Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०५

भोग आणि ईश्वर  ५०५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

माया म्हणजे या जगतात जीवाला बांधून ठेवणारी, सर्व खेळ करवून घेणारी आणि तरीही कधीही  मानवाच्या आवाक्यात नसणारी अशी अद्भुत शक्ती आहे. जिच्या निर्मितीचं कारण स्वतः प्रभू आहेत, म्हणजे त्यामागे त्यांचा काहीतरी साकार7 उद्देश असणार. म्हणूनच त्यांना मायापतीसुद्धा म्हटलं जातं. अशी ही माया कालच्या इंटरनेट, त्यावरील समाजमाध्यमं, इंटरनेटवरील वेगवेगळे खेळ, या सर्व जंजाळात तुम्हाला गुंतवून, आपण नफा कमावणार्या कंपन्यांच्या तटस्थतेप्रमाणे असते. 

माया कधीही कुठे गुंतत नाही.  पण जीवाला बद्ध करणारी व्यवस्था आहे. माणसाला एखाद्या खेळात गुंतवून, त्यातून, त्या जीवाला जन्ममरण फेऱ्यात फिरत ठेवणं, हे मायेचं कार्य. पण ते सर्वार्थाने, जीवाच्या विरुद्ध किंवा जडजीवाला बद्ध करणारं असतं असं नाही. म्हणजे जीवनाला मानवाला कार्यरत वा कर्मरत ठेवण्याचं काम सुद्धा माया करते. 

मायेला पूर्ण चांगलं किंवा वाईट असं प्रमाण देता येणार नाही. म्हणजे सद्यस्थितीत समाजमाध्यमं व इंटरनेट सारखं, त्या मायेचं स्वरूप आहे. जरा खोलात जाऊन विचार केला तर, विकासाच्या दृष्टीने इंटरनेट किंवा तत्सम गोष्टी या तितक्याच जरूरीच्या आहेत,हे जाणवेल. पण त्याचवेळी, त्यातून येणारी प्रलोभनांना टाळता येणार नाही. पण बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी, या सुविधांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करूनसुद्धा, त्यातील प्रलोभनांच्या जाळ्यात मात्र अडकणार नाही. 

अगदी याच तर्काने, जगताला व्यापून उरलेली माया, माणसाला कार्यप्रेरीत ठेवते. या मायेच्या गुणांचा वापर करून, आपली उन्नती, प्रगती साधून जीवनात व आध्यात्मिक मार्गात पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. इथे एका गोष्टीचा उल्लेख करायलाच पाहिजे. माया ही स्वतः स्वयंचलित व स्वयंप्रेरीत आहे. त्यामुळे आपण इच्छा करू त्याप्रमाणेच माया सहाय्यभूत होईलच असं नाही. 

म्हणजे माया जशी कर्मरत ठेवते, कार्य करायला चेतना व ऊर्जा देते, त्याचप्रमाणे ती मनाला उद्युक्त व उद्दीपित सुद्धा करते. म्हणजे कार्याला प्रवृत्त आणि कार्य करायला परावृत्तसुद्धा करू शकते. दोन टोकावर कार्य करणारी आणि कार्य करण्याबरोबरच कार्यातून परावृत्त करणारी माया, विश्वाच्या रचनेतील खूप महत्वाचा घटक आहे. माया जग घडवणं व बिघडवणं दोन्ही करू शकते. ती मनाच्या माध्यमातून कार्य करत असल्यामुळे, मनाला जाणीव व ज्ञान असणं गरजेचं आहे. 

ज्ञान मायेच्या व्याप्तीचं,कार्याचं,सकारात्मक, नकारात्मक बाजूंचं, मायेच्या सदूपयोगाचं आणि जाणीव मायेच्या पाशात न गुंतता, त्या मायेचा वापर, आत्मोद्धार व आत्मोन्नतीसाठी कसा करावा. या जाणीवा व ज्ञान या माध्यमातून माया परब्रम्ह ईश्वराची जगताला देणगी आहे, ती कशी, हे उद्याच्या भागात पाहूया, पण नाम घेत घेत. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...