Skip to main content

भोग आणि ईश्वर ५०२

भोग आणि ईश्वर  ५०२  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
     . 
ईश्वर हा, म्हटलं तर चराचरात आहे, म्हटलं तर जगताच्या पार आहे, असं आपण अनेकदा वाचलं असेल. त्याचा अर्थ खोलात जाणून घेऊया.हे जगत निर्मिलं ते, ईश्वराच्या नाभीकमळातून जमलेल्या ब्रम्हदेव यांनी. सप्तलोक, सप्तपाताळ, सप्तस्वर्ग असे तीन लोक निर्माण करून, श्रीजगदीश्वर यांच्या मनोसंकल्पाचं रूपांतरण सत्यात आणलं. पण हे सत्यात आलेलं जगत शेवटी कधीतरी नष्ट होणार आणि पुन्हा नवनिर्मिती होणार. अर्थात आपल्या परिमाणात त्याला कित्येक कोटी वर्ष किंवा कित्येक युगं लोटणार. 

म्हणजे आपल्या दृष्टीने ते वास्तव आहे. कारण आपण आहोत देहधारी जीव. देहधारी जीवांना अनेक मर्यादांचं बंधन आणि सीमा आहेत. मुख्य सीमा आहे ती जन्माची. म्हणजे ज्या जन्मात आपण आहोत, त्याच जन्माचं आपल्याला जास्तीतजास्त स्मरण होतं किंवा राहातं. त्यातही देहाच्या तीन अवस्थांचं बंधन आहेच. म्हणजे जे बालपणी असेल ते तरुणपणी नसेल, जे तरुणपणी असेल ते वृद्धअवस्थेत नसेल. म्हणजे मर्यादा हा एक प्रकारे शाप दिलाय असं म्हटलं तरी चालेल. 

अजून एक मर्यादा म्हणजे माया व षड्रिपु यांचं ग्रासणं. म्हणजे मनाला मोहाचा शाप बुद्धी आणि देह यांना त्या मनाच्या मोहात अडकण्याचं बंधन. या तिन्हींची एकता साधून, मुक्ती वा मोक्ष यांचा मार्ग शोधता येईल, हे वरदान. पण देहाच्या गरजा बुद्धीच्या गरजा आणि मनाच्या अपेक्षा यांचा फास. बरं या फासातून बाहेर पडण्यासाठी काही करायला सुचावं, तर प्रपंचाची बंधनं आड येतात. बरं जीवनाचा अर्थ समजून येण्यासाठी, सुख आणि दुःखं यांना उपभोगून वा भोगून पुढे जाणं हे जीवनाचं वास्तव आहे. 

कारण ते पूर्वकर्माचं फलरूप आहे. बरं कर्म न करता राहायचं तर ते अशक्य, कारण जे करू किंवा न करू ते कर्म. म्हणजे काहीही केलं किंवा न केलं तरी, फलरुपात त्याचा हिस्सा पुढे येणारच. टाळून जाणं अशक्य. बरं  भोग वा दुःखं, हे तर पाहुण्यासारखे कधी येतील हे कळणार देखील नाही. आयुष्याची मजा घेत जगावं, तर त्या मजेचा परिणाम पुढे येणारच. न मजा करता जगावं तर अशाही व्यक्ती दिसतात वा भेटतात, ज्या आयुष्यभर उपभोग घेऊनही, कधी दुःखं भोग भोगताना दिसत नाहीत. 

म्हणजे मग नक्की कोणतं कर्म श्रेष्ठ मानायचं. प्रश्न तर गहन आहे. बरवाईट कर्म न करता राहावं, असं मनाला समजावून सांगितलं, तर अश्या व्यक्तिसुद्धा दिसतात किंवा बघायला मिळतात, ज्या आयुष्यभर सरळ आयुष्य जगतात, पण एकही दिवस सुखाचा साजरा करू शकत नाहीत. वर्षानुवर्षे त्यांचा लढा सुरू असतो. 

आपण स्वतःही यातून जात असलो, तर हे प्रश्न जास्तच त्रास देतात. या आणि अश्याच प्रश्नांचा मागोवा घेऊया, पुढील भागात. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...