Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९१

भोग आणि ईश्वर  ४९१  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

शरणागती किंवा शरण जाणं, यावर आपण चिंतन करत आहोत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की हे भगवंताचं ब्रीद आहे की,शरण आलेल्याला,ते कायम तारतात. म्हणजे शरण आलेला जीव हा दयेस पात्र असतो. अर्थातच ईश्वराची दया म्हणजे अलौकिकच असणार. शरण जाण्याची काही परिमाणं आहेत का किंवा काही व्याख्या करता येईल का. तर नक्कीच करता येईल. 

सर्वात प्रथम म्हणजे शरणागती ही बिनशर्त असते, म्हणजेच unconditional असते किंवा असलीच पाहिजे. कारण काही अटीशर्ती घालून केली जाते ती शरणागती नसते तर, निव्वळ व्यवहार असतो. अर्थातच ईश्वर सर्व व्यावहारिक व सांसारिक गोष्टींच्या पलीकडे असलेली, या जगताला नियंत्रित करणारी शक्ती आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अटी ठेवून, शरण जाऊ शकत नाही. 

बर अटी नाहीत, पण निदान काही अपेक्षा मागणी वा निदान इच्छा तरी असावी का. तर अजिबात नाही. कोणत्याही इच्छेला वा मागणीला शरणागतीत स्थान नाही. काही विशिष्ट हेतू मनात धरून, आपण ईश्वर चरणी शरण जाऊ शकतो का. तर नाही. कारण मागणी व पुरवठा आणि हेतू व साध्य होणं यादेखील व्यावहारिक बाजू आहेत. 

याची कारणं अनेक आहेत. सर्वात प्रथम म्हणजे, कर्म फलाच्या सिद्धांतानुसार काया वाचा व मन या तिन्हीद्वारे जे कर्म घडेल, त्याने बद्धता येते. शरणागती ही निर्गुण, निराकार ईश्वराला स्वतःतील स्व अहं यांची तिलांजली देऊनच साध्य करता येते. किंबहुना आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत संपूर्ण शरणागती अशक्य आहे., 

कारण शरण जाणं म्हणजे एखादया आराध्याच्या पायाशी सर्व जन्माचं, कर्मफल अर्पण करणं. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने कर्म करत असतानाच, त्याच्या फलाची अपेक्षा न धरणं. आपण गणितात, उत्तर माहीत नसताना, क्ष धरून पुढे जातो.  शरणागतीच्या बाबतीत, उत्तर शून्य धरूनच सर्व गणित सोडवायचं असतं. म्हणजे शून्य उत्तर गृहीत धरून, ते शून्य उत्तर प्राप्त करण्यासाठी,कर्मफल, अपेक्षा  इच्छा, आकांक्षा, भावभावना, म्हणजेच जिथे जिथे मनाची गुंतवणूक होऊ शकेल वा होण्याची शक्यता आहे, ते सर्व सोडून देणं. 

मनाची गुंतवणूक म्हणजे नक्की काय काय अपेक्षित आहे, यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत नामाचं निजकर्तव्य करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...