Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०६

भोग आणि ईश्वर  ५०६  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

मायेबद्दल आपण बरंच चिंतन केलं, आज, मायेची अपरिहार्यता का यावर चिंतन करूया. मायेच्या प्रभावात जगाचे सर्व व्यवहार अव्याहतपणे सुरू आहेत. किंबहुना माया नसेल तर हे जगत कसं असेल आणि कसं चालेल याची कल्पना करता येणार नाही, इतकी माया चहुबाजूंनी विश्वाला व्यापून आहे. भगवंता नंतर विश्व व्यापून उरलेली दुसरी गोष्ट म्हणजे माया.माया म्हणजे विश्वरूप चैतन्याचा तो आविष्कार, ज्यामुळे विश्वाला गती, चालना आणि चैतन्य प्राप्त होतं. 

विश्वातील प्रत्येक वस्तूला प्रेरणा देऊन कर्म करण्याची बुद्धी, इच्छा निर्माण करते. म्हणजे विश्वाचा कार्यकारण भाव माया आहे. मय शव्दाचा अर्थ व्याप्त व्यापणे. जसं ब्रह्ममय,ज्ञानमय, विज्ञानमय. म्हणजेच माया ही जगताला व्याप्त करणारी ती शक्ती आहे, जिच्यामुळे या विश्वाचा खेळ, भगवंत खेळत आहेत. म्हणून जिथे भगवंत तिथे माया आहे. याचाच दुसरा अर्थ होतो की, जिथे माया आहे, तिथे तिच्या जवळ भगवंत असतात किंवा असणारच.  

म्हणजेच यातून ध्वनित होणारा अजून एक गहन अर्थ हा आहे की, माया ही बुद्धी व मन यांसह सर्व चराचर व्यापून आहे. किंबहुना भगवंताच्या प्राप्तीतील मोठी मेख म्हणजे माया आहे. कारण जिथे आकर्षण, आसक्ती आहे तिथे माया आहे. जगतातील वस्तूंची, जगतातील मोहाची, जगताच्या प्राप्तीची, जगताची आसक्ती आहे तिथे माया आहे, हे नक्की. म्हणजे माया चांगली की वाईट हे ज्याचं त्याला ठरवता येईल. 

आता मायेचा खेळ कसा ओळखावा आणि त्यातून न अडकता कसं बाहेर  पडावं, याचा विचार करूया. सध्याच्या जगताच्या पसाऱ्यात, इंटरनेट ही नित्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे काही कामं नव्हे तर सर्वच कामं करायला इंटरनेट लागतं. ही झाली माया. पण त्याचा उपयोग फक्त गरजेनुसार, गरजे प्रमाणे आणि गरजेपुरता करणं हा झाला विवेक आणि सुज्ञपणा. म्हणजेच आपल्याला हवा आहे त्यानुसार व तितकाच वेळ त्याचा वापर करून, बाकीचा वेळ आपल्या इतर कामांना देणं हे विवेकी लक्षण आहे आणि मायेचा स्वकार्यार्थ सदुपयोग. 

पण आपलं कामकाज विसरून, त्यावर अनिर्बंध व अमर्याद विसंबून, कामाव्यतिरिक्त त्यामध्ये वेळ वाया घालवणं, हे झालं मायेच्या पाशात अडकणं आणि दुरुपयोग. माया आणि मोह यांच्या पाशात न अडकता, फक्त मायेचा वापर करून, जीवनात पुढे जाण्यासाठी, विवेक आणि वैराग्य या दोन सद्गुणांची आवश्यकता आहे. विबेकाचा पाया सद्विचार, सदवर्तन आणि सन्मार्ग हा आहेत. 

वैराग्याची वृत्ती ही तप साधना आणि निग्रह या आधारा वर साध्य कर्या येते. पण वैराग्य म्हणजे नक्की काय, हे विस्ताराने उद्या जाणून घेऊया. नामाचा आधार हाती धरून पुढे जात राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...