Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४५

भोग आणि ईश्वर  ३४५

ब्रह्मांड रचना करताना रचनाकार ब्रम्हा आणि ज्यांच्या संकल्पने तून हा सर्व खेळ सुरू झाला ते श्रीमहाविष्णू यांनी इतक्या अचूक शास्त्रीय आधारावर, सृष्टी, जीवसृष्टी निर्जीव पण तरीही नियमबद्ध रचना केली आणि हा जीवाचा खेळ सुरू करण्या साठी आदित्य, वसू, लोकपाल, विधाता इत्यादी व्यवस्थापक नेमून, त्यांना निश्चित कार्य, त्या कार्याचं दायित्व, त्यांच्या कार्या वर सृष्टीची नियमितता, मिती, त्रिमिती, परिमिती, बहुमिती या आलेखांची व परिणामाची निर्मिती केली.  

त्या त्या व्यवस्थापकांच्या कार्यावर, त्यांचा स्वतःचाच वचक राहील हे देखील पाहिलं. ही सर्व लोकपालांसह व्यवस्था इतकी चोख की, अनेक युगं, महायुगांचा काळ  होऊनही एक सुतभर सुद्धा चूक आजच्या घडीपर्यंत घडलेली नाही आणि पुढेसुद्धा असंभव आहे. जे घडलं, जे घडतंय व जे घडणार त्या प्रत्येकाला कारण व गती यांचे नियम आहेत व असणार. 

जग, जगातील सुक्ष्मातील सूक्ष्म जीवसुद्धा कारणाशिवाय पुढे सरकत नाही वा सरकू शकत नाही. कारण व कार्य कारणभाव यांच्यासाठी कर्मफलाची व्यवस्था, कर्माच्या गतीसाठी, माया भाव अशी मनाला आकृष्ट करणारी व्यवस्था करण्यात आली, पण याचा सुद्धा सकारात्मक उपयोग करून घेऊन मनाला सतत त्या परम उद्देशासाठी अग्रेसर ठेवत, प्रलोभनांच्या मोहाच्या पाशात न गुंतता, मनाला या जगतातील वातावरणातून बाहेरच्या जगतात जाण्यासाठी तयार करण्याचं कसब जमवणं हे देखील मनालाच हाताशी धरून करता येऊ शकेल. 

म्हणजे या जगताचा पसारा हा पूर्ण बिनकामाचा, टाकाऊ नाही. या जगताचे काही नियम आहेत, ज्यांच्या आधीन राहून वा ज्यांच्या मर्यादेत राहून आत्मोन्नती व आत्मोद्धार हे साधता येईल. मुळात काही नियम अत्यंत मूळ स्वरूपाचे आणि प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा बदलू शकणार नाही असे आहेत. त्यातील काही असे:  उत्पत्ती, स्थिती व लय हा जगताचा मुख्य आधार, प्रत्येक सजीव गोष्टीचा मृत्यू आणि प्रत्येक निर्मित गोष्टीला शेवट,  कर्म कर्मफल शृंखला, त्या कर्माची गती, 

काळपुरुषाची व्यवस्था, आदित्य, वसू, वरुण, कुबेर यांसह निर्मित लोकपाल, ब्रह्मांडातील सर्व जीवांची व्यवस्था पाहण्या साठी विधातारूप अशी व्यवस्था, ज्याद्वारे संपूर्ण जीवसृष्टी व त्या सृष्टीसाठी या सर्व नियमांचं पालन कटाक्षाने केलं जाण्याची व्यवस्था. कदाचित या सर्व नियमात असेही काही नियम असू शकतील, जे अजून आपल्यापर्यंत पोहोचले नसतील, पण अस्तित्वात असू शकतील. 

कदाचित या त्रिमिती जगताच्या मर्यादांमुळे, प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा जगतात येताना व जाताना, आपल्या शक्तीला, तेजाला व या सर्वांतून ईश्वराच्या प्रकट होण्याला मर्यादा सांभाळत यावं आणि जावं लागतं असेल.कारण नियंत्याची निर्मिती व अस्तित्व हे बहुमिती जगतासाठी किंवा जगतातील आहे. पण ईश्वर स्वतः या मर्यादा सांभाळून जगताचा भार वाहतो आहे,युगानुयुगे. अजूनही अनेक गोष्टी जाणायच्या आहेत, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत त्याच त्रिगुणात्मक शक्तीच्या नामाच्या स्मरणातून त्याचे आभार मानुया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...