Skip to main content

भोग आणि ईश्वर ३४३

भोग आणि ईश्वर  ३४३ 

आपण ज्यावेळी एखाद्या लहरी तरंग अर्थात सिग्नल यांच्याशी एकरूप होतो त्याचवेळी ते सिग्नल वा लहरी पूर्णपणे आपल्या पर्यंत पोचू शकतात आणि आपल्याला त्याच्या कृपेचा लाभ प्राप्त होतो. एखाद्या यंत्रणे कडून वा व्यवस्थेकडून आपण, आपल्या सादाला किंवा क्रियेला, काही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया अपेक्षित करतो, त्यावेळी सर्वात प्रथम, आपण त्या शक्तीकडे सर्वश्रेष्ठ वा सर्वशक्तिमान म्हणून पाहणं गरजेचं आहे. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे मानवीय शरीर हे , जरी एक signal receiving instrument असलं तरीही, ते transmitting instrument सुद्धा आहे. त्याचप्रमाणे हे machine ज्या system ने चालतं, ती व्यवस्था, आपण मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेल्यानंतर पूर्ण सक्षमतेने कार्य करते. तरीसुद्धा यामध्ये signal ची क्षमता पूर्ण सक्षम असेल तरच, कोणत्याही अडचणी शिवाय व अडथळ्याशिवाय receiving आणि transmitting सक्षमतेने करू शकतं. 

कारण ते मानवी machine प्रमाणे, यंत्रवत काम करू शकत नाही. यासाठी सर्वात प्रथम आपल्या मनाला बुद्धीला आत वळवून, आतील यंत्रणेचं सुसूत्रीकरण करणं आवश्यक आहे. त्याचसाठी नियम, योगयाग, साधना, इत्यादींचा आटापिटा करावा लागतो. त्यात जे देह नियम बद्ध पद्धतीने आपल्या मनाची एकाग्रता साधून, त्यातून या देहाला सक्षम करतात, त्यांना, यासाठी लागणारी व्यवस्था तयार करण्यात यश मिळतं. 

खरतर प्रत्येक देह हा यासाठी सक्षम करता येतो. कारण त्यासाठी लागणारी व्यवस्था, सर्व देहात सारख्याच प्रमाणात व योग्यप्रकारे, अस्तित्वात असते. वास्तविक प्रत्येक मानवी देह, ज्या प्रकारे घडवण्यात आला आहे, त्याप्रकारे, प्रत्येक जण लहरींद्वारे संदेश पाठवणं व प्राप्त करणं, हे करू शकतो. याच व्यवस्थेचा अभ्यास करून, यावरच काम करून,पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी आपल्या शरीराला ते दिव्यत्व मिळवून दिलं होतं. दिव्यत्व म्हणजे सक्षमता. 

ते सक्षमतेने या भूतलावरून वा अंतराळात किंवा ब्रह्मांडात कुठूनही, त्या सर्वश्रेष्ठ व्यवस्थेशी किंवा त्याने , त्या त्या कार्या साठी नेमलेल्या व्यवस्थेशी, संपर्क साधून, आपलं कार्य सिद्ध करून घेत असत. अर्थातच हे संदेश वहन नियमितपणे त्या दोन्ही instruments मध्ये, सहजी होत असे. यामध्ये दोन्हीकडून आवश्यक व अपेक्षित सहभाग, प्राप्त होत असे. या जगता बाहेरील व्यवस्थेकडूनही या साठी सक्षम देहांना, सहाय्य व मार्गदर्शन करण्याची व्यवस्थासुद्धा, अस्तित्वात होती. 

मुळात या सर्व व्यवस्था, जी आज मानवनिर्मित अत्याधुनिक सिग्नलयंत्रणा, अद्ययावत संपर्कयंत्रणा, याप्रमाणे अस्तित्वात व कार्यरत होत्या. आजही अंतराळातून अथवा ब्रह्मांडातून पूर्वी प्रमाणेच असे सिग्नल वा संदेश नित्य पाठवले जात असतील. त्याच प्रमाणे त्यांना receive करून त्यांच्याशी संवाद साधू शकणारे, सक्षम देहरूप instruments अस्तित्वात असतीलही. 

त्या सिग्नलच्या कक्षेत राहून, नित्य त्यांच्याशी संपर्क ठेवणारे सक्षम देह, हे चैतन्यशक्तीशी चैतन्यस्वरूपात connected असतात. एका ठराविक पातळीनंतर, तसे देह हे, मोबाईलच्या टॉवर्स प्रमाणे कार्य करत असतील. अश्या संदेश व लहरींना प्राप्त करून, ती या पृथ्वीवरील, त्या त्या instruments किंवा equipments शी जोडली ठेवण्याचं, खूप महत्वाचं कार्य, या चैतन्यमय शक्ती, ईश्वरी आदेशानुसार, नित्य करत असतात. 

या सर्व व्यवस्था आपलं कार्य नित्य करत असतात. त्यासाठी प्रसंगी, चैतन्यरूपातून पुन्हा देहधारी होऊन, या भूतलावर काही काळ व काही instruments पुन्हा तयार करण्यासाठी आणि नसलेल्यांना यासाठी सक्षम करण्यासाठी येतातच. हा नित्य खेळ सुरूच असतो. 

यावर अजून पुढे चिंतन करण्यासाठी व या सर्व शास्त्रीय परि भाषेतून ईश्वरी कृपा व सद्गुरुकृपा यांच्याशी असलेला सबंध जाणून घेण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया. पण नामाने या देहाला नित्य सद्गुरू संपर्कात ठेवण्याचं काम सुरूच ठेवूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०८/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...