भोग आणि ईश्वर ३५३
आत्मबुद्धी म्हणजे काय हे जरी आपण पाहिलं तरी प्रत्यक्षात आत्मबुद्धीची जाणीव वा जाग येणं हे भाग्याचं लक्षण आहे. अतींद्रिय शक्तीची जाणीव होणं, अनेक गोष्टी मनात न सांगता उलगडत जाणं, आत्मज्ञानाची जाणीव येणं म्हणजे जगताच्या पसाऱ्याबाहेरील अनेक गोष्टी जाणणं हे आत्मबुद्धी असल्याचं लक्षण आहे.
आत्मबुद्धीची जाणीव होण्यासाठी आत्मनेत्र वा आत्मचक्षु जागृत होणं अत्यंत जरुरी आहे. कारण ज्याप्रमाणे चर्मचक्षुना चलचित्र दिसल्यावर, त्याचं ज्ञान बुद्धी व मन यांना होऊन, त्या चित्राची वा दृश्याची किंवा व्यक्तीची ओळख आपल्याला पटते. ओळख पटल्यावर आपण त्यानुसार कृती वा कर्म करत जातो. त्यानंतर ती व्यक्ती वा ते दृश्य पुन्हा पाहिल्यावर आपण त्याच्या ओळखीची स्वीकृती मनात देऊन, त्या व्यक्तीला त्यानुसार साद घालतो किंवा ओळख दाखवून प्रतिसाद देतो.
हे एक उदाहरण झालं. म्हणजे त्यानुसार मन देह व बुद्धी क्रिया वा प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देतात. आता देहा बाबत ही व्यक्तीची ओळख वा ओळखीचं दृश्य, जर या जन्मात पाहिलेली व्यक्ती वा दृश्य असेल तरच खूण पटते. पण आत्मा ज्यावेळी एखादी गोष्ट वा व्यक्ती, एखाद्या जन्मात पाहतो आणि त्याची कर्मफलानुसार पुन्हा गाठ भेट झाली, त्यावेळी आत्मा हे जाणत असतो. आपल्याला ते स्मरत नाही, कारण विधात्याने तशी व्यवस्था निर्माण केली आहे.
पण खूपवेळा आपल्याला एखादी व्यक्ती भेटल्यावर वा एखादी घटना पाहिल्यावर असं भासतं किंवा मनाला जाणवतं की, आपण यातून गेलेलो आहोत. खूपदा हे वाटणं हा भास वाटतो वा वाटू शकतो. पण जर आत्मचक्षु जागृत असतील वा होतील त्यावेळी आत्मबुद्धीला त्याची गतजन्मातील साक्ष जाणवते आणि त्या घटनेचे अन्वयार्थ लक्षात येतात. परंतु यासाठी आत्मप्रकाश जागृत असणं गरजेचं आहे.
या सर्व गोष्टी एखाद्या जन्मातील वा काही मर्यादित काळातील अभ्यासाने वा प्रयासाने साध्य होत नाहीत वा होऊ शकत नाहीत. अतींद्रिय शक्ती जागृत होऊन, अतर्क्य गोष्टींच्या जाणीवा जागृत होऊन, ज्ञान होणं वा होत जाणं, हे अनेक जन्मांच्या साधनेचं, गुरुभक्तीचं आणि सद्गुरुकृपेचं फलित आहे वा असतं.
आपल्याच पुर्वजन्मातील साधना वा अपूर्ण कार्य अथवा सेवेचा प्रसाद ईश्वर व सद्गुरू खऱ्या साधकांना देतात. अश्या प्रकारच्या आत्मनेत्रांची जाणीव व त्याद्वारे आत्म बुद्धीची जागृती, ही साधना, संचित, गुरुकृपा अश्या अनेक समिकरणांचा सामायिक वा एकत्रित परिणाम असतो. अश्या प्रकारच्या सामायिक गोष्टींचा परिणाम दिसून जाणवायला लागणं, अर्थात अश्या जाणीवा जागृत आहेत हे कळणं हेसुद्धा महदभाग्यचं द्योतक वा फलित आहे.
यावर विस्तृत चर्चा उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामातून साधनेचा आपला मार्ग आपण कायम चालत राहूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment