Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६०

भोग आणि ईश्वर  ३६०

ज्ञान ग्रहण करून, त्यातून अनेक प्रकारच्या गरजा व भूक भागवणं ही मानवी देहासाठी उपकारस्वरूप देणगी ईश्वराने दिली आहे. किंबहुना काल म्हटल्याप्रमाणे, या द्विस्तरीय व्यवस्थेने देहाची भूक वाढवणं, वाढता वाढता भागवत जाणं ब आणि त्याद्वारे मायेच्या व वासनेच्या गुंत्यात स्वतःला अडकवून, पापाचं धनी होऊन, नन्तरच्या आयुष्यात किंवा नन्तरच्या जन्मात, ते भोगस्वरूपात भोगत जन्मोजन्म घालवणं, हा एक मार्ग, पहिल्या स्तरातील ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, ईश्वराने मानवाला दिला आहे. 

किंवा दुसऱ्या स्तरातील ज्ञानेंद्रियांना अतिउच्च, शुद्ध, पवित्र, सात्विक पातळीवर नेऊन, त्याद्वारे, ईश्वरीय परब्रम्हाच्या चराचरातील अस्तित्वाची साक्ष आत्मतत्वाला पटवून देऊन, त्या मार्गाने ईश्वराकडे मार्गक्रमण करणे, हा दुसरा मार्गसुद्धा ईश्वराने, मानवालाच उपलब्ध करून दिला आहे. 

कारण बाकी सर्व योनी, निःसंदेह फक्त भोगयोनी असल्या मुळे तिथे संचितातील भोग, त्या त्या प्राणीदेहात भोगणे आणि एक स्तरीय व्यवस्थेनुसार, फक्त वासना व भूक यासाठी देहाला झिजवून घेणं हा एकच मार्ग उपलब्ध आहे. अनेकानेक जन्मा नन्तर, ज्यावेळी संचितातील भोग आणि पापदशा नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा मानवी देहात जन्म घेणं, हे अपरावलंबित्व हा प्राणियोनीचा एकमेव मार्ग आहे. 

आता मानवी योनीत आल्यानंतर अनेक जन्मांच्या प्राणी योनी तील काही गुण वा दोष, या देहात सुरवातीच्या काही जन्मात येण्याची शक्यता असते. इथेच वासनेचा, मायेचा, मोहाचा व लोभाचा बळी होऊन पुन्हापुन्हा भोग भोगण्यासाठी मानवी देह धारण करत राहणे हा एक अपरावलंबी मार्ग आहे. भोगांच्या वा उपभोगांच्या आडून, मायेचा व संचिताचा सुरू असलेला खेळ लक्षातच न येणं आणि त्यामुळे या खेळातच एक पात्र बनून फिरत राहणं हे क्रमप्राप्त होत जातं. 

मुळातच दुसऱ्या स्तरातील ज्ञानेंद्रियांना जाण येणं व ज्ञानेंद्रियांचं ज्ञान होणं, या फक्त आणि फक्त ईश्वर व ईश्वर प्रतिनिधी असलेले सद्गुरु यांच्या असीम कृपेने शक्य होतं. त्याहीपेक्षा या कृपेचा खरा परिणाम तेंव्हा आहे, ज्यावेळी मानवाला द्विस्तरीय व्यवस्था माहीत नसताना सुद्धा, या ज्ञानाचा लाभ नकळत होतो आणि आध्यात्मिक मार्गावरील एक एक पायरी, देहरूपातील आत्मा, चढत जातो. 

खरंतर एखाद्या जन्मात अनावधानाने वा कर्मधर्मसंयोगाने ज्ञानाच्या दुसऱ्या स्तरातील ज्ञान प्राप्त झाल्यामुळे, मानवी आत्मा संतुष्ट झाला की, ही ज्ञानेंद्रिय आत्म चेतनेने, या योग प्राप्त व्हावा यासाठी उन्नत होत जातात. परंतु हे सहजी होत नाही,  तर इथेच सद्गुरुकृपायोग कार्यास येतो. असा योग अपघाताने, आघाताने, अनावधानाने वा संचितातील योगाने येऊ शकतो. 

यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण उद्या आपण त्याचा लाभ घेऊ. पण तोपर्यंत ज्या नाममार्गावर आपण अनावधानाने आलो आहोत, तिथे दृढनिश्चयाने राहण्याचा प्रयत्न करूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२५/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...