Skip to main content

भोग आणि ईश्वर ३६१

भोग आणि ईश्वर  ३६१

ज्ञानाच्या प्राथमिक स्तरावरील माणूस हा चार पायी जनावराची फक्त दोन पायी आवृत्ती असतो. कारण वासनेचे, मायेचे, मोहाचे क्षण टिपत, त्या ज्ञानातून, देहसुख अनुभवत त्याच पातळीवर जन्मोजन्मी स्थिर राहणं, हे फक्त श्वास आहेत आणि देहाच्या गरजांची जाणीव अतिजागृत आहे आणि मनाला ओढ आहे म्हणून क्षणक्षण त्याच आनंदात राहण्यासाठी जगणं, हे खूपच प्राथमिक पातळीवरील जगणं आहे. 

मुळात प्राणी हा ज्ञानाच्या प्राथमिक स्तरावरच असतो. तिथे भोगांचं परिमार्जन होऊन गेलं की, मानवी योनीत जन्म ही ईश्वरी व्यवस्थेने सहज घडणारी गोष्ट आहे.  म्हणजे नित्य असे असंख्य जीव, लक्षलक्ष प्राणी योनी तील भोग भोगून,मानवी पातळीवर जन्म घेत असतीलच. हे कालचक्र आहे, नित्य सुरू असलेलं. परंतु एकदा मानवी योनीत जन्म घेतल्यावर, हळूहळू उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणं, हे भगवंतांना अपेक्षित आहे. 

याचसाठी आणि या आत्मोन्नतीच्या कार्यात इच्छाशक्तीला उचित पाठबळ देऊन, भोगात आणि उपभोगातसुद्धा उच्च जाणीवा जागृत राहून, प्राथमिक स्तरावरून दुसऱ्या उन्नत स्तराकडे वाटचाल सुरू व्हावी व सुरू असलेली कायम राहावी, यासाठी मार्गदर्शनाचे, ज्ञानवृद्धीचे अनेक मार्ग, वाटा, व्यक्तिरुप सहाय्य, ज्ञान रूप सहाय्य, संकेत इत्यादींची योजना ईश्वराने मानवासाठी उपलब्ध करून दिली आहे. 

हे सर्व न जमल्यास किंवा न सुचल्यास भगवतमार्गात, नुसतं पडून राहून, ईश्वराचं स्मरण करत गेल्यास, स्वतः ईश्वर उन्नतीची कवाडं उघडून, उन्नतीसाठी सतत प्रयत्न करतो. ज्यांना भक्त म्हटलं जातं, त्यांचं सर्व योगक्षेम पाहण्याचं वचन स्वतः ईश्वराने उदार व करुणामय अंतःकरणाने दिलेलं आहेच. हा क्षेम आत्मोन्नतीचा व त्यासाठीच पाहण्याची जबाबदारी ईश्वराने स्वतःच्या शिरावर कायमस्वरूपी घेतलेली आहे आणि ती निभावण्यास तो सक्षम आहेच. 

परंतु यामध्ये एक योजना, जी ईश्वरी कृपेची परमावधी आहे, ती म्हणजे सद्गुरू व्यवस्था. आत्मा उन्नतीच्या मार्गाकडे यावा आणि आलेला टिकून रहावा, यासाठी अखंड सहाय्यभूत योजना म्हणजे हे गुरुतत्व. या सद्गुरू कृपेच्या व्यवस्थेतून, अनंत जन्मांच्या पुण्याईची प्राप्ती, मात्र एका क्षणात, मानवाला मिळावी, अशी ही अपार करुणायुक्त व्यवस्था निर्माण करून, खरतर विश्वाची माऊली असल्याचा अद्भुत प्रत्यय व प्रचिती, ईश्वराने दिली आहे. 

या सद्गुरू तत्वांचे अधिकार अमर्याद आहेत आणि सद्गुरू हे, माऊलीसमान, आपल्या साधक व शिष्य गणांना, याचा नित्य लाभ उपलब्ध करून देत असतात. साधकाला कुठे किती सहाय्यची आवश्यकता आहे आणि  ते सहाय्य कशाप्रकारे द्यायचं याचं भान, जाण व शक्ती सद्गुरूंना असते. 

कोणत्याही सद्गुरूंचा मुख्य व अंतिम उद्देश हा, साधकांना प्राथमिक स्तरावरील ज्ञानातून वा जाणिवेतून बाहेर काढून, उन्नतीच्या दुसऱ्या स्तरावरील ज्ञान व जाणीवा यांकडे नेऊन, तिथे स्थिर ठेवणे आणि तिथून, त्यांचं आत्मपतन होणार नाही, इतपत कृपा करत राहणं, हाच असतो. यावरील अजून चिंतन पुढील भागात पाहूया. पण तोपर्यंत नामाचं आपलं कर्तव्य व कर्म पार पाडत राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...