Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४९

भोग आणि ईश्वर  ३४९ 

कर्माचं परावलंबित्व आपण जाणलं, त्यातून सुटका नाही, हे देखील जाणलं. म्हणजे कर्म न करता राहता येत नाही आणि कर्म करतानाच, प्रारब्धाचे भोग, चटके यांचे कडू घोट सुद्धा प्यावे लागतात, हे देखील आपण जाणलं. म्हणजे गीतेमध्ये भगवंत सांगतात तो एकप्रकारे तिढाच आहे. म्हणजे या जगतात आपल्यावर practical problem ज्याला म्हणता येईल अशी ही द्विधा स्थिती आहे. 

म्हणजे कर्म तर करायचं, न करता राहायचं नाही. कर्म करताना, त्याचं फल कधी मिळेल हे ईश्वर जाणे आणि त्या ईश्वराची विधाता नामक व्यवस्था जाणते. इथे एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की, विधाता आणि ईश्वर या दोन भिन्न व्यवस्था आहेत, अस माझं मत आहे. कारण ज्या व्यवस्थेने हे ब्रम्ह, ब्रह्मांड, जगत, जीव, कर्माची व्यवस्था हे इतकं सर्व निर्माण करून, ते सुरळीत चालावं आणि प्रत्येक नियमाला बांधील असलेली ती ती व्यवस्था, नीट कर्म पार पाडत रहावी यासाठी, त्या सर्वांचा कारभार असलेली व्यवस्था म्हणजे विधाता. 

म्हणजे ईश्वराच्या विधानाचा कारभार पाहणारी व्यवस्था. ईश्वराचं विधान काय, तर जगताच्या निर्मितीचा संकल्प, हे ते विधान. ही व्यवस्था ईश्वराहून भिन्न यासाठी की, जगतात अनेक कारणांनी आलेल्या व येणाऱ्या ईश्वरी अंशांसह स्वतः ईश्वराला सुद्धा ती बंधनकारक आहे. म्हणून तर अनेक अवतारात कधीही या व्यवस्थेला धक्का लागेल असं वागणं, स्वतः ईश्वरानेसुद्धा केलं नाही आणि करणार नाही. 

अनेक गोष्टी या ईश्वराने विधात्याच्या हाती सोपवून, त्यांना कधीही बाजूला सारलं नाही. म्हणून ईश्वर आणि विधाता या दोन वेगळ्या व्यवस्था आहेत. अगदी ईश्वरनिर्मित असूनही, विधाता आपल्या कर्तव्यात तत्पर व कठोर आहे. म्हणून कर्मासह विधात्याच्या सर्व नियमांनी बद्ध असलेला प्रत्येक जीव, आपल्या कर्मात रत असताना, प्रारब्धाच्या चक्रात फिरताना,फलांची अपेक्षांच्या भीतीने त्रस्त असताना, व्यावहारिक, मायेच्या व षड्रिपूंच्या फेऱ्यातून स्वतःला कसा काय सोडवून घेऊ शकेल, हा मोठा पेच आहे. 

कदाचित यासह अनेक प्रश्नांची, जगतात उकल व्हावी यासाठी, स्वतः ईश्वराने काही मार्गदर्शनपर व्यवस्था केली नाही का, असा एक प्रश्न नेहमी पडतो. म्हणजे कर्मफल भोग वा उपभोग, नित्य व वर्तमानातील कर्म, पुन्हा भोग वा उपभोग, या गणिताला सोडवण्याची व्यवस्था ईश्वराने अनेक मार्गानी, अनेक प्रकारे, अनेक उदाहरणातून या जगतापर्यंत पोचवली आहे. 

नित्य त्याची प्रचिती, जाग जगतात राहून, जगतावरील मायेचा प्रभाव कमी व्हावा आणि जगताची, ब्रह्मांडाची, ब्रह्मांडाबाहेरील ईश्वरी व्यवस्थेची ओळख व्हावी, यासाठी ईश्वर नित्य प्रयत्नशील आहे व असेल. त्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊ, उद्याच्या भागात. पण तोपर्यंत आपला नामाचा मार्ग नित्य क्रमत राहू आणि स्वहित साधूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...