Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९५

भोग आणि ईश्वर  ४९५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

ईश्वर हा वास्तविक अर्थाने आणि जगताचा, ब्रह्मांडाचा निर्माता अर्थात जन्मदाता या अर्थानेसुद्धा, मायमाऊली आहे.  ईश्वराच्या हृदयात, जगासाठी ब्रह्मांडातील चराचरा साठी निर्मळ आणि शुद्ध प्रेम आहे आणि असतं. प्रत्येक चल जीव व अचल वस्तू यांना भगवंत एक पुत्र म्हणूनच पाहतो आणि वागवतो. कर्माचा लेखाजोखा जो आपणच लिहितो, तो कर्मातील दोषांमुळे चुकीचा किंवा अनिष्ट घडतो आहे, हे पाहून, सर्वात जास्त वाईट, मायमाऊली या नात्याने, ईश्वराला वाटतं. 

ईश्वराचं हे अलौकिक आणि नित्य प्रेम प्रत्येक प्राणी मात्राला प्राप्त व्हावं अशी ईश्वराची स्वतःचीसुद्धा इच्छा असते. परंतु आसमंतात विहरणाऱ्या या ईश्वरी प्रेमाच्या लहरी, प्राप्त करून, त्याच्या कृपेची पात्रता प्राप्त करणं हे फक्त जीवाच्या हातात आहे. त्याचसाठी नित्य त्या ईश्वरी शक्तीचं स्मरण आणि।त्या शक्तीला शरण जाण्यासोबतच त्या शक्तीवर, त्याच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या निरंतर कृपा लहरीवर पूर्ण श्रद्धा असणं, हा तिसरा गुण, अंगी असावा लागतो. 

श्रद्धा म्हणजे मुळात एखाद्या गोष्ट, व्यक्ती, प्रतिमा, मूर्ती वा प्राप्त करण्याचं लक्ष्य यावर असलेला दृढ विश्वास. त्या जगतपित्याच्या अस्तित्वासह त्याच्या आपल्या वरील प्रेमावर पूर्ण आणि ठाम विश्वास. हा विश्वास, त्या वैश्विक शक्तीप्रमाणेच अचल आणि दृढ असला पाहिजे. एखादा भ्रमणध्वनी यंत्रणेला जोडलेला राहण्या साठी, त्या भ्रमण ध्वनी मध्ये त्या प्रकारची यंत्रणा सक्षम असली पाहिजे,  सिम कार्ड  असलं पाहिजे आणि नेटवर्कसाठी डेटा पॅक कार्यरत असला पाहिजे. 

त्याचप्रमाणे या देहात विश्वरूपचैतन्यातून येणाऱ्या, कृपारूप लहरी प्राप्तीसाठी मनाची निर्मलता अर्थात चित्ताची शुद्धता आकांक्षा आणि अपार विश्वास या त्रयीची आवश्यकता आहे. एक उदाहरण घेऊया म्हणजे विश्वास आणि दृढ श्रद्धा यांचा अर्थ स्पष्ट होईल. सीता मातेच्या शोधार्थ हनुमंत लंकेत जाऊन पोचला. महत् प्रयासाने मातेची भेट आणि ओळख झाली. त्यावेळी मातेच्या मनःस्थितीकडे पाहताना हनुमंताला जाणवलं की माता शांत निश्चल आहे पण, रावणगृही असल्यामुळे हनुमंत आस्थेने मातेची समजूत काढताना सांगतात, 

माते आपण चिंता करू नये, माझे स्वामी श्रीराम थोड्याच काळात येथे येऊन, या असुररूप रावणाच्या कैदेतून आपली सुटका करतील. विचार करा, रावणाचा दरारा, शक्ती सर्वकाही अजून तसच आहे, त्याच्याच राज्यात आपण आहोत, त्याच्याच राक्षस  सैनिकांना त्याने पाहिलंय. असं असूनही आपल्या स्वामींवरचा विश्वास तसूभरही ढळत नाही. याला म्हणतात श्रद्धा. 

अश्या दृढ श्रद्धेची कोटी कोटी उदाहरणं आपल्या पुराणात दाखल्यासाठी आहेत. विश्वास हा ज्यावेळी परमोच्च बिंदूवर असतो आणि आपल्या श्रद्धास्थानावर अलौकिक आणि अफाट प्रेम असतं, त्यावेळी ती श्रद्धा म्हणता येईल आणि त्या श्रद्धेत मनाला, त्या स्थानाशी बांधून ठेवण्याची ताकद असते. श्रद्धास्थान त्या श्रद्धा धरलेल्या भक्तांच्या हृदयी प्रकट होतं.  म्हणूनच स्मरण व शरण यांच्या जोडीला श्रद्धा असलीच पाहिजे आणि तशी ती असेल तर कृपेच्या लहरी, साधकापर्यंत आपसून येतातच. 

यावर अजूनही चिंतन करूया, उद्याच्या भागात. तोपर्यंत नाम हे प्रणासमान मानून, दृढतेने घेत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...