Skip to main content

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२-१

श्रीविष्णुसहस्रनाम श्लोक १२ - पहिली ओळ 

अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् ।
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्व दुःखातिगो भवेत् ॥ १२ ॥ 

पहिल्या ओळीचा अर्थ जाणून घेऊया. 

अनादी म्हणजे ज्याला आदी आणि अंत नाही असा. म्हणजेच जो सृष्टीच्या उत्पत्ती आधी अस्तित्वात होता आणि सृष्टीच्या लया नंतरसुद्धा ज्याचं अस्तित्व असणार आहे असा. 

अनादी याचा अजून एक अर्थ म्हणजे ज्याच्यापासून अनाहत नाद उत्पन्न होतो किंवा कुंडलिनी तील चवथ्या चक्रात अर्थात अनाहत चक्रात  कायम विराजित असलेला आणि देहापश्चात तेथून गमन करणारा, पण नष्ट न होणारा. 

अनादिनिधनं याचा एक अर्थ म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थात जन्माला येणं, वाढ होणं, परिवर्तन होणं, क्षय होणं, वृद्धावस्था येणं आणि नष्ट होणं अर्थात मृत्यू होणं, या सहा विकारांच्या जो पलीकडे आहे असा. 

विष्णू म्हणजे सर्व व्यापणारा आणि सर्व व्यापून पुनः उरलेला अर्थात सर्वत्र भरून राहिलेला असा सर्वव्यापक, सर्वव्यापी. विश्व व्यापी असा जो अणू तो विष्णू. 

सर्वलोकं महेश्वरम म्हणजे सर्व लोकांचा महान ईश्वर अर्थात सर्वस्व असलेला. ईश्वर म्हणजे त्राता किंवा तारक सुद्धा. आता यात म्हटलेले लोक म्हणजे जन नसून, या ब्रह्मांडात अस्तित्वात असलेले लोक. भु: भूव: स्व: जन: मह: तप: आणि सत्य असे जे सात लोक अस्तित्वात आहेत त्यांचा स्वामी अर्थात ईश्वर. महेश्वरम यातून अजून एक अर्थ अभिप्रेत होतो तो म्हणजे सर्व ईश्वरांमध्ये महान ईश्वर अर्थात सर्व देवांचा ईश्वर म्हणजे ब्रम्हादी देवांचा जो ईश आहे तो. 

दुसऱ्या ओळीचा अर्थ उद्या पाहूया.

©® प्रसन्न आठवले 
०८/०४/२०२२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...