दुसऱ्या ओळीचा अर्थ आज पाहूया.
श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२
अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् ।
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्व दुःखातिगो भवेत् ॥ १२ ॥
लोकाध्यक्ष म्हणजे समस्त लोकांचा अर्थात ब्रह्मांडातील सर्व सात लोक आणि त्या सात लोकांमधील सर्व जिवा त्मक जीवित व चैतन्यमय अर्थात देहधारी आणि देहरहित अश्या सर्व लोकांचा अधीक्षक अर्थात प्रमुख पुरुष असलेल्या श्रीविष्णूंचं स्तवन, अर्थात पूजा अर्चना बाह्यांगी आणि अंतरंगी नित्य स्मरण ध्यान जप केल्याने प्राणी सर्व प्रकारच्या दुःखातून पार होतो. सर्व दुःख म्हणजे देहिक, दैविक आणि अध्यात्मिक अश्या तीनही प्रकारच्या दुःखातून जीव मुक्ती मिळवतो.
इथे मुक्ती या शब्दाचे दोन।अर्थ अभिप्रेत आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष दुःखमुक्ती म्हणजे व्याधी, ताप रहित होणं. व्याधी अर्थात शारीरिक आणि ताप अर्थात बौद्धिक मानसिक व आत्मिक. दुसऱ्या अर्थाने मनुष्य येणाऱ्या सर्व दुःख ताप यांच्या परिणामातून भयमुक्त होतो आणि फक्त श्रीविष्णुपूजन भजन यातच पूर्णतः रममाण होऊन, देहाच्या, मनाच्या बुद्धीच्या आणि आत्मिक तापांना विसरून जातो, त्यांचा दाह देह व मन यांना जाणवतच नाही, म्हणजे मुक्तवस्थाच आहे ही.
©® प्रसन्न आठवले
०९/०४/२०२२
Comments
Post a Comment