Skip to main content

भोग आणि ईश्वर ३५०

भोग आणि ईश्वर  ३५० 

ईश्वराने सर्व व्यवस्था केली आणि जगताचा गाडा सुरू झाला.  ईश्वराचा मुख्य उद्देश, या जगतातून, जीव मोक्ष, मुक्ती या मार्गा कडे जावा. कारण जगतात जीवाला पाठवण्याचा, विधात्याचा उद्देश, जीवाला आत्मज्ञानाची प्रचिती यावी, जाणीव व्हावी,  जगण्याचा अर्थ उमगावा, मुळात जगतपिता व आपण यांचा संबंध समजावा, या सर्वांचं ज्ञान होऊन, त्या मार्गाने व त्या मार्गाकडे, आत्मा वळावा, हा आहे. 

खरतर, हे ज्ञान जीवाला, या जगतात येताना असतंच. परंतु, ज्यावेळी आत्मा भूलोकात किंवा मर्त्यलोकांत आल्यावर, येथील माया, पंचमहाभूतरुप देहावर असलेला इतर सर्व शक्ती व शत्रू, जे याच जगताचा भाग आहेत, यांचा प्रभाव जसजसा वाढत जातो, तसतसा प्रत्येक आत्मा मूळ ज्ञानापासून दूर दूर जाऊन, या जगताच्या फेऱ्यात पूर्ण विसरून जातो. 

जगताची जी ओळख जन्मतः मानवी मनाला, बुद्धीला करून दिली जाते, त्यामुळे, युगानुयुगे व जन्मोजन्मी आत्मसात केलेलं ज्ञान, जाणीवा हे सर्व मागे पडत जातं. किंबहुना ते सुप्त मनात कोंडलं जातं. कर्म, कर्माची गणितं, फलांची बेरीजवजाबाकी यात अडकत जाऊन तोच जगण्याचा भाग होऊन जातो. जन्म झाला, शिक्षण संसार वृद्धत्व आणि या जगतातून गमन, हा एक खेळ एकदा सुरू झाला की, त्या त्या काळात जीव हरवून नित्य मायेच्या पसाऱ्यात अडकून जातो. 

वास्तविक या सर्व खेळात जीवाला पुन्हा मुक्तीकडे नेणाऱ्या मार्गावर जाण्याची जाणीव, ज्ञान व बुद्धी व्हावी, यासाठी ईश्वर सतत प्रयत्नशील होता, आहे आणि असणार आहे. धर्माच्या मार्गावर आधी आत्म्याचा परिचय प्रत्येक जीवाला व्हावा, यासाठी ईश्वर अनेक रुपात, प्रत्यय देतो. त्यासाठी त्या जीवाला भोग उपभोग, दुःख सुख, माया मोह, राग लोभ या सर्व खेळातून बाहेर काढून, मूळ स्वरूपाची ओळख करून देणं महत्वाचं आहे. 

याचसाठी ईश्वराने त्रिमिती जगतातून जीवाने बाहेर येऊन विचार करावा अशी व्यवस्था देहातच निर्माण करून ठेवली आहे. बुद्धी मन आणि आत्मा यांचा समन्वय साधत, भोग आणि ईश्वर यांचा ताळमेळ साधत, मायेची बंधनं झुगारून पुढे जाण्याची संधी साधता आली पाहिजे. मुळात त्यासाठी ईश्वरी ज्ञान होणं,  जाणिवांची जागृती येणं हा उत्तम मार्ग आहे. 

ते लक्षात यावं म्हणून कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग असे तीन उत्तम मार्ग स्वतः भगवंतांनी विषद करून सांगितले आहेत. या सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ असलेली शरणागती व अर्पण भक्ती अनेक साधुसंत, सज्जन, यांच्या उदाहरणातून आपल्याला सतत बुद्धीसमोर राहतील आणि मोह माया हे सर्व बुद्धिभेद व बुद्धिभ्रम करणार नाहीत, हे कायम मनात राहावं, यासाठी अध्यात्मिक मार्गाची निर्मिती करून, देहातील आत्मरुप उर्जित राहावं यासाठी ज्ञानाची, भगवतप्रेमाची इच्छा मनात जागी व्हावी यासाठी स्वतः ईश्वर प्रयत्नशील आहे. 

त्याबद्दलच अजून विस्ताराने जाणून घेऊ, उद्याच्या भागात. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...