशरथ यांचा रथ कुठेही असल्याचे दिसत नाही. किंबहुना त्यांची राजचिन्हेसुद्धा कुठेही दिसत नाहीत." यावर प्रभू म्हणाले "हे लक्ष्मणा, त्यांनीच भरताला,राजसिंहासनावर बसवल्या नंतर, आपल्या भेटीस आणि माझा आशिष घेण्यास धाडले असणार."  वृक्षावरून अवलोकन करत असलेला लक्ष्मण, चपळाई करुन, खाली उतरून आला. भ्राता श्रीराम यांनी प्रश्नार्थक नजरेने लक्ष्मणा कडे पाहिलं. ते जाणून, लक्ष्मण म्हणाला "हे रघुकुल भूषण,भरताची स्वारी,स्वल्प समयात, आपल्या समीप येईल. " प्रभू म्हणाले. " हे सौमित्र, माझ्या भरताला मी राज पुरुष वेषात पाहू इच्छितो आहे. तू देखील त्याचे स्वागत करायला हर्शाने सिद्ध हो. आपण सर्वच त्याचे क्षेम आणि पिताश्री बद्दल जाणण्यास उत्सुक आहोत. " इकड...

राम अनुज भरत भाग ३१(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -२)

राम अनुज भरत भाग ३१ (श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -२) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. मनाच्या स्थिरता, एकाग्रता या गुणांवर, मनुष्याचे धैर्य, जिद्द व अनुशासन अवलंबून आहे. लक्ष्मणा तू हे जाणतो सच की,जीवनात अनुशासन किती महत्वाचं आहे. त्यामुळे स्थिर व एकाग्र मन, अनेक गुण प्राप्त करून देते. हे गुण, कोणत्याही साधनेत अत्यंत उपयुक्त असतात. ज्या मनात धैर्य व जिद्द असते, त्या मनाच्या धन्याला, जीवनात काहीही अशक्य नसतं. हे धैर्य तेंव्हाच प्राप्त होतं, जेंव्हा माणसाची स्वत:वर श्रद्धा व माणसाचा स्वत:वर विश्वास असतो. श्रद्धा ही मूलतः मनाच्या कणखरतेचा सबळ पुरावा आहे. कणखर मन तेच असतं, जे आपल्या स्वत्वावर, विश्वास ठेवून असतं.मनाच्या या अजब आणि अनियंत्रित पसाऱ्यात, वरील विवेचनात सांगितलेल्या पायऱ्यांचा अभ्यास नीट केल्यास, या जगातीलच नव्हे तर, या ब्रम्हांडातील आणि त्याबाहेरील, अनेक पायऱ्या मनुष्य, या एकाच जन्मात प्राप्त करु शकतो.  मनाच्या, आत्म्याच्या उन्नतीच्या ज्या पायऱ्या मानव आपल्या, त्या त्या क्षे...

राम अनुज भरत भाग ३०(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -१)

राम अनुज भरत भाग ३० (श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -१) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. प्रभूंनी आपल्या प्रेमळ, स्निग्ध हस्त स्पर्शाने, त्याचे मन स्नेहाने व करुणेने भारून टाकले. तद्नंतर ते वदले. " हे लक्ष्मण, सर्वात प्रथम भरत हा तुझा ज्येष्ठ भ्राता आहे. त्याबद्दल असा अनुचित विचार करणे, तुला शोभायमान नाही. दुसरं, त्याच्या देहात, रघुकुलाचं दिव्य रुधिर, नसा नसात खेळत आहे. त्यामुळे, असला अनुचित विचार तो करणं अशक्य आहे. कृती तर तो स्वप्नात सुद्धा करणार नाही. मी जसा पितृ आज्ञेने बद्ध होऊन, इथे वनात आहे. तसाच माझा अनुज भरत सुद्धा मातृ आज्ञेने बद्ध होऊन, राज्यपदी विराजित झाला असणार. तोसुद्धा रघुकुल दीपक आहे.  तिसरं म्हणजे, तो, राज्यपद प्राप्ती पश्चात, ज्येष्ठ भ्राता या नात्याने, स्नेहयुक्त अंतःकरणाने, माझा आशीर्वाद घेण्या साठी येत असणार. सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं तत्व ध्यानात घे. ज्यावेळी तुम्हाला तुमच्या सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा आणि शाश्वती असते, त्यावेळी अवचित क्रोध, अति उत्साह किंवा...

राम अनुज भरत भाग २९

राम अनुज भरत भाग २९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. अचानक लक्षणं, सवेगे, प्रभूंच्या दिशेने दौडत आला. आणि समीप येऊन उत्साहित होऊन म्हणाला " हे जगताधीपती भ्राताश्री मला दुरून, ससैन्य कोणीतरी येत आहे, असे दिसत आहे. मी या उंच वृक्षावर जाऊन, अवलोकन करून आपल्याला सर्व वृत्तांत कथन करतो. आपण सावध राहावे. देवी सीते, आपण भ्राता समीप राहून, माझ्या संदेशाची प्रतीक्षा करावी. " इतकं बोलून, लक्ष्मण अतिजलद गतीने व स्फूर्तीने जवळच्या उंच वृक्षावर एखाद्या वन्य मूलनिवासी जना प्रमाणे चढून गेला आणि तिथे एका जाड वृक्ष शाखेवर बसून, दुरून दिसणारे दृश्य पाहून म्हणाला. " भ्राता श्री, दुरून, एक चतुरंग सेना, संपूर्ण दळभार घेऊन, रथ, गजदल, अश्वदळ व पददल घेऊन येताना दिसत आहे."  प्रभू म्हणातात  " हे लक्ष्मण, त्यांच्या ध्वजाकडे पाहून, तुला समजू शकेल की, हे कोणत्या राज्याचे सैन्य आहे."  एकाग्र अवलोकन करून, लक्ष्मण जवळजवळ ओरडुन म्हणाला. " हे प्रभू, ही चतुरंग सेना, अयोध्येची आहे. कारण त्यांच्या कडे पितरंगी, सूर्यन...

राम अनुज भरत भाग २८

राम अनुज भरत भाग २८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. लक्ष्मण क्षणाचाही विलंब न करता, नम्रपणे म्हणाला.  "आपण मला या वनवासात तातांच्या जागी आहात. त्यामुळे आपली आज्ञा, ती माझी कर्मगती आहे. याहून दुसरं माझ्याबाबत मला आणि माझ्या नियतीला माहीत नाही."  श्रीराम म्हणाले " म्हणजे तुमच्या दोघांचंही मत विपरीत नाही, हा सुवर्ण संयोग आहे. आपण आता याचं परिसरात वास्तव्य करून राहूया."  जवळपासचे काही प्रदेश पाहून झाल्यावर व निसर्गाच्या समृद्धीचा आनंद घेतल्यावर. दोन्ही बंधू आणि देवी सीता आपल्या पर्णकुटी कडे परत आले. इकडे भरत आणि त्यासोबत असलेला जनसमुदाय, सैन्य, राजपरीवार यांची पुढे मार्गक्रमणा सुरूच होती. संपूर्ण वनप्रदेश, जो घनदाट वृक्ष राजीनी व्याप्त होता, तो हळूहळू क्रमणा करत, करतं आपल्या लक्षाकडे निघाला होता. मार्ग ज्या प्रमाणे महर्षी भारद्वाज यांनी सांगितला होता, त्याप्रमाणे क्रमला जात होता. मार्गक्रमण सुरू असतानाच, भरत, आर्य सुमंत याना विचारून, आपण योग्य मार्गाने जात आहोत याची खात्री करून घेत होता. वाटचा...