भोग आणि ईश्वर ३३८
सूर असुर यांच्यातील हा संघर्ष, मायेच्या प्रभावात नित्य होत असतो. जगतपती,या खेळात, मायेच्या सहाय्याने, आपलं अस्तित्व राखून असतात. किंवा असंही म्हणता येईल की, माया एकप्रकारे, भगवंताचे नेत्र आहेत, जे मायारुपात, प्रत्येक मनाचा ठाव घेतात, तिथे नित्य वास करून, मनाच्या माध्यमातून, देह बुद्धी यांना गती देत राहून,या खेळात किंवा या जगात,जन्ममरण या फेऱ्यात फिरवत ठेवतात. हे करण्यात त्यांचा काय फायदा, हा एक विचार मनात येतो.
याचं कारण म्हणजे, या ब्रह्मांडाचा पसारा हा भगवंताच्या संकल्पातून निर्माण झालेला असल्यामुळे, तो संकल्प जोपर्यंत पूर्ण होत नाही,तोपर्यंत या खेळातून, त्यांची माया सरणार नाही. माया सरत नाही तोपर्यंत, त्यांच्या प्रभावाखाली, प्रत्येक जीव या गुंत्यात अडकून, आपलं विश्व या चक्रापुरतं मर्यादित ठेवेल. त्या प्रत्येक जीवाला, माया नित्य ग्रासुन, फिरवत राहील. बर जोपर्यंत फिरत राहणार, तोपर्यंत माया खेळ खेळत राहणार.
भगवंत नित्य या खेळातून,प्रत्येक जीवाने बाहेर पडावं, यासाठी प्रयत्नशील असतातच. पण यात मजा अशी आहे की,पुढाकार वा साद ही त्या जीवाने मारायला हवी. म्हणजे असं की, जीवाला या खेळाची जाणीव, त्यातील मायेच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि त्यातून बाहेर येण्याची इच्छा, या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजेत. जाणीव, ज्ञान व इच्छा ही त्रयी जुळून यायलासुद्धा कृपावंताची कृपा होणं आवश्यक आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी, त्यांच्या ज्ञानेश्वरीसह, प्रत्येक अभंगा तील, प्रत्येक रचनेतील, प्रत्येक शब्दात, या त्रयीवर आधारित निरूपण केलं आहे. आपण कोण आहोत, का आहोत, कोणामुळे आहोत,कुठे आहोत, कशासाठी आहोत, हे प्रश्न पडून, त्यांच्या उत्तरातून जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत. त्याआधी जाण येणं महत्वाचं आहे. ती जाण आली की, जाणीवा जागृत होतात. जाणिवांची केंद्र मनात जागृत झाली की, वरील सर्व प्रश्नाच्या उत्तरातून, अनेक गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं.
जे ज्ञान प्राप्त होईल, ते ज्ञान या जगताच्या पलीकडील गहन, गुह्य ज्ञान असेल. या ज्ञानाच्या प्राप्तीने, आपल्या खऱ्या आत्मरुप अस्तित्वाची ओळख मानवाला प्राप्त होईल.अशी ओळख प्राप्त झाल्यानंतर, मनुष्याला, प्राप्त परिस्थितीची, यात आपण करत असलेल्या फिरतीची, या जीवनापलीकडील विश्वाची व आपल्या निरर्थक संघर्षाची शून्य उपयुक्तता ज्ञात होईल.
एकदा चूक काय हे उमगलं की, बरोबर काय तेही कळतं. जाणीवा प्रफुल्लित होत जातात. आपण जाणिवांच्या वाटेने जायला सुरुवात केली की, चुकीचा मार्ग सोडून, इष्ट मार्गाकडे मार्गक्रमण करण्याची इच्छा जागृत होते. इथे त्रयी पूर्ण होते. हीच त्रयी, माऊलींच्या सर्व मांडणीचं सार आहे. जाणीवा ज्ञान आणि इच्छा. इच्छेचा उमाळा जागा झाला की, विचारांचा बांध फक्त आणि फक्त एकाच दिशेने सुरू होतो. ती दिशा अर्थातच, फक्त मुक्ती, मोक्ष आणि ईश्वर कृपाप्राप्ती.
एकदा या दिशेने वाटचाल सुरू झाली की, ईश्वर स्वतः अनेक रुपात येऊन, प्रतिसाद, संकेत देतोआणि मार्ग दर्शन करतो. म्हणूनच जाणीवा जागृत होणं, ही प्रथम पायरी खूप महत्वाची आहे. ही जाणीव एकाच मार्गाने जागृत होते, ती म्हणजे इष्ट अनिष्टांच्या या खेळात पतित होऊन, वाहात जाण्यापेक्षा, आपल्या सद्यस्थितीला जाणणं, महत्वाचं ठरतं.
त्यातूनच पुढील अनेक प्रश्न पडतात. ज्यांनी ज्यांनी हे जाणलं, त्यांना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्यांना ज्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्यांना बाहेर पडण्याची इच्छा निर्माण झाली. पुन्हा इथे अजून एक त्रयी आहे. त्यावरील पुढील चिंतन आपण उद्या सुरू ठेवू. पण जाणिवांची जागृती सद्गुरुकृपेने साधते आणि सद्गुरु कृपा नित्य नामाने साध्य होते. म्हणूनच ते करत राहूया.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment