भोग आणि ईश्वर ३५६
संगणकीय आज्ञावलीनुसार चालणाऱ्या प्रोग्रॅमप्रमाणे संगणकाचं कार्य चालतं आणि एका साचेबद्ध पद्धतीने सर्व कार्य होऊन, इच्छित काम संगणक पूर्ण करून देतो. मानवी मन हा या देहातील बुद्धिशी निगडित आणि आत्म्याला उन्नत करणारा एक खूप मोठा घटक आहे. मानवी देह बुद्धी मन आणि आत्मा यांची संगणकाशी तुलना करताना एक प्रश्न मनात येईल की, संगणका प्रमाणे या व्यवस्थेत आज्ञावली आहे का.
ज्ञान जाणिवांची जागृती हे सर्व या देहात मनात कशाप्रकारे येतं, वाढतं आणि माणसाला कशाप्रकारे सहाय्यभूत होतं हे जाणून घेण्याआधी देहाच्या संगणकाचा पूर्ण अभ्यास करूया. या देहाला, बुद्धीला, मनाला व प्रत्येक कर्माला आज्ञावली कामाला लावून, सर्व कर्म पार पडतील याची व्यवस्था विधात्याने कर्मफल स्वरूपात करून ठेवली आहे. म्हणजे आज घडणाऱ्या सर्व गोष्टी या आपणच आपल्या आधीच्या कर्माने ठरवून दिलेल्या असतात.
म्हणजे आज भेटणारी माणसं, त्यांच्याशी आपले होणारे शारीरिक, बौद्धिक व मानसिक व्यवहार, त्यावर आपल्या प्रतिक्रियेने निर्माण होणारी भविष्यातील कर्मबंधनं हे सर्व काही आपल्या कर्मानुसार आपणच ठरवून दिलेलं असतं. म्हणजे मानवी संगणकाची आज्ञावली आपण स्वतः आपल्यासाठी लिहिलेली असते. या अज्ञावलीनुसार क्षण अन क्षण आपण जगतो.
सर्व कर्म आपण आखल्याप्रमाणे घडत असल्यामुळे आपण आज भोगत असलेली दुःख वा भोग आणि उपभोग यांचा प्रोग्रॅम वा आज्ञावली आपणच आत्म्याच्या ललाटपटलावर लिहिलेली असते व लिहीत जातो. या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जातं. किंबहुना जगापलीकडील सर्व ज्ञान हे आत्मज्ञान म्हटलं जातं. आत्मज्ञान म्हणजे स्व ला जाणून, त्याला जगापासून दूर पण परमात्म्याकडे घेऊन जाणं.
आत्मज्ञान जाणिवांच्या कक्षा रुंदावतं, जगाचं मिथ्यत्व जाणवायला लागतं, आत्मा हाच सर्वश्रेष्ठ घटक असून त्याच्या उन्नत्तीकरता म्हणजे आत्मोन्नतीकरता काय करावं लागेल याचा विचार देह, बुद्धी व मन करायला लागतं. जाणीवा प्रगल्भ होतात म्हणजे आपल्याला विषय सुखाची आवडी कमी करून, भोगांचा सकारात्मक विचार व्हायला लागतो. जाणीवा व ज्ञान जगाकडून आत्म्याकडे वळतं म्हणजेच देह, बुद्धी व मन अंतर्मुख व्हायला सुरुवात होते.
प्रत्येक घटनेतून विधात्याचा विशाल दृष्टिकोन, त्याची कल्पकता व व्यापकता समजायला लागते, आपण प्राप्त परिस्थितीत काय करतो आणि काय करायला पाहिजे हे समजायला व उमगायला लागतं, अनेक गोष्टींचं ज्ञान होत जातं, जे आत्मज्ञानाकडे नेत जातं. यावर अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामाच्या माध्यमातून आत्मोन्नतीकडे नेणाऱ्या मार्गावर वाटचाल करत राहू.
श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/११/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment